शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

निधी व परवानगीअभावी ‘जलयुक्त’ला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:12 IST

मार्च २०२० नंतर काम नाही : पहिल्या चार टप्प्यात ८९५ गावे जलयुक्त लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गावागावात पाणीसाठा ...

मार्च २०२० नंतर काम नाही : पहिल्या चार टप्प्यात ८९५ गावे जलयुक्त

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गावागावात पाणीसाठा व भूजल पातळीत वाढ व्हावी यासाठी सुरू करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार योजनेला निधी व परवानगीअभावी ब्रेक लागला आहे. ३१ मार्च २०२० नंतर अभियान बंद आहे. तत्पूर्वी चार टप्प्यांमध्ये ८९५ गावांमध्ये जलयुक्तची कामे झाली.

२०१५ पासून राज्यात जलयुक्त शिवार अभियान राबविण्यास सुरुवात झाली. चार टप्प्यांमध्ये जलयुक्तची कामे झाली. मात्र त्यानंतर २०२० मध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला व निधीची कमतरता भासू लागली. त्यात सरकारही बदलल्याने ही योजना पुढे सुरू राहिली नाही. निधीची उपलब्धता नाही व राज्य शासनाकडूनही कामे करण्यास परवानगी मिळाली नाही, त्यामुळे जलयुक्तची कामे होऊ शकली नाही.

चौथ्या टप्प्यात मिळाली मुदतवाढ

चार टप्प्यांमध्ये झालेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या कामामध्ये २०१५-१६ या पहिल्या टप्प्यात २३२ गावांमध्ये कामे झाले. त्यानंतर २०१६-१७ मध्ये २२२, २०१७-१८ मध्ये २०६, २०१८-१९मध्ये २३५ असे एकूण ८९५ गावांमध्ये जलयुक्तची कामे झाले. चौथ्या टप्प्यामधील कामांना मार्च २०२०पर्यंत मुदतवाढ मिळाली होती. ३१ मार्च २०२० नंतर हे अभियान बंद झाले. त्यामुळे यावर्षी उन्हाळ्यामध्ये ही कामे होऊ शकली नाही.