शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
2
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
5
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
6
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
7
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
8
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
9
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
10
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
11
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
12
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
13
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
14
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
15
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
16
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
17
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
18
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
19
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
20
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
Daily Top 2Weekly Top 5

वाढदिवसच ठरला आयुष्याचा शेवटचा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:22 IST

जळगाव : वाढदिवसाचे औचित्य साधून मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील बसाली धबधब्यावर पर्यटनाला गेलेले जयेश रवींद्र माळी (वय २४, ...

जळगाव : वाढदिवसाचे औचित्य साधून मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील बसाली धबधब्यावर पर्यटनाला गेलेले जयेश रवींद्र माळी (वय २४, रा. वाघ नगर) व अक्षय उर्फ उज्ज्वल राजेंद्र पाटील (वय २३, रा. खेडी, जळगाव) दोन तरुण रविवारी दुपारी चार वाजता धरणात बुडाले. दोघांचे मृतदेह २१ तासांनी अर्थात दुसऱ्या दिवशी सोमवारी दुपारी १ वाजता धबधब्यात आढळून आले. जयेश माळी याचा रविवारी वाढदिवस होता. त्याच दिवशी त्याला मृत्यूने कवटाळल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जयेश याचा वाढदिवस असल्याने त्याच्यासह १६ मित्रांनी बऱ्हाणपूर येथील बसाली धबधब्यावर जाण्याचे नियोजन केले. त्यानुसार जयेश, उज्ज्वल व त्याचा लहान भाऊ यांच्यासह सर्व मित्र वेगवेगळ्या वाहनाने रविवारी सकाळी ८ वाजता बऱ्हाणपूरकडे रवाना झाले. त्याठिकाणी पाण्यात खेळत असतांना जयेशचा पाय घसरून तो पाण्यात पडला. त्याला वाचवितांना उज्ज्वलही पाण्यात बुडाला. घटनेची माहिती स्थानिक प्रशासनाला मिळाल्याने दोघांच्या शोधार्थ रात्री ११ वाजेपर्यंत शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र, दोघेही सापडले नव्हते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळपासून शोधमोहीम राबविण्यात आली. दुपारी १२.३० वाजता धबधब्याच्या एका कपारीत अडकलेले दोघांचे मृतदेह मिळून आले. त्यांची ओळख पटविली असता जयेश व उज्ज्वल हे दोघे असल्याचे समोर आले. दोघांचे मृतदेह पाहून कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला. दोघांचे मृतदेह बऱ्हाणपूर येथील शासकीय रुग्णालयात विच्छेदनासाठी हलविण्यात आले. विच्छेदनानंतर ते मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

जयेशचे उच्च शिक्षण तर उज्ज्वल नोकरीला

जयेशच्या पश्चात आई वर्षा, वडील रवींद्र बाबुराव माळी, तर लहान भाऊ अजय असा परिवार आहे. रवींद्र माळी हे अकाऊंटंट म्हणून खासगी नोकरी करतात. गेल्या वर्षी जयेशने चेन्नई येथे इंडियन ऑईल याठिकाणी ॲप्रन्टिसशिप पूर्ण केली होती. त्यानंतर गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात बी. ई. इलेक्ट्रीक्लच्या दुसऱ्या वर्षाला होता. जयेशचा लहान भाऊ हा बी. ई. मेकॅनिकलचे शिक्षण घेत आहे. उज्ज्वल हा एका वित्तीय संस्थेत वसुलीचे काम करायचा, तर त्याचे वडील ऑटोमोबाईल क्षेत्रात कामाला आहेत. उज्ज्वल हा कुटुंबासह मामाच्या गावाला स्थायिक झाला होता. त्याच्या पश्चात वडील राजेंद्र पाटील, आई सुनीता व लहान भाऊ असा परिवार आहे.