शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

१०० कोटींच्या निधीसाठी सत्ताधाऱ्यांची न्यायालयात जाण्याची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महापालिकेत सत्तेत आल्यानंतर १६ ऑगस्ट २०१८ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महापालिकेत सत्तेत आल्यानंतर १६ ऑगस्ट २०१८ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेला नगरोत्थान अंतर्गत १०० कोटी रुपयांचा निधी जाहीर केला होता. मात्र, विद्यमान शासनाने या निधीवर स्थगिती आणल्याने हा निधी मंजुरीअभावी पडून आहे. आता हा निधी महापालिकेला मिळावा, यासाठी मनपातील सत्ताधारी भाजपने यासाठी न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे. भाजपच्या नगरसेविका ॲड. शुचिता हाडा यांनी १६ रोजी होणाऱ्या महासभेत यासंबंधीचा प्रस्तावदेखील दिला आहे.

मनपाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने गेल्या काही वर्षांपासून महापालिकेला शहरातील नागरिकांना सुविधा पुरविता येत नाहीत. त्यातच सत्तेत आल्यानंतर शहराचा चेहरामोहरा बदलवून देऊ, असे आश्वासन देत सत्तेत आलेल्या भाजपला अडीच वर्षांत शहरात चांगले काम करता आलेले नाही. अशा परिस्थितीत तत्कालीन राज्य शासनाने मंजूर केलेल्या १०० कोटींच्या निधीला स्थगिती आल्यामुळे नवीन कामांसाठी मनपाकडे निधी शिल्लक नाही. त्यामुळे आता शासनाने स्थगिती दिलेल्या १०० कोटी रुपयांचा निधी परत मिळण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी कंबर कसली आहे.

दोन वर्षांपासून निधी मंजुरीच्या प्रतीक्षेत

१०० पैकी ४२ कोटींच्या निधीच्या कामांना शासनाने मंजुरी दिली होती. तसेच निविदा प्रक्रियादेखील राबविण्यात आली होती. तसेच उर्वरित ५८ कोटींच्या कामांना अद्याप मंजुरी मिळाली नाही. १६ ऑगस्ट २०१८ रोजी निधी मंजूर झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांना देखील वर्षभर या निधीतून होणाऱ्या कामांचे नियोजन करता आले नव्हते. त्यातच राज्यात भाजपची सत्ता जाऊन महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर ४ डिसेंबर २०१९ रोजी या निधीवर शासनाने स्थगिती आणली आहे. त्यामुळे शहरातील नवीन रस्त्यांची कामे होऊ शकलेली नाहीत.

वरणगाव नगरपालिकेला मिळाला निधी

राज्यात सरकार बदलल्यानंतर अनेक मनपा व नगरपालिकेत तत्कालीन शासनाने मंजूर केलेल्या निधीवर राज्य शासनाने स्थगिती आणली होती. जिल्ह्यातील वरणगाव नगरपालिका पाणीपुरवठा योजनेच्या २० कोटींच्या निधीवर देखील राज्य शासनाने स्थगिती आणली होती. नगरपालिकेने याबाबत न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने शासनाला हा निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्यानंतर शासनाने वरणगाव नगरपालिकेला निधी परत केला आहे. आमच्याकडूनही राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. मात्र, जर निधी प्राप्त होत नसेल तर हा निधी परत मिळवण्यासाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करावी लागणार आहे, अशी माहिती ॲड. शुचित हाडा यांनी दिली. महासभेपुढे हा प्रस्ताव ठेवला असून, मंजुरी मिळाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू केली जाईल, असेही ॲड. हाडा यांनी सांगितले.