शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

भुसावळची ओळख बौद्ध विहारांचे शहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:15 IST

वासेफ पटेल भुसावळ : शहराच्या पवित्र भूमीला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे चरणस्पर्श झालेले आहे. डाॅ.आंबेडकर अनुयायी सातत्याने समाजोपयोगी कार्यक्रम राबवत ...

वासेफ पटेल

भुसावळ : शहराच्या पवित्र भूमीला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे चरणस्पर्श झालेले आहे. डाॅ.आंबेडकर अनुयायी सातत्याने समाजोपयोगी कार्यक्रम राबवत युवकांना प्रेरणास्रोत व्हावे, असे कार्य करीत आहे. बौद्ध विहारांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरात विशेषत: आगवाली चाळ, चांदमारी चाळ, हद्दवाली चाळ, चाळीस बंगला, याशिवाय रेल्वेच्या काही परिसरांत भव्य असे पुरातन बौद्ध विहार मोठ्या दिमाखात उभे आहे. बौद्ध उपासक या ठिकाणी मोठ्या श्रद्धेने आपापले विधी करत असतात.

२८ वर्षांपासून सहभाग

बौद्ध विहाराच्या शहरात रेल्वेचे सेवानिवृत्त कर्मचारी भीमराव छगन साळुंके हे गेल्या २८ वर्षांपासून सातत्याने सामाजिक कार्यात हिरिरीने सहभाग घेत कार्य करीत आहेत.

अंधश्रद्धा दूर करण्यासाठी...

रेल्वे प्रशासनाने अतिक्रमण हटविण्यापूर्वी अस्तित्वात असलेल्या आगवाली चाळसह परिसरात भारतीय बौद्ध महासभा वार्ड शाखेच्या अध्यक्षाच्या निवडीला प्रत्येक दोन वर्षांनी संधी मिळत असे. अध्यक्षपदाची संधी साळुंके यांना सन १९८९ला मिळाल्यानंतर त्यांनी सन १९९१ला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मशताब्दी वर्षापासून ते १९९५ पर्यंत आंबेडकरांच्या प्रतिमेची हत्तीवरून मिरवणूक काढली, याशिवाय समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी त्यांनी वाटा उचलला आहे.

सातत्याने भरवत आहेत धम्म परिषद

शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर २०११ यापासून, तर २०२० पर्यंत सम्राट अशोक बौद्ध धर्म परिषद खंड न पडता सातत्याने सुरू आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या शनिवारी-रविवारी प्रामुख्याने धम्म परिषद परिषद भरवली जाते.

अभ्यासिका हॉल देतो युवकांना प्रेरणा

नवीन पिढीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावलावर पाऊल ठेवावे, ‘शिक्षण हे हत्यार’ मानावे, याकरिता समाजातील काही कार्यकर्त्यांनी आगवाळी चाळीत अभ्यासिका हॉलची सुरुवात केली. या ठिकाणी अनेक गरीब घरांचे विद्यार्थी तासन् तास वेगळ्या विषयावर अभ्यास करीत असतात.

भाविक देतात भेटी

भुसावळ शहर हे मुळातच बौद्ध विहारांची ओळख निर्माण करणारे शहर आहे. शहरात ठिकठिकाणी प्रशस्त बुद्धांचे विहार आहेत. या ठिकाणी अनेक भाविक दरवर्षी भेट देत असतात.

बुद्ध पौर्णिमा तीन कारणांसाठी विशेष

बुद्ध पौर्णिमा वैशाख पौर्णिमेला साजरी केली जाते. ही तिथी वर्षातील सगळ्यात पवित्र आणि महत्त्वाची असते. बुद्ध पौर्णिमा आणखी तीन कारणांसाठी विशेष आहे. ती कारणे म्हणजे, याच दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला होता. याच दिवशी बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती आणि याच दिवशी बुद्धांचं महानिर्वाण झालं होतं.

बुद्धांची शिकवण

बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी बौद्ध भिक्षुक ठिकठिकाणचे बुद्ध विहार आणि मठांमध्ये एकत्र येऊन प्रार्थना करतात. बुद्ध मूर्तीसमोर दीप लावतात. प्राथनास्थळं रंगीबेरंगी पताक्यांनी सजवली जातात. बुद्धांची शिकवण आयुष्यात आणण्याचा संकल्प या दिवशी केला जातो.