शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पुराच्या दृष्टीने शेळगाव बॅरेजच्या तांत्रिक बदलाचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : भविष्याच्या दृष्टीने पुराचा त्रास होऊ नये, यासाठी शेळगाव बॅरेजच्या कामात केलेल्या तांत्रिक बदलाचा उल्लेख ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : भविष्याच्या दृष्टीने पुराचा त्रास होऊ नये, यासाठी शेळगाव बॅरेजच्या कामात केलेल्या तांत्रिक बदलाचा उल्लेख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करीत जिल्ह्यातील सकारात्मक बदलाचे उदाहरण इतर प्रकल्पांसाठी दिले आहे.

जनहिताच्या विकास प्रकल्पांविषयी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, समृद्धी महामार्ग या कामांमध्ये झालेल्या बदलासंदर्भात जळगाव जिल्ह्यात तापी नदीवरील शेळगाव बॅरेजचे उदाहरण दिले होते. यात एखादा प्रकल्प सुरू झाल्यानंतर त्याच्या रचनेत काही वेळा बदल करावा लागतो, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले होते. यात शेळगाव बॅरेजचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

तांत्रिक मात्र भविष्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय

शेळगाव बॅरेजचे काम सुरू झाल्यानंतर २०१०मध्ये प्रकल्पाची पातळी साडेनऊ मीटरने वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मुळात तापी नदी ही पुराच्या संदर्भात राज्यात सर्वात मोठी नदी मानली जाते. त्यादृष्टीने पुराचा विचार करीत भविष्यात त्रास होऊ नये व गावांनाही प्रकल्पामुळे बाधा होऊ नये, यासाठी प्रकल्पात तांत्रिक बदल करीत साडेनऊ मीटरने पातळी वाढविण्यात आली होती. २०० वर्षे राहणारा हा प्रकल्प असल्याने त्या दृष्टीने हे तांत्रिक बदल करावे लागल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, हा जनहिताचा निर्णय असल्याने जळगाव जिल्ह्यातील सकारात्मक निर्णय म्हणून त्याची दखल घेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी उल्लेख केला, हे विशेष.