शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
2
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
3
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
4
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
5
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
6
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
7
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
8
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
9
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
10
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
11
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
12
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
13
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
14
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
15
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
16
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
17
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
18
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
19
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
20
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...

सहा रस्त्यांवरील अतिक्रमण कारवाईस सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:20 IST

फोटो : २२सीटीआर ४३, ४१ लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केलेल्या २० किमीच्या ६ रस्त्यांवरील ...

फोटो : २२सीटीआर ४३, ४१

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केलेल्या २० किमीच्या ६ रस्त्यांवरील अतिक्रमण कारवाईस मनपाकडून मंगळवारपासून सुरुवात करण्यात आली. मंगळवारी कानळदा रोडवरील अतिक्रमणासह इच्छादेवी चौक ते शिरसोली नाक्यादरम्यानचे किरकोळ अतिक्रमण काढण्यात आले. या रस्त्यांवर पक्के बांधकाम असलेल्या अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढून घेण्यास मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून बुधवारी सकाळी ११ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. हे अतिक्रमण न काढल्यास मनपाकडून सर्व अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात येणार आहे.

शहरातील मुख्य ६ रस्त्यांवरील विकासकामांना प्राधान्य दिले जाणार आहे. मनपाकडून बांधकाम विभागाकडे वर्ग झालेल्या रस्त्यांच्या कामांना सुरुवात करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. बांधकाम विभागाने या रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्याचा सूचनेनंतर मनपा प्रशासनाकडून मंगळवारपासून अतिक्रमण कारवाईस सुरुवात करण्यात आली आहे. मनपाकडून तीन दिवसांत हे अतिक्रमण काढण्यात येणार आहे. अतिक्रमण काढल्यानंतर महिनाभराच्या आत या रस्त्यांचा कामांना सुरुवात करण्यावर भर दिला जाणार आहे.

महिनाभराच्या आत रस्त्यांचा दुरुस्तीसाठी प्रयत्न

महापालिकेकडून हे रस्ते बांधकाम विभागाकडे वर्ग झाल्यानंतर लवकरात लवकर हे रस्ते डांबर व खडीची एक लेन टाकून दुरुस्त करण्याचा सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या आहेत. त्यानुसार डीपीडीसीकडून ३ कोटींचा निधी बांधकाम विभागाला प्राप्त होणार आहे. लवकरच शॉर्ट निविदा काढून मुख्य रस्त्यांच्या कामांना सुरुवात केली जाणार आहे.

या भागातील काढण्यात आले अतिक्रमण

१. मनपाकडून मंगळवारी दुपारी उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण कारवाईस सुरुवात करण्यात आली. दुपारी १ वाजता शिवाजीनगर भागातील अंबिका सॉ मिल ते कानळदा नाक्यापर्यंतच्या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात आले.

२. दुपारून इच्छादेवी चौक ते शिरसोली नाक्यावरील किरकोळ अतिक्रमणदेखील काढण्यात आले. कारवाईदरम्यान नागरिकांनी याबाबत सूचना दिल्या नसल्याचे सांगितले. मात्र, गेल्याच आठवड्यात मनपाकडून संबधितांना नोटिसा बजाविण्यात आल्याचे मनपा कर्मचाऱ्यांनी सांगितले.

कारवाईदरम्यान पोलिसांचा तगडा बंदोबस्त

इच्छादेवी चौक ते शिरसोली नाक्यादरम्यानचे किरकोळ अतिक्रमण मनपाने काढले असले तरी पक्के बांधकाम मंगळवारी काढण्यात आले नाही. मनपाने संबंधित अतिक्रमणधारकांना बुधवारी सकाळी ११ वाजेपर्यंतची मुदत दिली असून, हे अतिक्रमण न काढल्यास मनपाकडून कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान, याठिकाणी कोणताही वाद निर्माण होऊ नये म्हणून मनपाकडून तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मनपाने रस्त्याची मोजणी करून मार्कींग केली आहे. त्यानुसार अतिक्रमण विभागाच्या पथकांनी प्रत्येक अतिक्रमणधारकाच्या जागेसमोर जाऊन व्हिडिओे चित्रणात सूचना दिल्या. यात गटारीपासून सात फुटांपर्यंत आतमध्ये अतिक्रमण काढावे लागणार आहे. यात अनेकांची व्यावसायिक दुकाने असल्याने साहित्य काढून नुकसान टाळण्यासाठी त्यांना मुदत देण्यात आली.