शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
4
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
5
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
6
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
7
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
8
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
9
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
10
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
11
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
12
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
13
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
14
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
15
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
16
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
17
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
18
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
19
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
20
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती

जिल्हाधिका-यांची खुर्ची व वाहन जप्ती टळली

By admin | Updated: February 17, 2017 18:17 IST

पाचोरा तालुक्यातील साजगाव-मोहाडी लघु पाटबंधारे योजनेसाठी १० एकर जमीन संपादित करून त्याचा वाढीव मोबदला देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी न्यायालयाने जिल्हाधिका-यांची

ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 17 - पाचोरा तालुक्यातील साजगाव-मोहाडी लघु पाटबंधारे योजनेसाठी १० एकर जमीन संपादित करून त्याचा वाढीव मोबदला देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी न्यायालयाने जिल्हाधिका-यांची खुर्ची व वाहन जप्त करण्याचे आदेश दिले. मात्र दोन दिवसात रक्कम भरण्याचे आश्वासन जिल्हाधिका-यांनी दिल्यानंतर शेतक-यांनी कारवाई थांबविली. त्यामुळे खुर्ची व वाहन जप्तीची नामुष्की टळली.
साजगाव-मोहाडी लघु पाटबंधारे योजनेसाठी १ जानेवारी १९९५ रोजी सिकंदर अमिर पिंजारी यांच्या मालकीची १० एकर जमिनीचे भूसंपादन केले होते. शेतकºयांनी जिल्हा न्यायालयात वाढीव मोबदल्यासाठी याचिका दाखल केली होती. त्यानुसार २००८ मध्ये जिल्हा न्यायालयाने शेतकºयांना वाढीव मोबदला देण्याचे आदेश शासनाला दिले होते. मात्र शासनाकडून वाढीव मोबदला देण्यासाठी टाळाटाळ होत होती. या संदर्भात शेतक-यांनी न्यायालयात पुन्हा अर्ज करून जिल्हाधिकाºयांची खुर्ची व वाहन जप्त करण्याचे आदेश व्हावे अशी मागणी केली होती. त्यानुसार न्यायालयाने वॉरंट काढले होते.
या वॉरंटच्या अंमलबजावणीसाठी शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास शेतकरी सिकंदर अमिर पिंजारी, युनूस पिंजारी, मन्सूर पिंजारी, अ‍ॅड.अशोक चौधरी व न्यायालयातील अधिकारी व कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. सुरुवातीला त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांची भेट घेऊन कारवाईची माहिती दिली. मुंडके यांनी शेतक-यांना दोन दिवस थांबण्याची विनंती केली. त्यानंतर जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल या कार्यालयात आल्या. अ‍ॅड.अशोक चौधरी यांच्यासह शेतकºयांनी त्यांची भेट घेत न्यायालयाच्या आदेशाची प्रत त्यांना दाखविली. जिल्हाधिका-यांनी दोन दिवसात शेतकºयांच्या मोबदल्याची रक्कम अदा करण्याचे आश्वासन दिले. शेतक-यांनी दोन दिवसांची मुदत दिल्यामुळे जिल्हाधिकाºयांची खुर्ची तसेच वाहन जप्तीची नामुष्की टळली.
 
टाळाटाळ करणा-यांवर कारवाई करा
शेतक-यांच्या वाढीव मोबदल्याची रक्कम तीन महिन्यांपूर्वी शासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविली आहे. त्या आशयाचे शासन आदेश देखील आहेत. मात्र तीन महिने ही रक्कम देण्यासाठी टाळाटाळ कुणी केली या प्रकाराची चौकशी करावी. तीन महिन्याचे व्याज कुणी द्यावे त्याबाबतची माहित स्पष्ट करून टाळाटाळ करणाºयावर कारवाई करावी अशी मागणी अ‍ॅड.अशोक चौधरी यांनी केली.
 
जमिनीचा मोबदला देण्याबाबत टाळाटाळ होत असल्याने आज न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी यांची खुर्ची व वाहन जप्तीसाठी आम्ही आलो होतो. मात्र दोन दिवसात रक्कम भरण्याचे आश्वासन जिल्हाधिका-यांनी दिले आहे. सोमवारी रक्कम न मिळाल्यास जप्तीची कारवाई आम्ही करणार आहोत.
-अ‍ॅड.अशोक चौधरी