शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange: "ही ओबीसीची सभा नसून..." बीडमधील महाएल्गार सभेवर मनोज जरांगेंची टीका
2
Goa Cylinder Blast: दक्षिण गोव्यातील विजय मरीनमध्ये सिलेंडरचा स्फोट; २ ठार, ५ जखमी
3
एकजुटीचा प्रकाश... मनसेच्या 'दीपोत्सवा'त उद्धव ठाकरेंचं ५५ शब्दांचं भाषण, काय संदेश दिला?
4
Rivaba Jadeja Minister: रिवाबा जडेजा यांना कोणतं खातं मिळालं, गुजरातचे नवे गृहमंत्री कोण? खातेवाटप जाहीर
5
चीनमध्ये राजकीय धमाका! जिनपिंग यांचे 'उत्तराधिकारी' वेइडोंगना अचानक पदावरून हटवले, कारण...
6
खरं उद्धट कोण? बिग बींसमोर बसलेला १० वर्षांचा मुलगा, की... क्रिकेटरची विचार करायला भाग पाडणारी पोस्ट
7
'उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय आणि उरले फक्त खान'; भाजपने राज ठाकरेंचा व्हिडीओच दाखवला
8
Politics: "क्षण आनंदाचा, सण नात्यांचा" ठाकरे कुटुंबाकडून दिवाळीच्या खास शुभेच्छा! फोटो व्हायरल
9
Naxal-free: 'आम्ही नक्षलवादी नाही' गडचिरोलीतील चारभट्टी गाव नक्षलमुक्त होताच गावकऱ्यांना अश्रू अनावर
10
दिसायला देवकन्या, पण काम न शोभणारं; अनेक तरुणांना प्रेमाची मिठी देणारी काजल पकडली
11
७५ बसस्थानकांवर मोफत 'वाचन कट्टा'; PM मोदींच्या 'पंचाहत्तरी'निमित्त एसटीचा अनोखा उपक्रम!
12
माझं तुझ्यावर प्रेम नाहीये..; तरूणीने दिला नकार; संतापलेल्या तरूणाने मग भररस्त्यातच...
13
महाराष्ट्र सरकारने गौमातेला दिलेला राज्य मातेचा दर्जा कागदावरच, स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची टीका 
14
दिवाळीत ट्राय करा या फोटोशूट पोझ, दिसाल एकदम खास, प्रत्येक पोस्टवर होईल लाईक्सची बरसात
15
लाल दहशतीचा अंत! छत्तीसगडमध्ये 210 माओवाद्यांचे आत्मसमर्पण; बस्तर नक्षलमुक्त...
16
Gujarat Cabinet Reshuffle: काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जून मोढवाडिया गुजरात सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री
17
Ajit Agarkar: शमी टीम इंडियामधून का बाहेर? रोहित- कोहली वर्ल्डकप खेळतील का? आगरकर म्हणाले.
18
विदर्भ हादरला! पतीसोबत पूजाचं बिनसलं, एक्स बॉयफ्रेंड शुभमसोबत पुन्हा प्रेमसंबंध अन् झाला भयंकर शेवट
19
'तिच्या'आवाजाला भुलला अन् दोन कोटी गमावून बसला; नाशिकच्या उद्योजकासोबत फेसबुकवर काय घडले?
20
IND vs AUS : कॅप्टन्सीवरून हटवण्यात आल्यावर रोहित शर्मा पहिल्यांदाच कोच गंभीर यांना भेटला अन्.... (VIDEO)

जामनेर वॉटर कप स्पर्धेचा मिळालेला पुरस्कार चिंचोली पिंप्री ग्रामस्थांनी केला परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 15:06 IST

पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत जामनेर तालुक्यातून चिंचोली पिंप्री गावाने प्रथम क्रमांक पटकावला होता. मात्र गावाचे ग्रामस्थ व सरपंच यांनी १३ रोजी गावात ग्रामसभा घेऊन हे बक्षीस व पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला व आज १२ वाजता जवळपास ३०० ते ४०० ग्रामस्थ तहसील कार्यालयावर धडकले व तहसीलदार नामदेव टिळेकर यांना हा पुरस्कार परत केला व निवेदन दिले.

ठळक मुद्दे राज्यस्तरीय पुस्कारांमध्ये डावलल्याचा केला आरोपतहसीलदारांना पुरस्कार केला परत

मोहन सारस्वत/लियाकत सैयदजामनेर, जि.जळगाव : पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत जामनेर तालुक्यातून चिंचोली पिंप्री गावाने प्रथम क्रमांक पटकावला होता. मात्र गावाचे ग्रामस्थ व सरपंच यांनी १३ रोजी गावात ग्रामसभा घेऊन हे बक्षीस व पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला व आज १२ वाजता जवळपास ३०० ते ४०० ग्रामस्थ तहसील कार्यालयावर धडकले व तहसीलदार नामदेव टिळेकर यांना हा पुरस्कार परत केला व निवेदन दिले.दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सत्यमेव जयते वॉटर कप २०१९ स्पर्धेत चिंचोली पिंप्री या गावाने सहभाग घेऊन संपूर्ण गावाने एकत्र येऊन जलसंधारणाची विविध कामे पूर्ण केलेली आहे. दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त काम करून चिंचोली पिंप्री या गावाची ओळख निर्माण केली आहे. या कामासाठी गावातील लहान बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनी अतोनात मेहनत करुन काम पूर्ण केले. त्यामध्ये गावातील महिलांचा सहभाग लक्षणीय होता. पाणी फाउंडेशनमधील तज्ज्ञांच्या मते चिंंचोली पिंप्रीतील काम गुणवत्तापूर्वक असून, चिंंचोली पिंप्री हे गाव राज्यात प्रथम तीनमध्ये येण्यास पात्र आहे.परंतु १२ आॅगस्ट रोजी बालेवाडी स्टेडियम पुणे येथे या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमामध्ये करण्यात आलेल्या प्रेझेन्टेशनमध्ये जे फुटेच दाखविण्यात आले आहे ते जवळपास ८० टक्के फुटेच चिंचोली पिंप्री येथील होते. परंतु आमच्या गावाचा पहिल्या तीनमध्ये नंबर आलेला नाही. त्यातूनच गावातील गावकऱ्यांच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकली. जर आमचे गाव पहिल्या तीनमध्ये येण्यास पात्र नव्हते तरआमच्या गावाचे ८० टक्के पुढेच का दाखविले. विजेते गावाचे फोटोज नव्हते का, असा प्रश्नचिन्ह गावातील ग्रामस्थांनी निर्माण झाला आहे. झालेल्या सर्व प्रकारानंतर संपूर्ण गावकऱ्यांमध्ये आपणास डावललेल्या गेल्याची भावना निर्माण झाली. म्हणून राज्यस्तरी पुरस्कारामध्ये डावललेल्या गेल्याची भावना निर्माण झाली असून आम्ही सर्व गावकºयांनी जामनेर तालुकास्तरीय प्रथम पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तरी आमच्या सर्व गावकºयांच्या भावनांचा आदर राखून सदर पुरस्कार परत घेऊन पाणी फाउंडेशनला परत पाठवावा, असे तहसीलदारांना दिलेले निवेदनात म्हटले आहे. दिलेल्या निवेदनावर ५०० गावकºयांच्या स्वाक्षºया आहे.दरम्यान, राज्यस्तरीय समिती गावात मूल्यमापन करण्यासाठी आली असता समितीचे पोपटराव पवार यांनी गावात केलेल्या कामाची धावती पाहणी केली, असाही आरोप ग्रामस्थांनी केला आहे.संबंधित गावकºयांशी चर्चा करून पुरस्कार परत न करण्याबाबत चर्चा करून विनंती केली. तथापि, त्यांचा पुरस्कार परत करण्याचा निर्णय अंतिम असल्याने पुरस्कार परत स्वीकारून पाणी फाउंडेशन कडे पाठवणार आहे.-नामदेव टिळेकर, तहसीलदार, जामनेरहा निर्णय गावकºयांचा आहे आणि मी सरपंच या नात्याने त्यांच्यामागे खंबीरपणे उभे आहे.-विनोद चौधरी, सरपंच, चिंचोली पिंप्रीग्रामस्थ यांनी निवेदनात विचारलेले काही प्रश्न१) एखादी परीक्षा दिल्यानंतर त्याची उत्तरपत्रिका मिळते. त्यातून आपल्याला समजते की आपण कुठे चुकलो व त्यानुसार आपण भविष्यात त्यावर सुधारणा करतो. त्याप्रमाणे या स्पर्धेमध्ये आम्ही कुठे चुकलो कमी पडलो हे समजेल का?२) जर चिंचोली पिंप्री गाव राज्यात प्रथम तीनमध्ये येण्यास पात्र नव्हते तर विजेते गावाचे सोडून आमच्या गावाचे फुटेज जवळपास ८० टक्के का दाखविण्यात आले. विजेत्या गावाचे फुटेज नव्हते का?३) नाला जोड प्रकल्पातील डीप सीसीटीचा तांत्रिक मुद्दा विचारात घेऊन जर आमचा नंबर कापला गेला असेल तर मास्टर टेक्निकल ट्रेनर यांच्या सल्ल्यानुसारच हे काम केले होते त्याचे काय?४) गावाची किंवा रंगरंगोटी यातून कुठलाही पाणी साठा निर्माण होत नाही मग या स्पर्धेमध्ये याला एवढे महत्व का दिले जाते?५) विजेता निवडताना स्थानिक भौगोलिक परिस्थितीचा विचार का केला जात नाही.  

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धाJamnerजामनेर