शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
3
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
4
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
5
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
6
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
7
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
8
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
9
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
10
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
11
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
12
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
13
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
14
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
15
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
16
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
17
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
18
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
19
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
20
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?

शहर गारठले, हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर वातावरणात मोठा बदल होत असून, गेल्या दोन दिवसांपासून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर वातावरणात मोठा बदल होत असून, गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्याचे वातावरण कोरडे आहे. यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांना कोणतीही आडकाठी नसल्याने जिल्ह्याचा तापमानात मोठी घट झाली आहे. मंगळवारी जळगाव शहरात यंदाच्या हंगामातील सर्वांत कमी म्हणजेच नऊ अंशांची नोंद करण्यात आली आहे. किमान तापमान ९ अंशांपर्यंत खाली घसरल्याने थंडीचा कडाका अधिक जाणवत आहे. ठिकठिकाणी नागरिक थंडीपासून बचावासाठी शेकोट्यांचा आधार घेत आहेत.

यंदा थंडीचे आगमन ऑक्टोबर महिन्यातच झाले होते. मात्र, त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात व डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातदेखील थंडी गायबच होती. सध्या उत्तरेकडून येणारे थंड वारे सक्रिय झाले आहेत. त्यामुळे गेल्या चार दिवसांत तापमानात मोठी घट झाली आहे.

आठ दिवसात १९ अंशांची घट

गेल्या सहा दिवसांत किमान तापमानात तब्बल १० अंशांची घट झाली आहे. गेल्या आठवड्यात अवकाळीमुळे किमान तापमानात वाढ झाली होती. आठ दिवसांपूर्वी किमान तापमान १९ अंशांवर होते. मात्र, मंगळवारी तापमान ९ अंशांपर्यंत खाली आहे. तसेच आगामी आठवडाभर तरी तापमान स्थिर राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. दरम्यान, कमाल तापमान फार काही घट झाली नसून, कमाल तापमान २९ ते ३१ अंशांवर स्थिर आहे.

रब्बीच्या पिकांना लाभ

कडाक्याच्या थंडीमुळे रब्बी हंगामाला मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. कडाक्याचा थंडीमुळे रब्बी पिकांना जास्त पाणी भरण्याचे काम पडत नाही. गहू व हरभऱ्याचा वाढीसाठीदेखील थंडी उपयोगाची ठरत आहे. तालुक्यात रब्बी हंगामाची जवळ-जवळ १०० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.

थंडी वाढण्याचे काय आहे कारण

आठवड्याभरात उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे प्रमाण कमी झाल्यामुळे तापमानात सारखी वाढ होती होती. मात्र, सोमवारी व मंगळवारी जम्मू-काश्मीरच्या पर्वतीय भागात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली. त्यानंतर उत्तर प्रदेशातील काही भागांत झालेल्या गारपिटीमुळे थंड वारे पुन्हा सक्रिय झाले आहे. तसेच त्या वाऱ्यांचा वेग व प्रमाणदेखील जास्त असल्याने पुन्हा थंडीचे आगमन जिल्ह्यात झाले असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

९ ते ११ किमी वेगाने वाहताहेत वारे

दोन दिवसांपासून जिल्ह्यात वाऱ्यांचा वेगदेखील वाढला आहे. जळगाव शहरात मंगळवारी ९ ते ११ किमी प्रतितास या वेगाने वारे वाहत असलेले पहायला मिळाले. दाब जास्त असल्याने वाऱ्यांचा वेग हा नेहमीच वाढत असतो. दरम्यान, अजून दोन दिवस ही स्थिती कायम राहण्याचा अंदाज असून, त्यानंतर उत्तरेकडील वाऱ्यांच वेग मंदावणार आहे.

असे कमी होत गेले तापमान

तारीख - किमान तापमान

१७ डिसेंबर - १७ अंश

१८ डिसेंबर - १६ अंश

१९ डिसेंबर- १४ अंश

२० डिसेंबर- १२ अंश

२१ डिसेंबर- १० अंश

२२ डिसेंबर - ९ अंश