शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

बालकवी ठोंबरे यांचे स्मारक अपूर्णच...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:12 IST

धरणगाव : बालकवींनी ज्या भूमीत जन्म घेतला, त्या भूमीत साकारले जाणारे स्मारक गेल्या दहा वर्षापासून अर्धवट अवस्थेत निधीअभावी रखडले ...

धरणगाव : बालकवींनी ज्या भूमीत जन्म घेतला, त्या भूमीत साकारले जाणारे स्मारक गेल्या दहा वर्षापासून अर्धवट अवस्थेत निधीअभावी रखडले आहे.

काव्यजगतातून प्रचंड प्रमाणात संतापाची लाट उसळताना दिसून येत आहे.

आश्वासने दिले जातात. मात्र काम रखडलेलेच दिसून येते. माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या काळात स्मारकाचे काम सुरू झाले होते.

प्रशासनाने ते पूर्ण करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. १३ ऑगस्ट १८९० मध्ये धरणगावला जन्मलेल्या बालकवींची काव्य प्रतिभा याच भूमीत फुलली. साहित्य कला मंच या संस्थेच्या पाठपुराव्यामुळे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी सन २०१०-११ मध्ये बालकवींच्या स्मारकाची मुहूर्तमेढ रोवली.

दोन एकर गावठाण जागेत बालकवींचे स्मारक उभारण्याचे काम त्यांनी हाती घेतले.

स्मारकाच्या संरक्षक भिंतीसाठी ५५ लाख निधी

जिल्हा नियोजन मंडळातर्फे मंजूर संरक्षक भिंत व प्रवेशद्वार उभारले.

५ कोटी ८० लाखांचा प्रस्ताव प्रलंबित

स्मारकाची संरक्षक भिंत व प्रवेशद्वाराच्या नंतर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने स्मारकाचा आराखडा तयार करून सन २०१२-१३ मध्ये पुढील कामासाठी ५ कोटी ८० लाखांचा प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हा नियोजन मंडळाकडे पाठविला आहे. मात्र या प्रस्तावाची दखल अद्याप घेतली गेलेली नाही. त्यामुळे बालकवींच्या स्मारकाचे काम रखडले आहे.

स्मारक होणार साहित्यिकांची पंढरी

निसर्ग कवी बालकवी उर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे स्मारक साकारले गेल्यास हे स्मारक साहित्यिकांची ‘पंढरी’ म्हणून नावारूपाला येईल. येथे विविध साहित्यिक उपक्रम राबविले जातील. स्मारक झाल्याशिवाय कवितांची कार्यशाळा, बालकवी साहित्य संशोधन केंद्र, आदी उपक्रम सुरू होणार नाही. तसेच कोलमडलेला औदुंबर या स्मारकाच्या ठिकाणी नव्याने उभारण्याची संधी मिळणार आहे.

===Photopath===

200621\20jal_10_20062021_12.jpg

===Caption===

(छाया कल्पेश महाजन)