शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

भाऊ तू मला शेवटचे पाणी टाकायला बोलावले कारे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:12 IST

मनवेल, ता.यावल : मृत्यू हे अंतिम सत्य आहे, मात्र ऐन तारुण्यात व उमेदीच्या काळात अकाली मृत्यू येणे ही ...

मनवेल, ता.यावल : मृत्यू हे अंतिम सत्य आहे, मात्र ऐन तारुण्यात व उमेदीच्या काळात अकाली मृत्यू येणे ही फार दुःखदायक व मनाला चटका लावून जाणारी अशी घटना आहे. अशीच घटना साकळी, ता. यावल येथील कोळी परिवाराच्या नशिबी आली. बत्तीस वर्षीय आई-वडिलांचा एकुलता मुलगा व दोघा बहिणींचा एकुलता एक भाऊ अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने अंत्ययात्रेत बहिणींचा आर्त टाहो हा मन हेलावून टाकणारा होता. ‘भाऊ तू मला शेवटचेच पाणी टाकायला बोलावले का रे !’ ... हे बहीण मनीषाचे वाक्य ऐकून अनेकांचे डोळे पाणावले होते.

या दु:खद घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की, साकळी, ता.यावल येथील भवानी पेठ भागातील रहिवासी असलेले रामलाल धोंडू कोळी यांना कैलास (३२ ) नावाचा एकुलता मुलगा होता. कैलासचा मृत्यू होण्याअगोदर चार-पाच दिवस आधी त्याला अचानक डोकेदुखीचा त्रास जाणवला. दरम्यान त्याने लगेचच गावात उपचार घेतले. मात्र त्रास जास्त जाणवू लागल्याने त्याला लागलीच १२ रोजी जळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी त्याला ब्रेन हॅमरेजचा त्रास झाल्याचे निष्पन्न झाले. यानंतर कैलासच्या डोक्याच्या भागात मोठी शस्त्रक्रियाही झाली मात्र त्याची तब्येत अधिकच खालवत असल्याने त्याला पुढील उपचारासाठी ४ रोजी मुंबई येथील जे.जे.रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी सुद्धा त्याच्यावर दोन दिवस मोठ्या शर्तीने उपचार सुरू होते मात्र अखेर १६ दुपारी तीन वाजता कैलासाची प्राणज्योत मालवली. चारच दिवसात मृत्यू ठरला वरचढ.

मयत कैलासचा जीवन-मरणाशी सुरू असलेला संघर्ष अवघ्या चार दिवसातच थांबला. घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पत्नी आणि मुलीचे छत्र हरपले

मयत कैलासच्या पश्चात आई-वडील,पत्नी व १३ महिन्यांची मुलगी वंशिक‍ा तसेच तीन काका, आत्या यांचेसह मोठा परिवार आहे. वडील रामल‍ाल कोळी यावल महसूल विभागात नोकरीला असून मयत कैलास हा हिंगोणा, ता.यावल येथील प्रा.आ.केंद्रात परिचर म्हणून सेवेत होता. या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.