शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
2
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामुहिक राजीनामा
3
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
4
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
5
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
6
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
7
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
8
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
9
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
10
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
11
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
12
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
13
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
14
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
15
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
16
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
17
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
18
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
19
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
20
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळची ओळख बौद्ध विहारांचे शहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:15 IST

वासेफ पटेल भुसावळ : शहराच्या पवित्र भूमीला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे चरणस्पर्श झालेले आहे. डाॅ.आंबेडकर अनुयायी सातत्याने समाजोपयोगी कार्यक्रम राबवत ...

वासेफ पटेल

भुसावळ : शहराच्या पवित्र भूमीला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे चरणस्पर्श झालेले आहे. डाॅ.आंबेडकर अनुयायी सातत्याने समाजोपयोगी कार्यक्रम राबवत युवकांना प्रेरणास्रोत व्हावे, असे कार्य करीत आहे. बौद्ध विहारांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरात विशेषत: आगवाली चाळ, चांदमारी चाळ, हद्दवाली चाळ, चाळीस बंगला, याशिवाय रेल्वेच्या काही परिसरांत भव्य असे पुरातन बौद्ध विहार मोठ्या दिमाखात उभे आहे. बौद्ध उपासक या ठिकाणी मोठ्या श्रद्धेने आपापले विधी करत असतात.

२८ वर्षांपासून सहभाग

बौद्ध विहाराच्या शहरात रेल्वेचे सेवानिवृत्त कर्मचारी भीमराव छगन साळुंके हे गेल्या २८ वर्षांपासून सातत्याने सामाजिक कार्यात हिरिरीने सहभाग घेत कार्य करीत आहेत.

अंधश्रद्धा दूर करण्यासाठी...

रेल्वे प्रशासनाने अतिक्रमण हटविण्यापूर्वी अस्तित्वात असलेल्या आगवाली चाळसह परिसरात भारतीय बौद्ध महासभा वार्ड शाखेच्या अध्यक्षाच्या निवडीला प्रत्येक दोन वर्षांनी संधी मिळत असे. अध्यक्षपदाची संधी साळुंके यांना सन १९८९ला मिळाल्यानंतर त्यांनी सन १९९१ला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मशताब्दी वर्षापासून ते १९९५ पर्यंत आंबेडकरांच्या प्रतिमेची हत्तीवरून मिरवणूक काढली, याशिवाय समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी त्यांनी वाटा उचलला आहे.

सातत्याने भरवत आहेत धम्म परिषद

शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर २०११ यापासून, तर २०२० पर्यंत सम्राट अशोक बौद्ध धर्म परिषद खंड न पडता सातत्याने सुरू आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या शनिवारी-रविवारी प्रामुख्याने धम्म परिषद परिषद भरवली जाते.

अभ्यासिका हॉल देतो युवकांना प्रेरणा

नवीन पिढीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावलावर पाऊल ठेवावे, ‘शिक्षण हे हत्यार’ मानावे, याकरिता समाजातील काही कार्यकर्त्यांनी आगवाळी चाळीत अभ्यासिका हॉलची सुरुवात केली. या ठिकाणी अनेक गरीब घरांचे विद्यार्थी तासन् तास वेगळ्या विषयावर अभ्यास करीत असतात.

भाविक देतात भेटी

भुसावळ शहर हे मुळातच बौद्ध विहारांची ओळख निर्माण करणारे शहर आहे. शहरात ठिकठिकाणी प्रशस्त बुद्धांचे विहार आहेत. या ठिकाणी अनेक भाविक दरवर्षी भेट देत असतात.

बुद्ध पौर्णिमा तीन कारणांसाठी विशेष

बुद्ध पौर्णिमा वैशाख पौर्णिमेला साजरी केली जाते. ही तिथी वर्षातील सगळ्यात पवित्र आणि महत्त्वाची असते. बुद्ध पौर्णिमा आणखी तीन कारणांसाठी विशेष आहे. ती कारणे म्हणजे, याच दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला होता. याच दिवशी बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती आणि याच दिवशी बुद्धांचं महानिर्वाण झालं होतं.

बुद्धांची शिकवण

बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी बौद्ध भिक्षुक ठिकठिकाणचे बुद्ध विहार आणि मठांमध्ये एकत्र येऊन प्रार्थना करतात. बुद्ध मूर्तीसमोर दीप लावतात. प्राथनास्थळं रंगीबेरंगी पताक्यांनी सजवली जातात. बुद्धांची शिकवण आयुष्यात आणण्याचा संकल्प या दिवशी केला जातो.