शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

भुसावळची ओळख बौद्ध विहारांचे शहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:15 IST

वासेफ पटेल भुसावळ : शहराच्या पवित्र भूमीला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे चरणस्पर्श झालेले आहे. डाॅ.आंबेडकर अनुयायी सातत्याने समाजोपयोगी कार्यक्रम राबवत ...

वासेफ पटेल

भुसावळ : शहराच्या पवित्र भूमीला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे चरणस्पर्श झालेले आहे. डाॅ.आंबेडकर अनुयायी सातत्याने समाजोपयोगी कार्यक्रम राबवत युवकांना प्रेरणास्रोत व्हावे, असे कार्य करीत आहे. बौद्ध विहारांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरात विशेषत: आगवाली चाळ, चांदमारी चाळ, हद्दवाली चाळ, चाळीस बंगला, याशिवाय रेल्वेच्या काही परिसरांत भव्य असे पुरातन बौद्ध विहार मोठ्या दिमाखात उभे आहे. बौद्ध उपासक या ठिकाणी मोठ्या श्रद्धेने आपापले विधी करत असतात.

२८ वर्षांपासून सहभाग

बौद्ध विहाराच्या शहरात रेल्वेचे सेवानिवृत्त कर्मचारी भीमराव छगन साळुंके हे गेल्या २८ वर्षांपासून सातत्याने सामाजिक कार्यात हिरिरीने सहभाग घेत कार्य करीत आहेत.

अंधश्रद्धा दूर करण्यासाठी...

रेल्वे प्रशासनाने अतिक्रमण हटविण्यापूर्वी अस्तित्वात असलेल्या आगवाली चाळसह परिसरात भारतीय बौद्ध महासभा वार्ड शाखेच्या अध्यक्षाच्या निवडीला प्रत्येक दोन वर्षांनी संधी मिळत असे. अध्यक्षपदाची संधी साळुंके यांना सन १९८९ला मिळाल्यानंतर त्यांनी सन १९९१ला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मशताब्दी वर्षापासून ते १९९५ पर्यंत आंबेडकरांच्या प्रतिमेची हत्तीवरून मिरवणूक काढली, याशिवाय समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी त्यांनी वाटा उचलला आहे.

सातत्याने भरवत आहेत धम्म परिषद

शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर २०११ यापासून, तर २०२० पर्यंत सम्राट अशोक बौद्ध धर्म परिषद खंड न पडता सातत्याने सुरू आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या शनिवारी-रविवारी प्रामुख्याने धम्म परिषद परिषद भरवली जाते.

अभ्यासिका हॉल देतो युवकांना प्रेरणा

नवीन पिढीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावलावर पाऊल ठेवावे, ‘शिक्षण हे हत्यार’ मानावे, याकरिता समाजातील काही कार्यकर्त्यांनी आगवाळी चाळीत अभ्यासिका हॉलची सुरुवात केली. या ठिकाणी अनेक गरीब घरांचे विद्यार्थी तासन् तास वेगळ्या विषयावर अभ्यास करीत असतात.

भाविक देतात भेटी

भुसावळ शहर हे मुळातच बौद्ध विहारांची ओळख निर्माण करणारे शहर आहे. शहरात ठिकठिकाणी प्रशस्त बुद्धांचे विहार आहेत. या ठिकाणी अनेक भाविक दरवर्षी भेट देत असतात.

बुद्ध पौर्णिमा तीन कारणांसाठी विशेष

बुद्ध पौर्णिमा वैशाख पौर्णिमेला साजरी केली जाते. ही तिथी वर्षातील सगळ्यात पवित्र आणि महत्त्वाची असते. बुद्ध पौर्णिमा आणखी तीन कारणांसाठी विशेष आहे. ती कारणे म्हणजे, याच दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला होता. याच दिवशी बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती आणि याच दिवशी बुद्धांचं महानिर्वाण झालं होतं.

बुद्धांची शिकवण

बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी बौद्ध भिक्षुक ठिकठिकाणचे बुद्ध विहार आणि मठांमध्ये एकत्र येऊन प्रार्थना करतात. बुद्ध मूर्तीसमोर दीप लावतात. प्राथनास्थळं रंगीबेरंगी पताक्यांनी सजवली जातात. बुद्धांची शिकवण आयुष्यात आणण्याचा संकल्प या दिवशी केला जातो.