शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

भाऊ तू मला शेवटचे पाणी टाकायला बोलावले कारे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:12 IST

मनवेल, ता.यावल : मृत्यू हे अंतिम सत्य आहे, मात्र ऐन तारुण्यात व उमेदीच्या काळात अकाली मृत्यू येणे ही ...

मनवेल, ता.यावल : मृत्यू हे अंतिम सत्य आहे, मात्र ऐन तारुण्यात व उमेदीच्या काळात अकाली मृत्यू येणे ही फार दुःखदायक व मनाला चटका लावून जाणारी अशी घटना आहे. अशीच घटना साकळी, ता. यावल येथील कोळी परिवाराच्या नशिबी आली. बत्तीस वर्षीय आई-वडिलांचा एकुलता मुलगा व दोघा बहिणींचा एकुलता एक भाऊ अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने अंत्ययात्रेत बहिणींचा आर्त टाहो हा मन हेलावून टाकणारा होता. ‘भाऊ तू मला शेवटचेच पाणी टाकायला बोलावले का रे !’ ... हे बहीण मनीषाचे वाक्य ऐकून अनेकांचे डोळे पाणावले होते.

या दु:खद घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की, साकळी, ता.यावल येथील भवानी पेठ भागातील रहिवासी असलेले रामलाल धोंडू कोळी यांना कैलास (३२ ) नावाचा एकुलता मुलगा होता. कैलासचा मृत्यू होण्याअगोदर चार-पाच दिवस आधी त्याला अचानक डोकेदुखीचा त्रास जाणवला. दरम्यान त्याने लगेचच गावात उपचार घेतले. मात्र त्रास जास्त जाणवू लागल्याने त्याला लागलीच १२ रोजी जळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी त्याला ब्रेन हॅमरेजचा त्रास झाल्याचे निष्पन्न झाले. यानंतर कैलासच्या डोक्याच्या भागात मोठी शस्त्रक्रियाही झाली मात्र त्याची तब्येत अधिकच खालवत असल्याने त्याला पुढील उपचारासाठी ४ रोजी मुंबई येथील जे.जे.रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी सुद्धा त्याच्यावर दोन दिवस मोठ्या शर्तीने उपचार सुरू होते मात्र अखेर १६ दुपारी तीन वाजता कैलासाची प्राणज्योत मालवली. चारच दिवसात मृत्यू ठरला वरचढ.

मयत कैलासचा जीवन-मरणाशी सुरू असलेला संघर्ष अवघ्या चार दिवसातच थांबला. घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पत्नी आणि मुलीचे छत्र हरपले

मयत कैलासच्या पश्चात आई-वडील,पत्नी व १३ महिन्यांची मुलगी वंशिक‍ा तसेच तीन काका, आत्या यांचेसह मोठा परिवार आहे. वडील रामल‍ाल कोळी यावल महसूल विभागात नोकरीला असून मयत कैलास हा हिंगोणा, ता.यावल येथील प्रा.आ.केंद्रात परिचर म्हणून सेवेत होता. या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.