शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
5
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
6
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
7
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
8
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
9
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
10
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
11
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
12
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
13
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
14
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
15
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
16
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
17
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
18
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
19
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
20
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार

चाळीसगाव तालुक्यातील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:34 IST

१६ हजार हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त : अनेक घरांची पडझड, पंचनामे सुरू चाळीसगाव, जि. जळगाव : शहर व ...

१६ हजार हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त : अनेक घरांची पडझड, पंचनामे सुरू

चाळीसगाव, जि. जळगाव : शहर व तालुक्यात मंगळवारी आलेल्या महापुराने ४१ गावांना मोठा फटका बसला आहे. येथील खरिपातील पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. शेतातील माती वाहून गेल्याने पिके आडवी झाली. अनेक शेतांमध्ये पाणी साचले आहे. जवळपास १६ हजार हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

चाळीसगाव व परिसरात मंगळवारी पहाटेपासून जवळपास १२३.२ मिमी पावसाची नोंद झाली होती, तर यात दोन जणांचा मृत्यू झाला.

कपाशी, मका, सोयाबीन, कडधान्ये, फळबाग पिकांना फटका बसला आहे. जवळपास १६ हजार हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेली गावे अशी : चाळीसगाव, ओझर, टाकळी प्र. चा., बेलदारवाडी, गणपूर, कोदगाव, रांजणगाव, बाणगाव, वाकडी, वाघडू, रोकडे, हातले, वाघले, जावळे, जामडी, कोंगानगर, भामरे बु.,भामरे खु., चांभार्डी खु.,चांभार्डी बु, एकलहरे, तांबोळे बु.,तांबोळे खु., निमखेडी, गणेशपूर, पिंप्री बु.,चितेगाव, सांगवी, बोढरे, जुनोने, तळोंदे प्र. चा., वलठाण, चंडिकावाडी, पाटणा, शिवापूर पिंपरखेड, लोंजे, आंबेहोळ पाथरजे खेर, सोनगाव, पिलखोड या गावांचा समावेश आहे. अनेक ठिकाणी पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. या महापुराचा जास्त फटका खर्डे गावाला बसला आहे. या गावातील १५० वर पशुधन वाहून गेले अथवा मृत झाले आहेत.

दुसरीकडे भडगाव तालुक्यात तितूर नदीला आलेल्या महापुरामुळे कजगाव, भोरटेक, उमरखेड,व पासर्डी येथील साडेचारशे ते पाचशे एकर शेती क्षेत्रातील पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अनेक घरांत पाणी शिरल्यामुळे संसारोपयोगी साहित्य खराब झाल्याने

अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. दरम्यान, दरड कोसळल्याने बंद पडलेला कन्नड घाटात अजूनही रस्ता साफ करण्याचे काम सुरू

असल्याची माहिती मिळाली.