शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

केंद्राच्या समितीने कचरामुक्त शहरासाठी केली लपून छपून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:17 IST

गेल्या महिन्यात दिली होती भेट : पुढील महिन्यात येणार दुसरी समिती लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव: स्वच्छ भारत अभियानाच्या स्वच्छ ...

गेल्या महिन्यात दिली होती भेट : पुढील महिन्यात येणार दुसरी समिती

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव: स्वच्छ भारत अभियानाच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२१ साठी केंद्राच्या समितीने एप्रिल महिन्यात शहराच्या साफसफाईची पाहणी केली असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे केंद्राच्या समितीने शहरात अचानक भेट देऊन शहरातील विविध भागात जाऊन स्वच्छतेची व कचरामुक्त शहराबाबतची पाहणी केली असल्याची माहिती मनपा आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

दरवर्षी राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून स्वच्छ सर्वेक्षण ही स्पर्धा घेतली जात आहे. स्पर्धेद्वारे शहर स्वच्छ व सुंदर व्हावे, हा हेतू असून, याच स्पर्धेच्या निकालावर मनपाला मिळणारा १५ व्या वित्त आयोगाचा निधीदेखील अवलंबून राहणार आहे. कचरामुक्त शहरासाठी एप्रिल महिन्यात केंद्राच्या समितीने पाहणी केली असून, समितीने वेगवेगळ्या प्रभागात जाऊन नागरिकांचे अभिप्राय घेतले आहेत, तसेच ओला व सुका कचरा वर्गीकरण, डोअर टू डोअर कचरा संकलन याबाबतची पाहणी केंद्राच्या समितीने केली आहे. याबाबत मनपा आरोग्य विभागालादेखील कोणत्याही सूचना केंद्रीय समितीने दिलेल्या नव्हत्या, चार जणांच्या समितीने ही पाहणी केली आहे.

घनकचरा प्रकल्पाचे काम झाले तर शहराच्या मानांकनात पडू शकते भर

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत २०१९ मध्ये जळगाव शहराचा क्रमांक ७६ वा होता. तर २०२० मध्ये जळगाव शहराचा क्रमांक ६४ पर्यंत वाढला होता. दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून सातच्या सर्वेक्षण मानांकनात जळगाव शहरातील घनकचरा प्रकल्पाचे काम पूर्ण नसल्याने जळगाव महापालिकेला तब्बल ५०० गुणांवर पाणी फिरावे लागत आहे. या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यास महापालिकेला पाचशे गुणांचा फायदा होऊन शहराच्या एकूण मानांकनातदेखील भर पडू शकते.

पुढील महिन्यात सुरू होणार प्रकल्पाचे काम

घनकचरा प्रकल्पाच्या सुधारित डीपीआरला राज्य शासनाने मंजुरी दिल्यामुळे आता या प्रकल्पाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. बायो मायनिंगचे कामदेखील ७० टक्के पूर्ण झाले असून, उर्वरित कचऱ्यावर प्रक्रिया झाल्यानंतर घनकचरा प्रकल्पाच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे. दरम्यान, रोज पडणाऱ्या कचऱ्यावरदेखील आता बायो मायनिंग प्रक्रिया केली जाणार असून, लवकरच या प्रकल्पाला सुरुवात होणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.