शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जामनेर वॉटर कप स्पर्धेचा मिळालेला पुरस्कार चिंचोली पिंप्री ग्रामस्थांनी केला परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 15:06 IST

पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत जामनेर तालुक्यातून चिंचोली पिंप्री गावाने प्रथम क्रमांक पटकावला होता. मात्र गावाचे ग्रामस्थ व सरपंच यांनी १३ रोजी गावात ग्रामसभा घेऊन हे बक्षीस व पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला व आज १२ वाजता जवळपास ३०० ते ४०० ग्रामस्थ तहसील कार्यालयावर धडकले व तहसीलदार नामदेव टिळेकर यांना हा पुरस्कार परत केला व निवेदन दिले.

ठळक मुद्दे राज्यस्तरीय पुस्कारांमध्ये डावलल्याचा केला आरोपतहसीलदारांना पुरस्कार केला परत

मोहन सारस्वत/लियाकत सैयदजामनेर, जि.जळगाव : पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत जामनेर तालुक्यातून चिंचोली पिंप्री गावाने प्रथम क्रमांक पटकावला होता. मात्र गावाचे ग्रामस्थ व सरपंच यांनी १३ रोजी गावात ग्रामसभा घेऊन हे बक्षीस व पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला व आज १२ वाजता जवळपास ३०० ते ४०० ग्रामस्थ तहसील कार्यालयावर धडकले व तहसीलदार नामदेव टिळेकर यांना हा पुरस्कार परत केला व निवेदन दिले.दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सत्यमेव जयते वॉटर कप २०१९ स्पर्धेत चिंचोली पिंप्री या गावाने सहभाग घेऊन संपूर्ण गावाने एकत्र येऊन जलसंधारणाची विविध कामे पूर्ण केलेली आहे. दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त काम करून चिंचोली पिंप्री या गावाची ओळख निर्माण केली आहे. या कामासाठी गावातील लहान बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनी अतोनात मेहनत करुन काम पूर्ण केले. त्यामध्ये गावातील महिलांचा सहभाग लक्षणीय होता. पाणी फाउंडेशनमधील तज्ज्ञांच्या मते चिंंचोली पिंप्रीतील काम गुणवत्तापूर्वक असून, चिंंचोली पिंप्री हे गाव राज्यात प्रथम तीनमध्ये येण्यास पात्र आहे.परंतु १२ आॅगस्ट रोजी बालेवाडी स्टेडियम पुणे येथे या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमामध्ये करण्यात आलेल्या प्रेझेन्टेशनमध्ये जे फुटेच दाखविण्यात आले आहे ते जवळपास ८० टक्के फुटेच चिंचोली पिंप्री येथील होते. परंतु आमच्या गावाचा पहिल्या तीनमध्ये नंबर आलेला नाही. त्यातूनच गावातील गावकऱ्यांच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकली. जर आमचे गाव पहिल्या तीनमध्ये येण्यास पात्र नव्हते तरआमच्या गावाचे ८० टक्के पुढेच का दाखविले. विजेते गावाचे फोटोज नव्हते का, असा प्रश्नचिन्ह गावातील ग्रामस्थांनी निर्माण झाला आहे. झालेल्या सर्व प्रकारानंतर संपूर्ण गावकऱ्यांमध्ये आपणास डावललेल्या गेल्याची भावना निर्माण झाली. म्हणून राज्यस्तरी पुरस्कारामध्ये डावललेल्या गेल्याची भावना निर्माण झाली असून आम्ही सर्व गावकºयांनी जामनेर तालुकास्तरीय प्रथम पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तरी आमच्या सर्व गावकºयांच्या भावनांचा आदर राखून सदर पुरस्कार परत घेऊन पाणी फाउंडेशनला परत पाठवावा, असे तहसीलदारांना दिलेले निवेदनात म्हटले आहे. दिलेल्या निवेदनावर ५०० गावकºयांच्या स्वाक्षºया आहे.दरम्यान, राज्यस्तरीय समिती गावात मूल्यमापन करण्यासाठी आली असता समितीचे पोपटराव पवार यांनी गावात केलेल्या कामाची धावती पाहणी केली, असाही आरोप ग्रामस्थांनी केला आहे.संबंधित गावकºयांशी चर्चा करून पुरस्कार परत न करण्याबाबत चर्चा करून विनंती केली. तथापि, त्यांचा पुरस्कार परत करण्याचा निर्णय अंतिम असल्याने पुरस्कार परत स्वीकारून पाणी फाउंडेशन कडे पाठवणार आहे.-नामदेव टिळेकर, तहसीलदार, जामनेरहा निर्णय गावकºयांचा आहे आणि मी सरपंच या नात्याने त्यांच्यामागे खंबीरपणे उभे आहे.-विनोद चौधरी, सरपंच, चिंचोली पिंप्रीग्रामस्थ यांनी निवेदनात विचारलेले काही प्रश्न१) एखादी परीक्षा दिल्यानंतर त्याची उत्तरपत्रिका मिळते. त्यातून आपल्याला समजते की आपण कुठे चुकलो व त्यानुसार आपण भविष्यात त्यावर सुधारणा करतो. त्याप्रमाणे या स्पर्धेमध्ये आम्ही कुठे चुकलो कमी पडलो हे समजेल का?२) जर चिंचोली पिंप्री गाव राज्यात प्रथम तीनमध्ये येण्यास पात्र नव्हते तर विजेते गावाचे सोडून आमच्या गावाचे फुटेज जवळपास ८० टक्के का दाखविण्यात आले. विजेत्या गावाचे फुटेज नव्हते का?३) नाला जोड प्रकल्पातील डीप सीसीटीचा तांत्रिक मुद्दा विचारात घेऊन जर आमचा नंबर कापला गेला असेल तर मास्टर टेक्निकल ट्रेनर यांच्या सल्ल्यानुसारच हे काम केले होते त्याचे काय?४) गावाची किंवा रंगरंगोटी यातून कुठलाही पाणी साठा निर्माण होत नाही मग या स्पर्धेमध्ये याला एवढे महत्व का दिले जाते?५) विजेता निवडताना स्थानिक भौगोलिक परिस्थितीचा विचार का केला जात नाही.  

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धाJamnerजामनेर