शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

वाढदिवसच ठरला आयुष्याचा शेवटचा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:22 IST

जळगाव : वाढदिवसाचे औचित्य साधून मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील बसाली धबधब्यावर पर्यटनाला गेलेले जयेश रवींद्र माळी (वय २४, ...

जळगाव : वाढदिवसाचे औचित्य साधून मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील बसाली धबधब्यावर पर्यटनाला गेलेले जयेश रवींद्र माळी (वय २४, रा. वाघ नगर) व अक्षय उर्फ उज्ज्वल राजेंद्र पाटील (वय २३, रा. खेडी, जळगाव) दोन तरुण रविवारी दुपारी चार वाजता धरणात बुडाले. दोघांचे मृतदेह २१ तासांनी अर्थात दुसऱ्या दिवशी सोमवारी दुपारी १ वाजता धबधब्यात आढळून आले. जयेश माळी याचा रविवारी वाढदिवस होता. त्याच दिवशी त्याला मृत्यूने कवटाळल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जयेश याचा वाढदिवस असल्याने त्याच्यासह १६ मित्रांनी बऱ्हाणपूर येथील बसाली धबधब्यावर जाण्याचे नियोजन केले. त्यानुसार जयेश, उज्ज्वल व त्याचा लहान भाऊ यांच्यासह सर्व मित्र वेगवेगळ्या वाहनाने रविवारी सकाळी ८ वाजता बऱ्हाणपूरकडे रवाना झाले. त्याठिकाणी पाण्यात खेळत असतांना जयेशचा पाय घसरून तो पाण्यात पडला. त्याला वाचवितांना उज्ज्वलही पाण्यात बुडाला. घटनेची माहिती स्थानिक प्रशासनाला मिळाल्याने दोघांच्या शोधार्थ रात्री ११ वाजेपर्यंत शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र, दोघेही सापडले नव्हते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळपासून शोधमोहीम राबविण्यात आली. दुपारी १२.३० वाजता धबधब्याच्या एका कपारीत अडकलेले दोघांचे मृतदेह मिळून आले. त्यांची ओळख पटविली असता जयेश व उज्ज्वल हे दोघे असल्याचे समोर आले. दोघांचे मृतदेह पाहून कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला. दोघांचे मृतदेह बऱ्हाणपूर येथील शासकीय रुग्णालयात विच्छेदनासाठी हलविण्यात आले. विच्छेदनानंतर ते मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

जयेशचे उच्च शिक्षण तर उज्ज्वल नोकरीला

जयेशच्या पश्चात आई वर्षा, वडील रवींद्र बाबुराव माळी, तर लहान भाऊ अजय असा परिवार आहे. रवींद्र माळी हे अकाऊंटंट म्हणून खासगी नोकरी करतात. गेल्या वर्षी जयेशने चेन्नई येथे इंडियन ऑईल याठिकाणी ॲप्रन्टिसशिप पूर्ण केली होती. त्यानंतर गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात बी. ई. इलेक्ट्रीक्लच्या दुसऱ्या वर्षाला होता. जयेशचा लहान भाऊ हा बी. ई. मेकॅनिकलचे शिक्षण घेत आहे. उज्ज्वल हा एका वित्तीय संस्थेत वसुलीचे काम करायचा, तर त्याचे वडील ऑटोमोबाईल क्षेत्रात कामाला आहेत. उज्ज्वल हा कुटुंबासह मामाच्या गावाला स्थायिक झाला होता. त्याच्या पश्चात वडील राजेंद्र पाटील, आई सुनीता व लहान भाऊ असा परिवार आहे.