शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारी भेटींच्या ‘ब्रेक’सह नागरिकांच्या कामांनाही ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:07 IST

ब्रेक द चेनचा परिणाम : ऑनलाइन तक्रारी नोंदविण्यास ज्येष्ठांना अडचणी लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू ...

ब्रेक द चेनचा परिणाम : ऑनलाइन तक्रारी नोंदविण्यास ज्येष्ठांना अडचणी

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या ब्रेक द चेनदरम्यान शासकीय कार्यालयांमध्येही भेटींवर निर्बंध घालण्यात आले आहे. अधिकाऱ्यांना भेटून आपल्या तक्रारी मांडता येत नसल्याने सामान्य नागरिकांच्या कामांनाही ‘ब्रेक’ लागला आहे. याशिवाय लोकशाही दिनदेखील ऑनलाईन होत असल्याने तक्रारींची प्रत तालुका पातळीवरच राहत असल्याने समस्यांचे निवारण होण्यास अडथळे येत आहे. विशेष म्हणजे लोकशाही दिन ऑनलाइन होत असल्याने तक्रारींची संख्याही २० ते २५ टक्‍क्‍यांवर आली आहे. पाच महिन्यात जिल्हाभरातून केवळ ७८ तक्रारी दाखल झाल्या आहेत.

दरम्यान, गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात ऑनलाईन तक्रारीची स्थिती होती तीच स्थिती यंदादेखील एप्रिल महिन्यात ओढावली आहे. गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग वाढला व त्याचा विविध क्षेत्रावर मोठा परिणाम झाला. यात शासकीय कार्यालयाशी संबंधित असणाऱ्या आपल्या समस्या मांडण्यावरदेखील निर्बंध आले. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. मात्र कोरोनामुळे लोकशाही दिन बंद झाला व आठ महिने हा लोकशाही दिन झालाच नाही.

२३ मार्च २०२० रोजी लॉकडाउन घोषित होण्यापूर्वी मार्च महिन्यात असलेल्या पहिल्या सोमवारी, २ मार्च २०२० रोजी लोकशाही दिन झाला. त्यानंतर प्रत्येक महिन्याला जसजसे लाॅकडाऊन वाढत गेले तसे लोकशाही दिन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दोन्ही वर्षातील एप्रिल महिना सारखाच

गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात लोकशाही दिन होत नसल्याने नागरिकांच्या तक्रारींचे निवारणही व्हावे यासाठी या तक्रारी मेलद्वारे पाठविण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानुसार मेलवर तक्रारी प्रशासनाकडे पाठविला जाऊ लागल्या. मात्र लोकशाही दिनातील तक्रारींचे स्वरूप पाहिले तर निवृत्ती वेतन, पतसंस्था ठेवी अशा ज्येष्ठ नागरिकांशी संबंधित असणाऱ्या तक्रारीच अधिक असायच्या. मेलद्वारे तक्रार करण्याची सुविधा असली तरी या ज्येष्ठ नागरिकांना आपल्या तक्रारी मेलवर नोंदविताना अडचणी येऊ लागल्या. आता यंदादेखील एप्रिल महिन्यात अधिकाऱ्यांच्या भेटी बंद करण्यात आल्याने नागरिकांच्या तक्रारी मेलद्वारे मागविल्या जात आहे. यातही ज्येष्ठ नागरिकांना तक्रारी करण्यास अडचणी येत आहे. गेल्या वर्षी लोकशाही दिन बंद होता; मात्र यंदाच्या एप्रिल महिन्यात ऑनलाइन पद्धतीने झालेल्या लोकशाही दिनी २१ तक्रारी दाखल झाल्या.

यंदा भेटीही बंद

जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत हे सोमवार व गुरुवारी नागरिकांना वेळ देत असतात. लोकशाही दिन बंद असताना जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीदरम्यान नागरिक आपल्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडत होते. मात्र यंदा कोरोनाचा संसर्ग अधिकच असल्याने शासकीय कार्यालयांमध्येदेखील भेटीगाठीवर निर्बंध आणले आहेत. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात अभ्यागतांना थेट भेटता येत नसून त्यांना आपल्या तक्रारी ई-मेलद्वारे कराव्या लागत आहे.

आलेल्या तक्रारी त्या-त्या विभागाला रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात मेलवर नागरिक ज्या तक्रारी पाठवित आहे, त्या तक्रारी ज्या-ज्या विभागाशी संबंधित आहे, त्या-त्या विभागाला त्या पाठवून जिल्हाधिकारी अथवा संबंधित अधिकारी तक्रारीचा निपटारा करण्यासाठी सूचना देत आहे. यामध्ये ज्या विभागाने तक्रारी मार्गी लावल्या त्याचा अहवाल मागविला जातो. मात्र महापालिका, जिल्हा परिषद, तहसील कार्यालय व इतरही विभागांकडे पाठविलेल्या तक्रारींचा अहवाल आलेला नाही. त्यामुळे एकूणच परिस्थिती पाहता नागरिकांच्या कामांना ‘ब्रेक’ लागला आहे.

तक्रारींची संख्या घटली

आपल्या तक्रारी मांडण्यासाठी जिल्हाभरातून नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतर साधारणपणे २० ते २५ तक्रारी मांडल्या जात होत्या. मात्र आता ऑनलाईनवर हे प्रमाण १० ते १२ तक्रारींवर आले आहे.

लोकशाही दिनातही तक्रारी कमीच

गेल्यावर्षी एप्रिल महिन्यापासून ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत लोकशाही दिन रद्द झाला होता. त्यानंतर डिसेंबरपासून लोकशाही दिन ऑनलाईन पद्धतीने सुरू झाला. मात्र या ऑनलाईन लोकशाही दिनीदेखील तक्रारींची संख्या कमी झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

लोकशाही दिनात महिनानिहाय तक्रारींची संख्या

महिना - तक्रारींची संख्या

डिसेंबर २०२०- १०

जानेवारी २०२१- १०

फेब्रुवारी- २८

मार्च- ९

एप्रिल-२१

एकूण - ७८