शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
3
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
4
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
5
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
6
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
7
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
8
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
10
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
11
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
12
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
13
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
14
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
15
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
16
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
17
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
18
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
19
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
20
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय

शहर गारठले, हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर वातावरणात मोठा बदल होत असून, गेल्या दोन दिवसांपासून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर वातावरणात मोठा बदल होत असून, गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्याचे वातावरण कोरडे आहे. यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांना कोणतीही आडकाठी नसल्याने जिल्ह्याचा तापमानात मोठी घट झाली आहे. मंगळवारी जळगाव शहरात यंदाच्या हंगामातील सर्वांत कमी म्हणजेच नऊ अंशांची नोंद करण्यात आली आहे. किमान तापमान ९ अंशांपर्यंत खाली घसरल्याने थंडीचा कडाका अधिक जाणवत आहे. ठिकठिकाणी नागरिक थंडीपासून बचावासाठी शेकोट्यांचा आधार घेत आहेत.

यंदा थंडीचे आगमन ऑक्टोबर महिन्यातच झाले होते. मात्र, त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात व डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातदेखील थंडी गायबच होती. सध्या उत्तरेकडून येणारे थंड वारे सक्रिय झाले आहेत. त्यामुळे गेल्या चार दिवसांत तापमानात मोठी घट झाली आहे.

आठ दिवसात १९ अंशांची घट

गेल्या सहा दिवसांत किमान तापमानात तब्बल १० अंशांची घट झाली आहे. गेल्या आठवड्यात अवकाळीमुळे किमान तापमानात वाढ झाली होती. आठ दिवसांपूर्वी किमान तापमान १९ अंशांवर होते. मात्र, मंगळवारी तापमान ९ अंशांपर्यंत खाली आहे. तसेच आगामी आठवडाभर तरी तापमान स्थिर राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. दरम्यान, कमाल तापमान फार काही घट झाली नसून, कमाल तापमान २९ ते ३१ अंशांवर स्थिर आहे.

रब्बीच्या पिकांना लाभ

कडाक्याच्या थंडीमुळे रब्बी हंगामाला मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. कडाक्याचा थंडीमुळे रब्बी पिकांना जास्त पाणी भरण्याचे काम पडत नाही. गहू व हरभऱ्याचा वाढीसाठीदेखील थंडी उपयोगाची ठरत आहे. तालुक्यात रब्बी हंगामाची जवळ-जवळ १०० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.

थंडी वाढण्याचे काय आहे कारण

आठवड्याभरात उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे प्रमाण कमी झाल्यामुळे तापमानात सारखी वाढ होती होती. मात्र, सोमवारी व मंगळवारी जम्मू-काश्मीरच्या पर्वतीय भागात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली. त्यानंतर उत्तर प्रदेशातील काही भागांत झालेल्या गारपिटीमुळे थंड वारे पुन्हा सक्रिय झाले आहे. तसेच त्या वाऱ्यांचा वेग व प्रमाणदेखील जास्त असल्याने पुन्हा थंडीचे आगमन जिल्ह्यात झाले असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

९ ते ११ किमी वेगाने वाहताहेत वारे

दोन दिवसांपासून जिल्ह्यात वाऱ्यांचा वेगदेखील वाढला आहे. जळगाव शहरात मंगळवारी ९ ते ११ किमी प्रतितास या वेगाने वारे वाहत असलेले पहायला मिळाले. दाब जास्त असल्याने वाऱ्यांचा वेग हा नेहमीच वाढत असतो. दरम्यान, अजून दोन दिवस ही स्थिती कायम राहण्याचा अंदाज असून, त्यानंतर उत्तरेकडील वाऱ्यांच वेग मंदावणार आहे.

असे कमी होत गेले तापमान

तारीख - किमान तापमान

१७ डिसेंबर - १७ अंश

१८ डिसेंबर - १६ अंश

१९ डिसेंबर- १४ अंश

२० डिसेंबर- १२ अंश

२१ डिसेंबर- १० अंश

२२ डिसेंबर - ९ अंश