शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

भुसावळ शहर झाले हगणदरीमुक्त

By admin | Updated: July 5, 2017 17:32 IST

नाशिक महसूल विभागातील एकमेव ‘अ’ वर्ग श्रेणीतील नगरपालिका असलेले भुसावळ शहर हगणदारीमुक्त झाले आहे.

ऑनलाईन लोकमत

भुसावळ,दि.5 -नाशिक महसूल विभागातील एकमेव  ‘अ’ वर्ग श्रेणीतील नगरपालिका असलेले भुसावळ शहर हगणदारीमुक्त झाले आहे. त्या आशयाचा ई-मेल संदेश बुधवारी 5 जुलै रोजी दुपारी 12 वा पालिका कार्यालयास प्राप्त झाल्याची माहीती नगराध्यक्ष रमण भोळे आणि मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर यांनी ‘लोकमत’ला दिली. 
केंद्रीय समितीकडून पाहणी
गेल्या 29 जून रोजी केंद्रीय समितीच्या पथकाने (क्वॉलिटी कौन्सिल ऑफ इंडिया) भुसावळ शहरातील नऊ ओडीएफ (हगणदारीमुक्त) ठिकाणांची पाहणी केली होती. केंद्रीय समितीचे आदेश आणि सूचनेनुसार समितीमधील अधिका:यांनी ओडीएफ ठिकाणांची पाहणी करुन त्याबाबतचा अहवाल केंद्रीय समितीकडे सादर केला होता. संपूर्ण भुसावळ शहर हगणदारीमुक्त झाले या आशयाचा ई-मेल संदेश दिल्ली येथील केंद्रीय समितीकडून बुधवारी पालिका प्रशासनाला आला.
विकासाचा पहिला टप्पा
गेल्या अनेक वर्षापासून भुसावळ शहराची अस्वच्छतेबाबत जी दुर्दशा  झाली होती, ती आता या केंद्रीय समितीच्या निर्णयाने संपली आहे. आम्ही आता जी कामे व वाटचाल सुरू केली आहे, त्याचा हा निर्णय पहिला टप्पा आहे. भुसावळ शहर हगणदारीमुक्त करण्यामागे पालिका कार्यालयातील कर्मचारी,अधिकारी,नगरसेवक यांचा सर्वाचा खारीचा वाटा आहे, मात्र याचे सर्व श्रेय भुसावळ शहरातील रहिवाशांनाच असल्याचे रमण भोळे यांनी या निर्णयावर बोलताना सांगितले.
 भुसावळ शहर अस्वच्छतेबाबत देशात दुस:या स्थानावर आले होते.त्यामुळे हे शहर आणि पालिका प्रशासनावर अस्वच्छतेबाबत जो एक मोठा डाग लागला होता तो आज भुसावळ शहर हगणदारीमुक्त झाल्याने पुसला गेला आहे, अशी भावना नगराध्यक्ष रमण भोळे यांनी ‘लोकमत’ जवळ बोलताना व्यक्त केली.
नगरपालिका कर्मचारी, अधिकारी आणि शहरवासीयांमध्ये आनंदाचे  वातावरण पसरले आहे.  नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष युवराज लोणारी,गटनेते हाजी मुन्ना तेली यांनी कर्मचा:यांचे स्वागत केले. प्रमोद नेमाडे, परिक्षीत ब:हाटे, दीपाली ब:हाटे, अॅड.बोधराज चौधरी, पाणी पुरवठा समितीचे सभापती किरण कोलते, रमाकांत महाजन, वसंत पाटील, गिरीश महाजन, सतीश सपकाळे, राजेंद्र नाटकर, मुकेश पाटील यांनी कर्मचा:यांचे स्वागत केले.