शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
2
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
3
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
4
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
5
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
7
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
8
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
9
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
10
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
11
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
12
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
13
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
14
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
15
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
16
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
18
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
19
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
20
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं

जळालेल्या ‘कोर्टा’ची वास्तू देतेय ‘ऑगस्ट क्रांती’ची साक्ष

By admin | Updated: May 19, 2017 12:24 IST

महात्मा गांधींनी ब्रिटीशांना ‘चले जाव’ म्हणताच देश पेटून उठला. त्यात अमळनेरही मागे नव्हते.

अतुल जोशी / ऑनलाइन लोकमतअमळनेर, जि. जळगाव, दि. 19 - अमळनेर शहराची ओळख केवळ संताची भूमी, शिक्षण पंढरी एवढीच मर्यादीत नाही तर क्रांतीकारकांचीही भूमी म्हणून शहर प्रसिद्ध आहे. महात्मा गांधींनी ब्रिटीशांना ‘चले जाव’ म्हणताच देश पेटून उठला. त्यात अमळनेरही मागे नव्हते. मातृह्यदयी सानेगुरूजींचा कणखर आदेश येताच स्वातंत्र्याच्या अग्नीकुंडात अनेकांनी उडय़ा घेतल्या. ऑगस्ट क्रांती येथेही घडली. येथील क्रांतीकारकांनी एका रात्रीतून टपाल कार्यालय, रेल्वेस्थानक व न्यायालयाच्या इमारतीची होळी केली. या जाळलेल्या वास्तुंपैकी आज फक्त माळीवाडय़ात असलेली ‘कोर्टा’ची वास्तू ऐतिहासिक क्रांतीची, शुरविरांच्या पराक्रमाची साक्ष देत भगAावस्थेत उभी आहे. 8 ऑगस्ट 1942 रोजी ब्रिटीश सरकारने आपली भारतातील सत्ता काढून घेण्याचा ऐतिहासिक ठराव कॉँग्रेसच्या कायदे मंडळाने संमत केला. ‘चलेजाव’ अशी घोषणा गांधीजींनी केली. त्या वेळी जनताही  स्वातंत्र्याच्या लढय़ात उतरली होती.असे असताना अमळनेर शांत होते. ही बाब सानेगुरूजींना सहन झाली नाही. त्यांनी  डॉ. उत्तमराव पाटील यांना चिठ्ठी लिहली.‘..अशा गंभीर प्रसंगी माझा खान्देश शांत का? अमळनेरची जनता जर काहीच करणार नसेल तर याच अमळनेरातील पाच कंदील समोर मी माङया शरीराची होळी करेल..’ गुरूजींचा संदेश अमळनेरकरांच्या ह्रदलाला भिडला. आंदोलनाचे नेतृत्व क्रांतीविरंगना लीलाताई उत्तमराव पाटील यांनी केले. लीलाताईंनी सभा घेतली. त्यात सानेगुरूजींचा संदेश वाचून दाखवला. 14 ऑगस्ट 1942 रोजी क्रांतीकारकांनी अमळनेरातील सरकारी कार्यालयांची होळी करण्याचा सपाटाच लावला. क्रांतीकारकांनी मामलेदाराच्या टांग्याची होळी केली. त्यानंतर टपाल कार्यालय जाळले. तेथून मोर्चा रेल्वस्थानकाकडे वळला. रेल्वे स्टेशन जाळून त्याचे स्मशान केले. क्रांतीकारक तेवढय़ावरच थांबले नाहीत  तेथून ते माळी वाडय़ातील कोर्टाकडे गेले. कोर्टाची  राख केली.पूर्वी ज्याठिकाणी मोकळे मैदान होते, तेथे आता नवीन टपाल कार्यालय आहे. तर रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण झालेले आहे. पण माळीवाडय़ात त्याकाळी जाळलेले ‘कोर्ट’ भगAावस्थेत आजही इतिहासाची साक्ष देत उभे आहे. कोर्टाचीच दगडी चिरेबंदी आजही भक्कमपणे उभी आहे.स्वातंत्र्य संग्रामात अमळनेरकरांनी केलेल्या अमूल्य कामगिरीची साक्ष देत कोर्टाच्या विटांच्या भिंती उभ्या आहेत. हा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी तसेच ज्यांनी-ज्यांनी या क्रांतीपर्वात सहभाग घेतला त्यांची आठवण म्हणून किमान पुतळे तरी उभारले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त होवू लागली आहे.