शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

सिखवाल ब्राह्मण समाज संस्थेतर्फे रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:16 IST

सुभाष सुरवाडे यांची निवड जळगाव : बहुजन मुक्ती पार्टीच्या महानगर कार्याध्यक्षपदी सुभाष सुरवाडे यांची निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष अमजद ...

सुभाष सुरवाडे यांची निवड

जळगाव : बहुजन मुक्ती पार्टीच्या महानगर कार्याध्यक्षपदी सुभाष सुरवाडे यांची निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष अमजद अब्दुल सत्तार रंगरेज यांनी या निवडीचे पत्र दिले. या निवडीचे विविध मान्यवरांनी स्वागत केले.

स्कूल व्हॅनधारकांना आर्थिक मदत करा

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधादरम्यान रिक्षा, स्कूल व्हॅन बंद असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक मदत करण्यात यावी यासह विविध मागण्या भाजप ॲटो रिक्षा स्कूल व्हॅन आघाडीच्यावतीने करण्यात आल्या आहे. या विषयी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आघाडीचे महानगराध्यक्ष प्रमोद वाणी, प्रल्हाद सोनवणे, संदीप वाणी, दिलीप वाघ, सुनील चौधरी, राजेश माळी, दीपक माळी, वसंत झुंजारराव, नाना वाणी, नारायण पाटील आदी उपस्थित होते.

जंतूनाशक औषधांची फवारणी करण्याची मागणी

जळगाव : शहरातील पद्मालय विश्राम गृह परिसरात अनियमित साफसफाई होत नसल्याने मोठ्या प्रमाणावर डासांचा प्रादुर्भाव झाला आहे.यामुळे साथीचे आजार पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. तसेच या ठिकाणी गटारीदेखील मोठ्या प्रमाणावर तुंबलेल्या आहेत. तरी मनपा प्रशासनाने या परिसरात स्वच्छता मोहीम व जंतूनाशक औषधांची फवारणी करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

दुभाजकांमधील झाडांना पाणी देण्याची मागणी

जळगाव : मनपातर्फे गेल्या वर्षी पावसाळ्यात शहरातील अनेक ठिकाणच्या दुभाजकांमध्ये झाडे लावण्यात आली होती. सुरुवातीला काही महिने नियमित पाणी देण्यात आले. मात्र, कालांतराने पाणी देणे बंद झाल्याने, उन्हाळ्यात ही झाडे वाळू लागली आहेत. तरी मनाला प्रशासनाने उन्हाळ्यात या झाडांना नियमित पाणी देण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

वादळानंतर पुन्हा उकाडा

जळगाव : चक्रीवादळामुळे जळगावात रविवार व सोमवार असे दोन दिवस जोराने वारे वाहत आल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. तसेच यात पावसाच्या हलक्या सरी पडल्यामुळे काहीसा उकाडा दूर झाला होता. मात्र,मंगळवारी चक्रीवादळाचे वातावरण निवळल्यामुळे पुन्हा तापमानाचा पारा वाढून उकाडा निर्माण झाला होता.