शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कुठलेही कर्ज न घेता पतसंस्थेने परस्पर शेती विक्री केल्याची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:19 IST

जळगाव : पतसंस्थेकडून कुठलेही कर्ज न घेता परस्पर उताऱ्यावर बोजा बसवून शेळगाव, ता.जळगाव शिवारातील १ हेक्टर ७२ आर इतकी ...

जळगाव : पतसंस्थेकडून कुठलेही कर्ज न घेता परस्पर उताऱ्यावर बोजा बसवून शेळगाव, ता.जळगाव शिवारातील १ हेक्टर ७२ आर इतकी शेतजमिन बहिणाबाई चौधरी नागरी सहकारी पतसंस्थेने परस्पर विक्री केल्याची तक्रार एकनाथ खेमचंद पाटील (४५, मुळ रा.शेळगाव, ह.मु.पुणे) यांनी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात दिली आहे. संस्थेचे चेअरमन विलास यशवंत चौधरी यांच्यासह २३ जणांविरुध्द त्यांनी तक्रार दिली आहे.

शेळगाव शिवारात गट क्र.२०४ मध्ये पाटील यांची शेती आहे. आपण पुण्याला वास्तव्याला असताना २४ ऑगस्ट २०२० रोजी सहकार विभागाने शेती विक्रीची ऑर्डर काढली व प्रत्यक्षात २४ डिसेंबर २०२० रोजी शेती वसंत दपडू चौधरी (रा.आसोदा) यांच्या नावावर झाली. या शेतजमीनीवर बोजा बसविण्यात आलेला आहे. प्रत्यक्षात आपण कोणतेच कर्ज घेतले नाही किंवा कोणाला जामीनही झालेलो नाही, असे पाटील यांचे म्हणणे आहे. सहकार विभागाकडील कागदपत्रे, उतारे, खरेदीखत व माहिती अधिकारात मिळविलेल्या कागदपत्रांमध्ये तफावत असून तोतयेगिरी केल्याचा संशय पाटील यांनी व्यक्त केला आहे. मंगळवारी त्यांनी पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी यांच्यासह जिल्हा पेठ पोलिसांकडे लेखी तक्रार दिली, येथून न्याय मिळाला नाही तर न्यायालयात जाण्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे.