शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

जैन धर्मीयांच्या चातुर्मासाला २३ जुलैपासून प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:13 IST

चातुर्मासामुळे मुनी श्रींचा, महाराजांचा, माताजींचा, सतीया जींचा आदी तपस्वींची मंगल विहार पदयात्रा थांबणार आहे. तपस्वी ज्या स्थळी असतील,. ...

चातुर्मासामुळे मुनी श्रींचा, महाराजांचा, माताजींचा, सतीया जींचा आदी तपस्वींची मंगल विहार पदयात्रा थांबणार आहे. तपस्वी ज्या स्थळी असतील,. त्या स्थळी वर्षा योग किंवा वरुण योग अर्थात चातुर्मास स्थापना करतील, अशी माहिती खान्देश जैन समाजाचे प्रसिद्धिप्रमुख व खान्देश जैन पत्रकार सतीश वसंतीलाल जैन यांनी दिली. चार महिने एकाच ठिकाणी तपस्वींचे वास्तव्य राहणार असून त्यास वर्षा योग अर्थात चातुर्मास म्हणतात. असाच योग खान्देशातील कुसुंबा येथे सोळा वर्षानंतर चातुर्मासाचा लाभ मिळणार आहे.

हजारो मैल पदयात्रा करत तपस्वी सम्राट दिगंबर आचार्य सुनील सागरजी महामुनी श्री यांचे परमशिष्य प. पू. सुदेह सागरजी महाराज यांचे कुसुंबा नगरीत आगमन झाले. त्यांचा चातुर्मास स्थापना दि. २५ जुलै रोजी प्रथा परंपरेनुसार धार्मिक कार्यक्रमाने संपन्न होणार आहे. चार महिने तपस्वी एकाच ठिकाणी वास्तव्याला राहत असल्याने चातुर्मासाचे औचित्य साधून आध्यात्मिक मार्गदर्शन करीत असतात. हजारो शिक्षक मिळून जे काम होऊ शकत नाही, ते काम तपस्वी साधूंच्या मार्गदर्शनाने तसेच संगत गुणाने सहज होते. वर्षायोगाच्या काळात समाजात एक नवीन प्रेरणा जागृत होते. ज्या गावात, ज्या शहरात, जिथे जिथे चातुर्मास सुरू होतो, तिथे तिथे वातावरणात एक आगळे-वेगळे चैतन्य निर्माण होते.

बालकांमध्ये नैतिकता व सद्गुणांचे बीज पेरले जाते. वृद्धांमध्ये विरक्त व संन्यासाची भावना जागृत होते. युवक वर्ग व्यसनांपासून बचाव करण्याचा प्रयत्न करतो. आत्मिक तपस्या वृद्धिंगत करण्यासाठी चातुर्मास फार महत्त्वाची भूमिका बजावतो. त्या चार महिन्याच्या कालावधीत साधू महात्म्यांचा सहवास राहिल्याने अनेक जणांमध्ये आमूलाग्र परिवर्तन घडून येते. पूज्य श्रींच्या सानिध्यात पंकज नगिनदास जैन यांच्यातर्फे मंदिरात दिनांक १६ जुलै ते २३ जुलैपर्यंत विश्वशांती महायज्ञ व सिद्ध चक्र महामंडल विधान महापूजा संपन्न होत आहे.