शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांचे 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
2
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
3
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
4
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
5
Happy Birthday Google! २७ वा वाढदिवस साजरा करतोय गुगल! तुम्हाला Google चा फुल फॉर्म माहितीये का आणि कसं पडलं हे नाव?
6
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
7
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."
8
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स
9
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
10
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
11
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
12
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
13
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
14
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
15
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
16
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
17
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
18
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
19
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
20
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश

महाविद्यालयांमध्ये रोटेशन पॉलिसीचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना नंतर आता प्रथम १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू होणार आहे. त्यात महाविद्यालयांमध्ये रोटेशन पॉलिसीनुसार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोना नंतर आता प्रथम १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू होणार आहे. त्यात महाविद्यालयांमध्ये रोटेशन पॉलिसीनुसार विद्यार्थ्यांना बोलवण्याचे आणि शिक्षण देण्याचे आव्हान आहे. विद्यापीठ आणि शासनाने दिलेल्या परिपत्रकानुसार जागेच्या उपलब्धतेनुसार फक्त ५० टक्के विद्यार्थ्यांना बोलवण्याचे आव्हान आहे. तसेच ऑनलाईन शिक्षणही या परिपत्रकानुसार सुरू ठेवावे लागणार आहे.

राज्यातील विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालये १५ फेब्रुवारीपासून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यातील अटी पुर्ण करण्याचे मोठे आव्हान महाविद्यालयांसमोर आहे. यात फक्त ५० टक्के विद्यार्थ्यांना बोलावले जाईल. त्यात महाविद्यालयात येणारे विद्यार्थी नेमके कोण आणि ते कसे ठरवायचे हे आव्हान आता महाविद्यालयांच्या समोर आहे.

वसतीगृहे टप्प्या टप्प्याने सुरू करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे विद्यापीठांनी तयार करावी.

प्रात्याक्षिक परिक्षा देखील होणार

विद्यापीठातर्फे जानेवारी २०२१पासून सुरू झालेल्या पदवीच्या आणि अभियांत्रिकीच्या पाचव्या आणि सातव्या सत्राच्या लेखी परिक्षा ऑनलाईन पद्धतीने आयोजित करून पुर्णत्वास आलेल्ा आहेत. विद्यार्थ्यांना सत्रातील नियमीत प्रात्याक्षिके बॅचवाईज रोटेशन पद्धतीने पुर्ण कराव्यात. त्यानंतर या प्रात्याक्षिक परिक्षांचे वेळापत्रक तयार करण्यात येईल. याबाबत विद्यापीठाच्या विद्या परिषदेची ऑनलाईन बैठक देखील नुकतीच पार पडली होती.

तसेच यंदा प्रात्याक्षिके ही कोविड १९ मुळे या वर्षी वार्षिक पद्धतीने घ्यावीत,असे ठरले होते. मात्र शासनाच्या निर्देशानुसार क्लासेस घेण्यास परवानगी दिल्याने हा निर्णय रद्द करून त्याऐवजी पुर्वीप्रमाणेच सत्र पद्धतीने घेण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांची ७५ टक्के उपस्थिती बंधनकारक नाही. तसेच ५० टक्के रोटेशन पद्धतीने वर्गात प्रवेश देण्याबाबत महाविद्यालयांनी आपल्या स्तरावर विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे नियोजन करुन कार्यवाही करावे, असेही विद्यापीठाने परिपत्रकात म्हटले आहे. त्यामुळे आता कोणत्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात बोलवायचे आणि कसे, ऑनलाईन आणि ऑफलाईन शिक्षणाचा मेळ घालायचा तरी कसा, असा प्रश्न महाविद्यालयांचे प्राचार्य आणि संस्थाचालकांना पडला आहे.