शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

जातीयवाद गुंडगिरी, शेतकऱ्यांना छळणारी सावकारी मोडीत काढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:22 IST

सुनील पाटील जळगाव : समाजासाठी घातक ठरणारे जातीयवादी गुंड व त्यांना खतपाणी घालणाऱ्यांचे रेकॉर्ड काढायला सुरुवात झाली असून त्यासाठी ...

सुनील पाटील

जळगाव : समाजासाठी घातक ठरणारे जातीयवादी गुंड व त्यांना खतपाणी घालणाऱ्यांचे रेकॉर्ड काढायला सुरुवात झाली असून त्यासाठी एक आराखडाच तयार केला. त्याशिवाय देशाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांना छळणारे सावकार यांचाही बंदोबस्त केला जाणार आहे. जनतेला विश्वास वाटावा अशी पोलिसींग आपल्याला अपेक्षित आहे, त्यादृष्टीनेच आपण काम करणार असल्याचे स्पष्ट मत नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक बी.जी.शेखर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केले.

नाशिक परिक्षेत्राचा पदभार घेतल्यानंतर शेखर पहिल्यांदात खान्देश दौऱ्यावर आले आहेत. सोमवारी ‘लोकमत’ ने त्यांच्याशी संवाद साधला असता आपली कार्यपद्धत व जळगावला पूर्वी केलेल्या कामाचे अनुभव याबाबत त्यांनी मनमोकळी चर्चा केली. गुन्हेगारांना गुन्हेगारासारखेच वागविले जाऊन त्यांना त्यांची जागा दाखवितानाच सज्जनांना सॅल्यूट असेल. जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात अवैध सावकारी व शस्त्र तस्करीचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे या दोन बाबींवर पोलीस दलाची विशेष नजर असणार आहे. गणेशोत्सव काळात आम्ही शांततेचे आवाहन केले आहे. मात्र त्याला कोणी गालबोट लावण्याचा प्रयत्न केला तर गाठ पोलीस दलाशी आहे, हे देखील कोणी विसरू नये असा इशारा देखील त्यांनी समाजकंटकांना दिला आहे. अशा लोकांचे पूर्वीचे रेकॉर्ड बघून याद्या तयार केल्या जात असून गुप्त पाळतही ठेवली जात आहे. शांतता व मोहल्ला समितीच्या बैठकांमधून हाच संदेश दिला जात आहे.

भुसावळात पकडला होता मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी व शस्त्रसाठा

मुंबईमध्ये १९९३ मध्ये बॉम्बस्फोट झाला होता. तेव्हा त्यातील आरोपी मुंबईच्या बाहेर पळाले होती. त्यावेळी आपण जळगावात कार्यरत होतो. या बॉम्बस्फोटाचा मुख्य आरोपी टायगर मेमन याचा उजवा हात समजला जाणारा व दुसऱ्या क्रमांकाचा आरोपी शहा नवाज हा मुंबईतून थेट भुसावळात आल्याची माहिती मिळाली होती. अतिशय नियोजनबद्ध पध्दतीने आपण स्वत: त्याला अटक केली होती. त्याच्याकडून मोठी हत्यारे, आरडीएक्स, ब्राऊन शुगरचा साठा जप्त करण्यात आला होता. याच काळात काश्मिरी अतिरेक्यांनाही येथे अटक करण्यात आली होती. अगदी स्थानिक ते राष्ट्रीय अतिरेक्यापर्यंतच्या गुन्हेगारांशी संपर्क आला. त्यांना त्यांची जागा दाखविता आल्याचे आजही समाधान आहे. याच कामगिरीच्या बळावर मोठ्या गुन्ह्यांच्या तपासाची संधी मिळत गेली. अगदी सुरुवातीपासूनच कायद्याच्या चाकोरीत काम करीत असल्याचे शेखर यांनी सांगितले.

पोलीस दलातील अंतर्गत राजकारण खपवून घेणार नाही

पोलीस दलातील अंतर्गत राजकारणावर छेडले असता, बी.जी.शेखर म्हणाले, या प्रकरणाचे अजिबात समर्थन करणार नाही. असा प्रकार होत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. संबंधिताविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. प्रत्येकाने आपापले काम केले पाहिजे. त्यामुळे गुन्ह्यांना आळा बसेल. जनतेला विश्वास वाटावा अशी कामगिरी पोलिसांनी करणे अपेक्षित आहे.