शहरं
Join us  
Trending Stories
1
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
4
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
5
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
6
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
7
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
8
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
9
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
10
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
11
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
12
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
13
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
14
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
15
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
16
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
17
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
18
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
19
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

१०० कोटींच्या निधीसाठी सत्ताधाऱ्यांची न्यायालयात जाण्याची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महापालिकेत सत्तेत आल्यानंतर १६ ऑगस्ट २०१८ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महापालिकेत सत्तेत आल्यानंतर १६ ऑगस्ट २०१८ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेला नगरोत्थान अंतर्गत १०० कोटी रुपयांचा निधी जाहीर केला होता. मात्र, विद्यमान शासनाने या निधीवर स्थगिती आणल्याने हा निधी मंजुरीअभावी पडून आहे. आता हा निधी महापालिकेला मिळावा, यासाठी मनपातील सत्ताधारी भाजपने यासाठी न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे. भाजपच्या नगरसेविका ॲड. शुचिता हाडा यांनी १६ रोजी होणाऱ्या महासभेत यासंबंधीचा प्रस्तावदेखील दिला आहे.

मनपाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने गेल्या काही वर्षांपासून महापालिकेला शहरातील नागरिकांना सुविधा पुरविता येत नाहीत. त्यातच सत्तेत आल्यानंतर शहराचा चेहरामोहरा बदलवून देऊ, असे आश्वासन देत सत्तेत आलेल्या भाजपला अडीच वर्षांत शहरात चांगले काम करता आलेले नाही. अशा परिस्थितीत तत्कालीन राज्य शासनाने मंजूर केलेल्या १०० कोटींच्या निधीला स्थगिती आल्यामुळे नवीन कामांसाठी मनपाकडे निधी शिल्लक नाही. त्यामुळे आता शासनाने स्थगिती दिलेल्या १०० कोटी रुपयांचा निधी परत मिळण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी कंबर कसली आहे.

दोन वर्षांपासून निधी मंजुरीच्या प्रतीक्षेत

१०० पैकी ४२ कोटींच्या निधीच्या कामांना शासनाने मंजुरी दिली होती. तसेच निविदा प्रक्रियादेखील राबविण्यात आली होती. तसेच उर्वरित ५८ कोटींच्या कामांना अद्याप मंजुरी मिळाली नाही. १६ ऑगस्ट २०१८ रोजी निधी मंजूर झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांना देखील वर्षभर या निधीतून होणाऱ्या कामांचे नियोजन करता आले नव्हते. त्यातच राज्यात भाजपची सत्ता जाऊन महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर ४ डिसेंबर २०१९ रोजी या निधीवर शासनाने स्थगिती आणली आहे. त्यामुळे शहरातील नवीन रस्त्यांची कामे होऊ शकलेली नाहीत.

वरणगाव नगरपालिकेला मिळाला निधी

राज्यात सरकार बदलल्यानंतर अनेक मनपा व नगरपालिकेत तत्कालीन शासनाने मंजूर केलेल्या निधीवर राज्य शासनाने स्थगिती आणली होती. जिल्ह्यातील वरणगाव नगरपालिका पाणीपुरवठा योजनेच्या २० कोटींच्या निधीवर देखील राज्य शासनाने स्थगिती आणली होती. नगरपालिकेने याबाबत न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने शासनाला हा निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्यानंतर शासनाने वरणगाव नगरपालिकेला निधी परत केला आहे. आमच्याकडूनही राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. मात्र, जर निधी प्राप्त होत नसेल तर हा निधी परत मिळवण्यासाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करावी लागणार आहे, अशी माहिती ॲड. शुचित हाडा यांनी दिली. महासभेपुढे हा प्रस्ताव ठेवला असून, मंजुरी मिळाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू केली जाईल, असेही ॲड. हाडा यांनी सांगितले.