शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

निधी व परवानगीअभावी ‘जलयुक्त’ला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:12 IST

मार्च २०२० नंतर काम नाही : पहिल्या चार टप्प्यात ८९५ गावे जलयुक्त लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गावागावात पाणीसाठा ...

मार्च २०२० नंतर काम नाही : पहिल्या चार टप्प्यात ८९५ गावे जलयुक्त

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गावागावात पाणीसाठा व भूजल पातळीत वाढ व्हावी यासाठी सुरू करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार योजनेला निधी व परवानगीअभावी ब्रेक लागला आहे. ३१ मार्च २०२० नंतर अभियान बंद आहे. तत्पूर्वी चार टप्प्यांमध्ये ८९५ गावांमध्ये जलयुक्तची कामे झाली.

२०१५ पासून राज्यात जलयुक्त शिवार अभियान राबविण्यास सुरुवात झाली. चार टप्प्यांमध्ये जलयुक्तची कामे झाली. मात्र त्यानंतर २०२० मध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला व निधीची कमतरता भासू लागली. त्यात सरकारही बदलल्याने ही योजना पुढे सुरू राहिली नाही. निधीची उपलब्धता नाही व राज्य शासनाकडूनही कामे करण्यास परवानगी मिळाली नाही, त्यामुळे जलयुक्तची कामे होऊ शकली नाही.

चौथ्या टप्प्यात मिळाली मुदतवाढ

चार टप्प्यांमध्ये झालेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या कामामध्ये २०१५-१६ या पहिल्या टप्प्यात २३२ गावांमध्ये कामे झाले. त्यानंतर २०१६-१७ मध्ये २२२, २०१७-१८ मध्ये २०६, २०१८-१९मध्ये २३५ असे एकूण ८९५ गावांमध्ये जलयुक्तची कामे झाले. चौथ्या टप्प्यामधील कामांना मार्च २०२०पर्यंत मुदतवाढ मिळाली होती. ३१ मार्च २०२० नंतर हे अभियान बंद झाले. त्यामुळे यावर्षी उन्हाळ्यामध्ये ही कामे होऊ शकली नाही.