शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

जळालेल्या ‘कोर्टा’ची वास्तू देतेय ‘ऑगस्ट क्रांती’ची साक्ष

By admin | Updated: May 19, 2017 12:24 IST

महात्मा गांधींनी ब्रिटीशांना ‘चले जाव’ म्हणताच देश पेटून उठला. त्यात अमळनेरही मागे नव्हते.

अतुल जोशी / ऑनलाइन लोकमतअमळनेर, जि. जळगाव, दि. 19 - अमळनेर शहराची ओळख केवळ संताची भूमी, शिक्षण पंढरी एवढीच मर्यादीत नाही तर क्रांतीकारकांचीही भूमी म्हणून शहर प्रसिद्ध आहे. महात्मा गांधींनी ब्रिटीशांना ‘चले जाव’ म्हणताच देश पेटून उठला. त्यात अमळनेरही मागे नव्हते. मातृह्यदयी सानेगुरूजींचा कणखर आदेश येताच स्वातंत्र्याच्या अग्नीकुंडात अनेकांनी उडय़ा घेतल्या. ऑगस्ट क्रांती येथेही घडली. येथील क्रांतीकारकांनी एका रात्रीतून टपाल कार्यालय, रेल्वेस्थानक व न्यायालयाच्या इमारतीची होळी केली. या जाळलेल्या वास्तुंपैकी आज फक्त माळीवाडय़ात असलेली ‘कोर्टा’ची वास्तू ऐतिहासिक क्रांतीची, शुरविरांच्या पराक्रमाची साक्ष देत भगAावस्थेत उभी आहे. 8 ऑगस्ट 1942 रोजी ब्रिटीश सरकारने आपली भारतातील सत्ता काढून घेण्याचा ऐतिहासिक ठराव कॉँग्रेसच्या कायदे मंडळाने संमत केला. ‘चलेजाव’ अशी घोषणा गांधीजींनी केली. त्या वेळी जनताही  स्वातंत्र्याच्या लढय़ात उतरली होती.असे असताना अमळनेर शांत होते. ही बाब सानेगुरूजींना सहन झाली नाही. त्यांनी  डॉ. उत्तमराव पाटील यांना चिठ्ठी लिहली.‘..अशा गंभीर प्रसंगी माझा खान्देश शांत का? अमळनेरची जनता जर काहीच करणार नसेल तर याच अमळनेरातील पाच कंदील समोर मी माङया शरीराची होळी करेल..’ गुरूजींचा संदेश अमळनेरकरांच्या ह्रदलाला भिडला. आंदोलनाचे नेतृत्व क्रांतीविरंगना लीलाताई उत्तमराव पाटील यांनी केले. लीलाताईंनी सभा घेतली. त्यात सानेगुरूजींचा संदेश वाचून दाखवला. 14 ऑगस्ट 1942 रोजी क्रांतीकारकांनी अमळनेरातील सरकारी कार्यालयांची होळी करण्याचा सपाटाच लावला. क्रांतीकारकांनी मामलेदाराच्या टांग्याची होळी केली. त्यानंतर टपाल कार्यालय जाळले. तेथून मोर्चा रेल्वस्थानकाकडे वळला. रेल्वे स्टेशन जाळून त्याचे स्मशान केले. क्रांतीकारक तेवढय़ावरच थांबले नाहीत  तेथून ते माळी वाडय़ातील कोर्टाकडे गेले. कोर्टाची  राख केली.पूर्वी ज्याठिकाणी मोकळे मैदान होते, तेथे आता नवीन टपाल कार्यालय आहे. तर रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण झालेले आहे. पण माळीवाडय़ात त्याकाळी जाळलेले ‘कोर्ट’ भगAावस्थेत आजही इतिहासाची साक्ष देत उभे आहे. कोर्टाचीच दगडी चिरेबंदी आजही भक्कमपणे उभी आहे.स्वातंत्र्य संग्रामात अमळनेरकरांनी केलेल्या अमूल्य कामगिरीची साक्ष देत कोर्टाच्या विटांच्या भिंती उभ्या आहेत. हा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी तसेच ज्यांनी-ज्यांनी या क्रांतीपर्वात सहभाग घेतला त्यांची आठवण म्हणून किमान पुतळे तरी उभारले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त होवू लागली आहे.