शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

भाजपच्या वाटेवर असल्याने आ. चिमणराव पाटील यांचे पालकमंत्र्यांवर आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे काम राष्ट्रवादीला आक्षेपार्ह वाटत नाही. मात्र, त्यांच्याच पक्षाचे आ. चिमणराव ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे काम राष्ट्रवादीला आक्षेपार्ह वाटत नाही. मात्र, त्यांच्याच पक्षाचे आ. चिमणराव पाटील यांना ते का आक्षेपार्ह वाटते, असा सवाल उपस्थित करून आ. पाटील यांचा एक पाय सध्या शिवसेनेत व एक पाय भाजपमध्ये आहे, त्यांना भाजपमध्ये जायचे असल्यानेच ते अशा प्रकारचे आरोप करताय, असा टोला राष्ट्रवादीचे माजी आ. सतीश पाटील यांनी लगावला. रविवारी पक्षाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

माजी महानगराध्यक्ष विनोद देशमुख यांचे निलंबन पक्षाने मागे घेतले असून त्यांना पक्षात घेण्यासंदर्भात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. २०१४ च्या निवडणुकीत आपला पराभव शक्य नव्हता, तो घडवून आणला असे वक्तव्य आ. चिमणराव पाटील यांनी केल्यानंतर याचे खंडण करणे गरजेचे असल्याचे सांगत, वय ७० पेक्षा अधिक वाढल्याने मानसिक संतुलनही अधिक बिघडते, असा टोला सतीश पाटील यांनी लगावला. राष्ट्रवादीत कार्यकर्ते मोठे करण्याची मानसिकता आहे. मात्र, शिवसेनेत वेगळे चित्र दिसतेय, जि. प. सदस्य डॉ. हर्षल माने यांची शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून निवड झाल्यानंतर आ. पाटील यांची झोप का उडाली, असा सवाल त्यांनी यावेळी केला. दरम्यान, महागाईविरोधात प्रत्येक तालुक्यात राष्ट्रवादीचे आंदोलन होणार असल्याचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांनी सांगितले. यावेळी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी आ. मनीष जैन, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, प्रदेश प्रवक्ता योगेश देसले, कार्याध्यक्ष विलास पाटील, जिल्हा बँक संचालक संजय पवार, महिला शहराध्यक्षा मंगला पाटील, प्रतिभा शिरसाठ आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.

विनोद देशमुख यांना ऑक्टोबर २०२० मध्ये पक्षाने निलंबित केले होते. त्यांच्याकडून काही चुका झाल्या. मात्र, पक्षात अनेकांना प्रवेश देत असताना चुका सुधारण्याची संधी दिली गेली पाहिजे, त्यामुळे देशमुखांचे निलंबन मागे घेण्यासाठी आपण प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांच्याशी संपर्क केला, असे सतीश पाटील यांनी सांगितले. दरम्यान, शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या अनुपस्थितीवरून त्यांना पत्रकार परिषदेचा निरोप मिळाला नसेल, त्यांनाही कामाची संधी आहे त्यांनी काम करावे, असे सतीश पाटील म्हणाले.

पक्षाध्यक्षांना दिले पत्र

एरंडोल-पारोळा तालुक्यात राष्ट्रवादी व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना डावलले जात असून आघाडी धर्म हा केवळ राष्ट्रवादीनेच पाळावा का? याबाबत आपण पक्षाध्यक्षांना पत्र पाठविल्याची माहिती सतीश पाटील यांनी दिली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही एकच नेता व एकच संघटना यानुसार वेगवेगळी भूमिका मांडू नये, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

शाई प्रकरणाची मागितली माफी

आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फलकावरील फोटोवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शाई फेकणे हे चुकीचे आहे. शेवटी पदाचा मान राखला पाहिजे. मात्र, लोकांना जेव्हा त्रास होतो, त्या त्रासातून काही गोष्टी घडत असतात. मात्र, या प्रकाराची आम्ही माफी मागतो, असे सतीश पाटील म्हणाले.