शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

दोन हजारांहून अधिक हेक्टर क्षेत्रावरील केळी भुईसपाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:14 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गुरुवार, २७ मे रोजी रावेर व मुक्ताईनगर तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस व चक्रीवादळामुळे केळीच्या ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गुरुवार, २७ मे रोजी रावेर व मुक्ताईनगर तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस व चक्रीवादळामुळे केळीच्या पिकाला मोठा फटका बसला आहे. यामध्ये २०४२.६० हेक्टर क्षेत्रावरील केळीचे नुकसान झाले आहे. याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला. दोन्ही तालुक्यांपैकी मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांचे अधिक नुकसान झाले आहे.

अवकाळी पाऊस व वादळ, यामुळे दर महिन्याला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फटका बसत आहे. यामुळे हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान होत असून, बळीराजा चिंतित झाला आहे. या महिन्यात पुन्हा २७ मे रोजी रावेर व मुक्ताईनगर तालुक्यात अवकाळी पाऊस व चक्रीवादळ झाले. यामध्ये केळीच्या पिकाला मोठा फटका बसला.

मुक्ताईनगर तालुक्यात २,००० अधिक शेतकरी बाधित

केळी उत्पादक शेतकऱ्यांना दरवर्षी निसर्गाच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. यात यंदा जमिनीत चांगले पाणी असल्याने केळ्याचे पीक चांगले आले. मात्र, निसर्गाच्या लहरीपणाचा फटका या पिकाला बसला असून, मुक्ताईनगर तालुक्यातील दोन हजार ३५ शेतकऱ्यांचे एक हजार २८५ हेक्टर वरील केळीचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील ३१ गावांना हा फटका बसला. यासोबतच रावेर तालुक्यातही २३ तालुक्यातील ९४९ शेतकऱ्यांचे ७५७.६० हेक्टरवरील केळी पिकाचे नुकसान झाले आहे. दोन्ही तालुक्यांत मिळून २०४२.६० हेक्टर क्षेत्रावरील केळीचे नुकसान झाले आहे.

३३ टक्‍क्‍यांच्या वर नुकसान

रावेर व मुक्ताईनगर तालुक्यात केळीचे झालेले हे नुकसान ३३ टक्क्यांपेक्षा अधिक असून, याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने शुक्रवारी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना सादर केला.

पीक विम्याचा लाभ मिळण्याची मागणी

केळी उत्पादक शेतकऱ्यांना प्रत्येक वेळी नुकसान सहन करावे लागत असून, यामुळे हा शेतकरी हवालदिल झाला आहे. पीक विम्याची रक्कम भरूनही जाचक अटीमुळे केळी उत्पादक शेतकरी त्यापासून वंचित राहत आहे. आता मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, पीक विम्याचा लाभ मिळावा, अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

पालकमंत्री आज करणार पाहणी

रावेर व मुक्ताईनगर तालुक्यात चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पालकमंत्री गुलाबराव पाटील हे शनिवारी पाहणी करणार आहे. दुपारी ३.३० वाजता मुक्ताईनगर तालुक्यातील मेंढाळदे, उचंदा, शेमळदे इतर ठिकाणी पाहणी करून शेतकऱ्यांची भेट घेणार आहे. ४.४५ वाजता रावेर तालुक्यातील विटवा, निंबोल, ऐनपूर व इतर ठिकाणी ते पाहणी करणार आहेत.