शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वरणगावात भाजपचा नगरपरिषदेवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:22 IST

वरणगाव, ता. भुसावळ : वरणगावकरांना २४ तास पिण्याचे पाणी मिळण्यासाठी २५ कोटींची योजना भाजपच्या कार्यकाळात मंजूर करण्यात आली ...

वरणगाव, ता. भुसावळ : वरणगावकरांना २४ तास पिण्याचे पाणी मिळण्यासाठी २५ कोटींची योजना भाजपच्या कार्यकाळात मंजूर करण्यात आली आहे. त्याचे काम ठेकेदाराला देण्यात आले आहे. पाण्याच्या सहा टाक्यांचे काम संथगतीने सुरू आहे. ते काम जलदगतीने व्हावे व इतर कामेसुद्धा लवकर मार्गी लागावी या मागणीसाठी भाजपच्यावतीने गुरुवारी नगर परिषदेवर मोर्चा काढण्यात आला.

या विविध मागण्यांमध्ये पाईपलाईनसाठी खोदलेल्या रस्त्यांमध्ये पाईप टाकून रस्ते तत्काळ दुरुस्त करावे. निरनिराळ्या प्रभागांमध्ये निर्माण केलेल्या बगीचांची पूर्ण वाताहात झाली आहे. पाच वर्षांसाठी देखभाल दुरुस्तीचा करार नगरपरिषद व ठेकेदारांमध्ये झाला असतानासुद्धा ठेकेदारांनी बगीचांची कामे अर्धवट सोडून नगरपरिषदेच्या तोंडाला पाने पुसली आहेत. अशा ठेकेदारावर कारवाई करून काळ्या यादीत टाकण्यात यावे व बगीचे नागरिकांसाठी खुले करावे. शहरात फवारणी व धुरळणी करावी, तसेच जलशुद्धिकरण केंद्रातील पाणी शुद्धिकरण संयंत्र सुरू करून ' नागरिकांना क्लोरीनयुक्त शुद्ध पाणीपुरवठा करावा या मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला.

यावेळी प्रांताधिकारी तथा प्रशासक रामसिंग सुलाने यांनी मंजूर पाणीपुरवठा योजनेचे काम जलद गतीने करून सर्व मागण्यांच्या बाबतीत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाक शेख, अल्लाउद्दीन यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.