शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

शहर गारठले, हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर वातावरणात मोठा बदल होत असून, गेल्या दोन दिवसांपासून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर वातावरणात मोठा बदल होत असून, गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्याचे वातावरण कोरडे आहे. यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांना कोणतीही आडकाठी नसल्याने जिल्ह्याचा तापमानात मोठी घट झाली आहे. मंगळवारी जळगाव शहरात यंदाच्या हंगामातील सर्वांत कमी म्हणजेच नऊ अंशांची नोंद करण्यात आली आहे. किमान तापमान ९ अंशांपर्यंत खाली घसरल्याने थंडीचा कडाका अधिक जाणवत आहे. ठिकठिकाणी नागरिक थंडीपासून बचावासाठी शेकोट्यांचा आधार घेत आहेत.

यंदा थंडीचे आगमन ऑक्टोबर महिन्यातच झाले होते. मात्र, त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात व डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातदेखील थंडी गायबच होती. सध्या उत्तरेकडून येणारे थंड वारे सक्रिय झाले आहेत. त्यामुळे गेल्या चार दिवसांत तापमानात मोठी घट झाली आहे.

आठ दिवसात १९ अंशांची घट

गेल्या सहा दिवसांत किमान तापमानात तब्बल १० अंशांची घट झाली आहे. गेल्या आठवड्यात अवकाळीमुळे किमान तापमानात वाढ झाली होती. आठ दिवसांपूर्वी किमान तापमान १९ अंशांवर होते. मात्र, मंगळवारी तापमान ९ अंशांपर्यंत खाली आहे. तसेच आगामी आठवडाभर तरी तापमान स्थिर राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. दरम्यान, कमाल तापमान फार काही घट झाली नसून, कमाल तापमान २९ ते ३१ अंशांवर स्थिर आहे.

रब्बीच्या पिकांना लाभ

कडाक्याच्या थंडीमुळे रब्बी हंगामाला मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. कडाक्याचा थंडीमुळे रब्बी पिकांना जास्त पाणी भरण्याचे काम पडत नाही. गहू व हरभऱ्याचा वाढीसाठीदेखील थंडी उपयोगाची ठरत आहे. तालुक्यात रब्बी हंगामाची जवळ-जवळ १०० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.

थंडी वाढण्याचे काय आहे कारण

आठवड्याभरात उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे प्रमाण कमी झाल्यामुळे तापमानात सारखी वाढ होती होती. मात्र, सोमवारी व मंगळवारी जम्मू-काश्मीरच्या पर्वतीय भागात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली. त्यानंतर उत्तर प्रदेशातील काही भागांत झालेल्या गारपिटीमुळे थंड वारे पुन्हा सक्रिय झाले आहे. तसेच त्या वाऱ्यांचा वेग व प्रमाणदेखील जास्त असल्याने पुन्हा थंडीचे आगमन जिल्ह्यात झाले असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

९ ते ११ किमी वेगाने वाहताहेत वारे

दोन दिवसांपासून जिल्ह्यात वाऱ्यांचा वेगदेखील वाढला आहे. जळगाव शहरात मंगळवारी ९ ते ११ किमी प्रतितास या वेगाने वारे वाहत असलेले पहायला मिळाले. दाब जास्त असल्याने वाऱ्यांचा वेग हा नेहमीच वाढत असतो. दरम्यान, अजून दोन दिवस ही स्थिती कायम राहण्याचा अंदाज असून, त्यानंतर उत्तरेकडील वाऱ्यांच वेग मंदावणार आहे.

असे कमी होत गेले तापमान

तारीख - किमान तापमान

१७ डिसेंबर - १७ अंश

१८ डिसेंबर - १६ अंश

१९ डिसेंबर- १४ अंश

२० डिसेंबर- १२ अंश

२१ डिसेंबर- १० अंश

२२ डिसेंबर - ९ अंश