शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

जामनेर वॉटर कप स्पर्धेचा मिळालेला पुरस्कार चिंचोली पिंप्री ग्रामस्थांनी केला परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 15:06 IST

पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत जामनेर तालुक्यातून चिंचोली पिंप्री गावाने प्रथम क्रमांक पटकावला होता. मात्र गावाचे ग्रामस्थ व सरपंच यांनी १३ रोजी गावात ग्रामसभा घेऊन हे बक्षीस व पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला व आज १२ वाजता जवळपास ३०० ते ४०० ग्रामस्थ तहसील कार्यालयावर धडकले व तहसीलदार नामदेव टिळेकर यांना हा पुरस्कार परत केला व निवेदन दिले.

ठळक मुद्दे राज्यस्तरीय पुस्कारांमध्ये डावलल्याचा केला आरोपतहसीलदारांना पुरस्कार केला परत

मोहन सारस्वत/लियाकत सैयदजामनेर, जि.जळगाव : पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत जामनेर तालुक्यातून चिंचोली पिंप्री गावाने प्रथम क्रमांक पटकावला होता. मात्र गावाचे ग्रामस्थ व सरपंच यांनी १३ रोजी गावात ग्रामसभा घेऊन हे बक्षीस व पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला व आज १२ वाजता जवळपास ३०० ते ४०० ग्रामस्थ तहसील कार्यालयावर धडकले व तहसीलदार नामदेव टिळेकर यांना हा पुरस्कार परत केला व निवेदन दिले.दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सत्यमेव जयते वॉटर कप २०१९ स्पर्धेत चिंचोली पिंप्री या गावाने सहभाग घेऊन संपूर्ण गावाने एकत्र येऊन जलसंधारणाची विविध कामे पूर्ण केलेली आहे. दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त काम करून चिंचोली पिंप्री या गावाची ओळख निर्माण केली आहे. या कामासाठी गावातील लहान बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनी अतोनात मेहनत करुन काम पूर्ण केले. त्यामध्ये गावातील महिलांचा सहभाग लक्षणीय होता. पाणी फाउंडेशनमधील तज्ज्ञांच्या मते चिंंचोली पिंप्रीतील काम गुणवत्तापूर्वक असून, चिंंचोली पिंप्री हे गाव राज्यात प्रथम तीनमध्ये येण्यास पात्र आहे.परंतु १२ आॅगस्ट रोजी बालेवाडी स्टेडियम पुणे येथे या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमामध्ये करण्यात आलेल्या प्रेझेन्टेशनमध्ये जे फुटेच दाखविण्यात आले आहे ते जवळपास ८० टक्के फुटेच चिंचोली पिंप्री येथील होते. परंतु आमच्या गावाचा पहिल्या तीनमध्ये नंबर आलेला नाही. त्यातूनच गावातील गावकऱ्यांच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकली. जर आमचे गाव पहिल्या तीनमध्ये येण्यास पात्र नव्हते तरआमच्या गावाचे ८० टक्के पुढेच का दाखविले. विजेते गावाचे फोटोज नव्हते का, असा प्रश्नचिन्ह गावातील ग्रामस्थांनी निर्माण झाला आहे. झालेल्या सर्व प्रकारानंतर संपूर्ण गावकऱ्यांमध्ये आपणास डावललेल्या गेल्याची भावना निर्माण झाली. म्हणून राज्यस्तरी पुरस्कारामध्ये डावललेल्या गेल्याची भावना निर्माण झाली असून आम्ही सर्व गावकºयांनी जामनेर तालुकास्तरीय प्रथम पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तरी आमच्या सर्व गावकºयांच्या भावनांचा आदर राखून सदर पुरस्कार परत घेऊन पाणी फाउंडेशनला परत पाठवावा, असे तहसीलदारांना दिलेले निवेदनात म्हटले आहे. दिलेल्या निवेदनावर ५०० गावकºयांच्या स्वाक्षºया आहे.दरम्यान, राज्यस्तरीय समिती गावात मूल्यमापन करण्यासाठी आली असता समितीचे पोपटराव पवार यांनी गावात केलेल्या कामाची धावती पाहणी केली, असाही आरोप ग्रामस्थांनी केला आहे.संबंधित गावकºयांशी चर्चा करून पुरस्कार परत न करण्याबाबत चर्चा करून विनंती केली. तथापि, त्यांचा पुरस्कार परत करण्याचा निर्णय अंतिम असल्याने पुरस्कार परत स्वीकारून पाणी फाउंडेशन कडे पाठवणार आहे.-नामदेव टिळेकर, तहसीलदार, जामनेरहा निर्णय गावकºयांचा आहे आणि मी सरपंच या नात्याने त्यांच्यामागे खंबीरपणे उभे आहे.-विनोद चौधरी, सरपंच, चिंचोली पिंप्रीग्रामस्थ यांनी निवेदनात विचारलेले काही प्रश्न१) एखादी परीक्षा दिल्यानंतर त्याची उत्तरपत्रिका मिळते. त्यातून आपल्याला समजते की आपण कुठे चुकलो व त्यानुसार आपण भविष्यात त्यावर सुधारणा करतो. त्याप्रमाणे या स्पर्धेमध्ये आम्ही कुठे चुकलो कमी पडलो हे समजेल का?२) जर चिंचोली पिंप्री गाव राज्यात प्रथम तीनमध्ये येण्यास पात्र नव्हते तर विजेते गावाचे सोडून आमच्या गावाचे फुटेज जवळपास ८० टक्के का दाखविण्यात आले. विजेत्या गावाचे फुटेज नव्हते का?३) नाला जोड प्रकल्पातील डीप सीसीटीचा तांत्रिक मुद्दा विचारात घेऊन जर आमचा नंबर कापला गेला असेल तर मास्टर टेक्निकल ट्रेनर यांच्या सल्ल्यानुसारच हे काम केले होते त्याचे काय?४) गावाची किंवा रंगरंगोटी यातून कुठलाही पाणी साठा निर्माण होत नाही मग या स्पर्धेमध्ये याला एवढे महत्व का दिले जाते?५) विजेता निवडताना स्थानिक भौगोलिक परिस्थितीचा विचार का केला जात नाही.  

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धाJamnerजामनेर