शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
4
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
5
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
6
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
7
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
8
World Cup FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
9
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
10
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
11
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
12
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
13
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
14
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
15
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
16
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
17
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
18
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
19
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर
20
Prabodhini Ekadashi 2025: विष्णूंची योगनिद्रा संपताच सलग २१ दिवस करा ही 'प्रभावी उपासना

सिखवाल ब्राह्मण समाज संस्थेतर्फे रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:16 IST

सुभाष सुरवाडे यांची निवड जळगाव : बहुजन मुक्ती पार्टीच्या महानगर कार्याध्यक्षपदी सुभाष सुरवाडे यांची निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष अमजद ...

सुभाष सुरवाडे यांची निवड

जळगाव : बहुजन मुक्ती पार्टीच्या महानगर कार्याध्यक्षपदी सुभाष सुरवाडे यांची निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष अमजद अब्दुल सत्तार रंगरेज यांनी या निवडीचे पत्र दिले. या निवडीचे विविध मान्यवरांनी स्वागत केले.

स्कूल व्हॅनधारकांना आर्थिक मदत करा

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधादरम्यान रिक्षा, स्कूल व्हॅन बंद असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक मदत करण्यात यावी यासह विविध मागण्या भाजप ॲटो रिक्षा स्कूल व्हॅन आघाडीच्यावतीने करण्यात आल्या आहे. या विषयी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आघाडीचे महानगराध्यक्ष प्रमोद वाणी, प्रल्हाद सोनवणे, संदीप वाणी, दिलीप वाघ, सुनील चौधरी, राजेश माळी, दीपक माळी, वसंत झुंजारराव, नाना वाणी, नारायण पाटील आदी उपस्थित होते.

जंतूनाशक औषधांची फवारणी करण्याची मागणी

जळगाव : शहरातील पद्मालय विश्राम गृह परिसरात अनियमित साफसफाई होत नसल्याने मोठ्या प्रमाणावर डासांचा प्रादुर्भाव झाला आहे.यामुळे साथीचे आजार पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. तसेच या ठिकाणी गटारीदेखील मोठ्या प्रमाणावर तुंबलेल्या आहेत. तरी मनपा प्रशासनाने या परिसरात स्वच्छता मोहीम व जंतूनाशक औषधांची फवारणी करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

दुभाजकांमधील झाडांना पाणी देण्याची मागणी

जळगाव : मनपातर्फे गेल्या वर्षी पावसाळ्यात शहरातील अनेक ठिकाणच्या दुभाजकांमध्ये झाडे लावण्यात आली होती. सुरुवातीला काही महिने नियमित पाणी देण्यात आले. मात्र, कालांतराने पाणी देणे बंद झाल्याने, उन्हाळ्यात ही झाडे वाळू लागली आहेत. तरी मनाला प्रशासनाने उन्हाळ्यात या झाडांना नियमित पाणी देण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

वादळानंतर पुन्हा उकाडा

जळगाव : चक्रीवादळामुळे जळगावात रविवार व सोमवार असे दोन दिवस जोराने वारे वाहत आल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. तसेच यात पावसाच्या हलक्या सरी पडल्यामुळे काहीसा उकाडा दूर झाला होता. मात्र,मंगळवारी चक्रीवादळाचे वातावरण निवळल्यामुळे पुन्हा तापमानाचा पारा वाढून उकाडा निर्माण झाला होता.