शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
5
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
6
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
7
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
8
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
9
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
10
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
11
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
12
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
13
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
14
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
15
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
16
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
17
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
18
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
19
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
20
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ

भुसावळची ओळख बौद्ध विहारांचे शहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:15 IST

वासेफ पटेल भुसावळ : शहराच्या पवित्र भूमीला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे चरणस्पर्श झालेले आहे. डाॅ.आंबेडकर अनुयायी सातत्याने समाजोपयोगी कार्यक्रम राबवत ...

वासेफ पटेल

भुसावळ : शहराच्या पवित्र भूमीला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे चरणस्पर्श झालेले आहे. डाॅ.आंबेडकर अनुयायी सातत्याने समाजोपयोगी कार्यक्रम राबवत युवकांना प्रेरणास्रोत व्हावे, असे कार्य करीत आहे. बौद्ध विहारांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरात विशेषत: आगवाली चाळ, चांदमारी चाळ, हद्दवाली चाळ, चाळीस बंगला, याशिवाय रेल्वेच्या काही परिसरांत भव्य असे पुरातन बौद्ध विहार मोठ्या दिमाखात उभे आहे. बौद्ध उपासक या ठिकाणी मोठ्या श्रद्धेने आपापले विधी करत असतात.

२८ वर्षांपासून सहभाग

बौद्ध विहाराच्या शहरात रेल्वेचे सेवानिवृत्त कर्मचारी भीमराव छगन साळुंके हे गेल्या २८ वर्षांपासून सातत्याने सामाजिक कार्यात हिरिरीने सहभाग घेत कार्य करीत आहेत.

अंधश्रद्धा दूर करण्यासाठी...

रेल्वे प्रशासनाने अतिक्रमण हटविण्यापूर्वी अस्तित्वात असलेल्या आगवाली चाळसह परिसरात भारतीय बौद्ध महासभा वार्ड शाखेच्या अध्यक्षाच्या निवडीला प्रत्येक दोन वर्षांनी संधी मिळत असे. अध्यक्षपदाची संधी साळुंके यांना सन १९८९ला मिळाल्यानंतर त्यांनी सन १९९१ला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मशताब्दी वर्षापासून ते १९९५ पर्यंत आंबेडकरांच्या प्रतिमेची हत्तीवरून मिरवणूक काढली, याशिवाय समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी त्यांनी वाटा उचलला आहे.

सातत्याने भरवत आहेत धम्म परिषद

शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर २०११ यापासून, तर २०२० पर्यंत सम्राट अशोक बौद्ध धर्म परिषद खंड न पडता सातत्याने सुरू आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या शनिवारी-रविवारी प्रामुख्याने धम्म परिषद परिषद भरवली जाते.

अभ्यासिका हॉल देतो युवकांना प्रेरणा

नवीन पिढीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावलावर पाऊल ठेवावे, ‘शिक्षण हे हत्यार’ मानावे, याकरिता समाजातील काही कार्यकर्त्यांनी आगवाळी चाळीत अभ्यासिका हॉलची सुरुवात केली. या ठिकाणी अनेक गरीब घरांचे विद्यार्थी तासन् तास वेगळ्या विषयावर अभ्यास करीत असतात.

भाविक देतात भेटी

भुसावळ शहर हे मुळातच बौद्ध विहारांची ओळख निर्माण करणारे शहर आहे. शहरात ठिकठिकाणी प्रशस्त बुद्धांचे विहार आहेत. या ठिकाणी अनेक भाविक दरवर्षी भेट देत असतात.

बुद्ध पौर्णिमा तीन कारणांसाठी विशेष

बुद्ध पौर्णिमा वैशाख पौर्णिमेला साजरी केली जाते. ही तिथी वर्षातील सगळ्यात पवित्र आणि महत्त्वाची असते. बुद्ध पौर्णिमा आणखी तीन कारणांसाठी विशेष आहे. ती कारणे म्हणजे, याच दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला होता. याच दिवशी बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती आणि याच दिवशी बुद्धांचं महानिर्वाण झालं होतं.

बुद्धांची शिकवण

बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी बौद्ध भिक्षुक ठिकठिकाणचे बुद्ध विहार आणि मठांमध्ये एकत्र येऊन प्रार्थना करतात. बुद्ध मूर्तीसमोर दीप लावतात. प्राथनास्थळं रंगीबेरंगी पताक्यांनी सजवली जातात. बुद्धांची शिकवण आयुष्यात आणण्याचा संकल्प या दिवशी केला जातो.