शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

भागपूर उपसा सिंचन योजनेच्या कामाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभाच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 22:43 IST

दोन दशकांपासून मंजुरी मिळून रखडलाय प्रकल्प

ठळक मुद्दे जळगाव, जामनेर तालुक्याला लाभनिधीअभावी कामाला सुरूवातच नाही१८१४१ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार

आॅनलाईन लोकमत,जळगाव, दि.२७- भागपूर उपसा सिंचन योजनेच्या कामाला मंजुरी मिळून आता सुमारे दोन दशकांचा कालावधी उलटला, मात्र निधीअभावी हे काम अद्यापही सुरूच झालेले नाही. या योजनेत नंतर समाविष्ट केलेले बंधाºयाच्या उंचीवाढीचे काम तेवढे पूर्ण झाले आहे. आता या योजनेच्या कामाचा मुख्यमंत्र्यांच्या पुढील आठवड्यातील दौºयात उद्घाटन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.प्रशासकीय मान्यतेचा घोळया योजनेस तापी पाटबंधारे महामंडळाने १ मार्च १९९९ रोजी प्रशासकीय मान्यता दिली होती. त्यावेळी या योजनेचा खर्च ४३८ कोटी १४ लाख ५४ हजार रुपये होता. मात्र हा प्रकल्प सुरू न झाल्याने प्रकल्प खर्चात वाढ झाली. १ सप्टेंबर १९९९ रोजी या प्रकल्पाच्या ५५७ कोटी २ लाख १४ हजार रुपये किंमतीस तापी महामंडळाने नव्याने प्रशासकीय मान्यता दिली. आता या किंमतीत आणखी वाढ झाली आहे.अशी आहे योजना...या योजनेंतर्गत भागपूर उपसा सिंचन योजना व शिरसोली-२ लघु पाटबंधारे तलाव प्रकल्पाचा समावेश आहे. या योजनेंतर्गत तापी नदीवरील शेळगाव बॅरेजच्या जलाशयातून वाघूरमध्ये येणारे पुराचे पाणी वाघूर नदीच्या काठावर कडगाव गावाजवळ जॅकवेल बांधून उचलण्यात येणार आहे. जॅकवेलपासून रायझिंग मेन द्वारे दोन टप्प्यात पाईपलाईनद्वारे भागपूर धरणात पाणी साठविणे प्रस्तावित आहे. त्यासाठी १८८.५० दलघमी साठवण क्षमतेचे भागपूर धरण बांधणे प्रस्तावित आहे. तसेच शिरसोली-२ या लघु पाटबंधारे तलावाची उंची वाढवून १.३९ दलघमी पाणीसाठा वाढविणे या योजनेत समाविष्ट आहे.  १८१४१  हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणारभागपूर मध्ये १८८.५० दलघमी पाणी साठा होणार आहे. भागपूर धरणाच्या मागच्या उंच भागास उपसा सिंचनाने १७ हजार ८३० हेक्टर क्षेत्राला सिंचनासाठी पाणी पुरविण्यात येईल. तसेच या धरणातून जळगाव शहरासाठी ८१.३४ दलघमी (२.८७ टीएमसी) पाणीसाठा ठेवण्यात आला आहे. तर शिरसोली-२ (नायगाव) ल.पा. तलावात २.४० दलघमी पाणीसाठा होणार असून त्यामुळे या परिसरातील ३११ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. प्रवाही पद्धतीने हे सिंचन होणार आहे. या योजनेमुळे एकूण १८१४१ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.जळगाव व जामनेर तालुक्याला याचा लाभ होणार आहे.भागपूरचे होणार पुनवर्सनया उपसा योजनेसाठी ७४२ हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. यापैकी २७९ हेक्टर वनजमीन आहे. या वनजमीनीबाबतची परवानगी मे २००२ मध्ये मिळाली आहे. तर पर्यावरण विभागाची मान्यताही आॅक्टोबर २००२ मध्ये मिळाली आहे.तर या प्रकल्पाला केंद्रीय जलआयोगाची तत्वत मान्यता जून २००२ मध्ये प्राप्त झाली