जळगाव : आव्हाणे येथील ग्राम पंचायत निवडणुकीत पंचायत समिती हर्षल चौधरी यांच्या आव्हाणे विकास पॅनलचा धुव्वा उडवत कैलास शिंदे प्रणीत ग्रामविकास पॅनलचा विजय झाला आहे. १३ पैकी ४ जागा बिनविरोध झाल्याने ९ जागांसाठी मतदान झाले होते. यामध्ये एकूण ६ जागा ग्राम विकास पॅनलने जिंकून शिवसेनेच्या पॅनलचा विजय झाला आहे.
आव्हाणे विकास पॅनलकडून केवळ माजी सरपंच विजय पाटील हे १९२ मतांनी विजयी झाले. तर सर्व उमेदवारांचा पराभव झाला. प्रभाग क्रमांक ५ मध्ये देखील चुरशीची लढत होती. याठिकाणी शिवसेना विरुध्द शिवसेना होती. भारती भगवान पाटील यांनी संगीता पाटील यांचा अवघ्या १६ मतांनी पराभव केला. तर विशाल नन्नवरे, मनिषा पाटील व राकेश चौधरी यांच्या रुपात आव्हाणे ग्राम पंचायतीत युवा उमेदवार देखील विजयी झाले. आव्हाणे विकास पॅनलने ३, ग्राम विकास पॅनलचे ७ तर ३ अपक्ष उमेदवार जिंकले आहेत.
वाॅर्ड १
संजूबाई नवल पाटील - ३८०
सिंधूबाई पंढरीनाथ पाटील - ३६९
वाॅर्ड २
विजय दत्तात्रय पाटील - ४९०
मनिषा शिवाजी पाटील - ४४८
वाॅर्ड ३
विशाल नन्नवरे - १९०
सविताबाई सपकाळे - ३२३
वाॅर्ड ५
भारती भगवान पाटील - ३६१
सरला भोई - ४२६
इघन मोरे - ४०४