शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

भागपूर उपसा सिंचन योजनेच्या कामाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभाच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 22:43 IST

दोन दशकांपासून मंजुरी मिळून रखडलाय प्रकल्प

ठळक मुद्दे जळगाव, जामनेर तालुक्याला लाभनिधीअभावी कामाला सुरूवातच नाही१८१४१ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार

आॅनलाईन लोकमत,जळगाव, दि.२७- भागपूर उपसा सिंचन योजनेच्या कामाला मंजुरी मिळून आता सुमारे दोन दशकांचा कालावधी उलटला, मात्र निधीअभावी हे काम अद्यापही सुरूच झालेले नाही. या योजनेत नंतर समाविष्ट केलेले बंधाºयाच्या उंचीवाढीचे काम तेवढे पूर्ण झाले आहे. आता या योजनेच्या कामाचा मुख्यमंत्र्यांच्या पुढील आठवड्यातील दौºयात उद्घाटन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.प्रशासकीय मान्यतेचा घोळया योजनेस तापी पाटबंधारे महामंडळाने १ मार्च १९९९ रोजी प्रशासकीय मान्यता दिली होती. त्यावेळी या योजनेचा खर्च ४३८ कोटी १४ लाख ५४ हजार रुपये होता. मात्र हा प्रकल्प सुरू न झाल्याने प्रकल्प खर्चात वाढ झाली. १ सप्टेंबर १९९९ रोजी या प्रकल्पाच्या ५५७ कोटी २ लाख १४ हजार रुपये किंमतीस तापी महामंडळाने नव्याने प्रशासकीय मान्यता दिली. आता या किंमतीत आणखी वाढ झाली आहे.अशी आहे योजना...या योजनेंतर्गत भागपूर उपसा सिंचन योजना व शिरसोली-२ लघु पाटबंधारे तलाव प्रकल्पाचा समावेश आहे. या योजनेंतर्गत तापी नदीवरील शेळगाव बॅरेजच्या जलाशयातून वाघूरमध्ये येणारे पुराचे पाणी वाघूर नदीच्या काठावर कडगाव गावाजवळ जॅकवेल बांधून उचलण्यात येणार आहे. जॅकवेलपासून रायझिंग मेन द्वारे दोन टप्प्यात पाईपलाईनद्वारे भागपूर धरणात पाणी साठविणे प्रस्तावित आहे. त्यासाठी १८८.५० दलघमी साठवण क्षमतेचे भागपूर धरण बांधणे प्रस्तावित आहे. तसेच शिरसोली-२ या लघु पाटबंधारे तलावाची उंची वाढवून १.३९ दलघमी पाणीसाठा वाढविणे या योजनेत समाविष्ट आहे.  १८१४१  हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणारभागपूर मध्ये १८८.५० दलघमी पाणी साठा होणार आहे. भागपूर धरणाच्या मागच्या उंच भागास उपसा सिंचनाने १७ हजार ८३० हेक्टर क्षेत्राला सिंचनासाठी पाणी पुरविण्यात येईल. तसेच या धरणातून जळगाव शहरासाठी ८१.३४ दलघमी (२.८७ टीएमसी) पाणीसाठा ठेवण्यात आला आहे. तर शिरसोली-२ (नायगाव) ल.पा. तलावात २.४० दलघमी पाणीसाठा होणार असून त्यामुळे या परिसरातील ३११ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. प्रवाही पद्धतीने हे सिंचन होणार आहे. या योजनेमुळे एकूण १८१४१ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.जळगाव व जामनेर तालुक्याला याचा लाभ होणार आहे.भागपूरचे होणार पुनवर्सनया उपसा योजनेसाठी ७४२ हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. यापैकी २७९ हेक्टर वनजमीन आहे. या वनजमीनीबाबतची परवानगी मे २००२ मध्ये मिळाली आहे. तर पर्यावरण विभागाची मान्यताही आॅक्टोबर २००२ मध्ये मिळाली आहे.तर या प्रकल्पाला केंद्रीय जलआयोगाची तत्वत मान्यता जून २००२ मध्ये प्राप्त झाली