शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

ब्राम्हण समाजाला अल्पसंख्याक दर्जा द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:17 IST

जळगाव : ब्राह्मण समाजाला अल्पसंख्यांक दर्जा मिळावा, स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, यासह विविध १३ मागण्यांचे ...

जळगाव : ब्राह्मण समाजाला अल्पसंख्यांक दर्जा मिळावा, स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, यासह विविध १३ मागण्यांचे ठराव शुक्रवारी जळगावात झालेल्या अखिल भारतीय ब्रह्म महाशिखर या संस्थेच्या गोलमेज परिषदेमध्ये ब्राम्हण समाजबांधवांतर्फे करण्यात आले. शुक्रवारी दुपारी ब्राम्हण सभा येेथे झालेल्या एक दिवसीय गोलमेज परिषदेला राज्यभरातील ब्राम्हण समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अखिल भारतीय ब्रह्म हाशिखर संस्थेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष निखील लातूरकर यांच्याहस्ते दीप प्रज्वलन व भगवान श्री परशुरामांचे पुजनाने गोलमेज परिषदेची सुरूवात झाली. व्यासपीठावर ब्राह्मण ज्ञाती संस्थांचे सु. द. पुराणिक, सुरेश मुळे, सचिन वाडे पाटील, गजानन जोशी, श्रीकांत कुळकर्णी, साकेत खोचे, सचिन नारळे, नितीन कुळकर्णी, अशोक साखरे, सुनिल याज्ञीक, अशोक वाघ, अशोक जोशी, वसंत देखणे, सचिन चौघुले, हेमंत वैद्य, ॲड. अश्विनी डोलारे, नितिन पारगावकर, आनंद दशपुत्रे, दिनकर जेऊरकर, व्ही. पी. कुळकर्णी, अजय डोहळे, रविंद्र जोशी, डॉ. नीलेश राव , स्वाती पातळे, ईश्वरी जोशी, स्वाती कुळकर्णी, रेखा कुळकर्णी, वृंदा भालेराव, मुग्धा दशरथी, ममता जोशी, रेवती लव्हेकर, रुपाली कुळकर्णी, अमला पाठक, वैशाली नाईक, निर्मला जोशी, पल्लवी उपासनी उपस्थित होते.

सुत्र संचालन श्रद्धा शुक्ल यांनी तर आभार प्रदर्शन भुपेश कुळकर्णी यांनी केले. यशस्वीतेसाठी अनंत देसाई, हेमंत वैद्य, संग्राम जेऊरकर, संकेत तारे, निरंजन कुळकर्णी, भूषण मुळे, अविनाश जोशी, तेजस जोशी, राजेश कुळकर्णी, नीलेश कुलकर्णी, दीपक भट, प्रकाश मुळे, संतोष दप्तरी आदी समाज बांधवांनी परीश्रम घेतले..

इन्फो :

परिषदेत झालेले ठराव

पुरोहितांना मानधन मिळावे, वर्ग-२ इनामी जमिनी वर्ग १ करून खाजगी मालकीच्या करू देणे, महापुरूषांच्या बदनामी विरोधी कायदा करण्यात यावा, स्वातंत्र्यवीर सावरकर यांंना भारतरत्न मिळावा, पुण्यातील दादोजी कोंडदेव व राम गणेश गणकरी यांचे पुतळे पुन्हा बसवावे, श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचे श्रीवर्धन येथे भव्य स्मारक उभारण्या यावे , जिल्हास्तरीय ब्राह्मण विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह उभारावे, छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील स्मारक लवकरात लवकर पूर्ण व्हावे, जळगाव शहरामध्ये किंवा जळगाव शहरालगत भगवान श्री. परशूरामांच्या मंदिरासाठी जागा मिळावी, ब्राह्मण समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी व श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या समाधीचा जिर्णोद्धार व्हावा, हे ठराव करण्यात आले.