शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
3
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
4
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
5
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
7
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
8
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
9
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
10
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
11
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
12
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
13
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
14
Payal Gaming: कोण आहे पायल गेमिंग? १.२० मिनटांचा MMS लीक झाल्यानंतर आली चर्चेत!
15
Video: BJP आमदाराच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; तब्बल ७० लाखांच्या फटाक्यांची केली आतषबाजी
16
ओला-उबरला टक्कर! १ जानेवारीपासून 'भारत टॅक्सी' ॲप होणार लाँच; प्रवाशांना स्वस्त प्रवास आणि ड्रायव्हर्सची होणार जास्त कमाई
17
लग्नानंतर एका वर्षात शोभिता धुलिपाला देणार गुडन्यूज? सासरे नागार्जुन म्हणाले, "योग्य वेळ..."
18
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
19
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
20
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

चांगल्या मालिका येण्यासाठी प्रेक्षकांनीच आवड बदलावी - संतोष जुवेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 17:47 IST

बहुतांश टीव्ही मालिकांमध्ये वास्तवता नाही

ठळक मुद्देवेबसिरीजमुळे अनेक चाहते मिळालेगरजेपेक्षा जास्त निर्मितीमुळे मराठी चित्रपट प्रेक्षकांविनारंगभूमीचा अनुभव महत्वाचा

जळगाव: एका सिरीयल निर्मात्या कंपनीने टीव्ही मालिकांमध्ये सास-बहूच्या भांडणांचा रतीब घालून लागोपाठ त्याच पद्धतीच्या मालिका सादर करून मालिकांचा दर्जा व प्रेक्षकांची आवडही बिघडवून टाकली आहे. बहुतांश टीव्ही मालिकांमध्ये वास्तवता नाही. चांगल्या मालिकांची निर्मिती होण्यासाठी प्रेक्षकांनी आपली आवड बदलून या सास-बहूच्या मालिकांकडे पाठ फिरविली पाहिजे, असे आवाहन टीव्ही, चित्रपट व नाट्य कलावंत संतोष जुवेकर यांनी रविवारी दुपारी पत्रपरिषदेत केले.मु.जे. महाविद्यालयात आयोजित ‘खान्देश गॉट टॅलेंट’ स्पर्धेनिमित्ताने आलेल्या जुवेकर यांनी महाविद्यालयाच्या ‘इव्हेंट विभागात’ पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी केसीई सोसायटीचे सदस्य प्रा.चारूदत्त गोखले, समन्वयक चंद्रकांत भंडारी, पत्रकारिता विभाग प्रमुख विश्वजीत चौधरी आदी उपस्थित होते.वेबसिरीजमुळे अनेक चाहते मिळालेवेबसिरीजमध्येही काम केले आहे. त्याचा अनुभव कसा वाटतो? या प्रश्नावर जुवेकर म्हणाले की, यू-ट्यूबवर सेन्सॉरबोर्ड नाही. त्यामुळे कलाकार म्हणून हवे तसे व्यक्त होता येते. कारण चित्रपट, नाट्य कलावंत म्हणून प्रतिमा निर्माण झालेली असली तरीही त्याआधी मी एक माणूस आहे. माझ्या मित्रांना, ओळखीच्या लोकांना मला बघताना त्यात सहजता वाटली पाहिजे. त्याप्रमाणे वेबसिरीजमध्ये अगदी सहज व्यक्त झालो. त्यामुळे त्या वेबसिरीजमुळे खूप चाहते मिळाले. भविष्यात काही वेब फिल्म्स, शॉर्ट फिल्म्स करण्याचा विचार आहे.गरजेपेक्षा जास्त निर्मितीमुळे मराठी चित्रपट प्रेक्षकांविनामराठी चित्रपटांना पुरेसा प्रेक्षक मिळत नाही. कारण टीव्हीवर नवीन चित्रपट महिना, दोन महिन्यात येणार, हे माहिती असल्याने प्रेक्षक घराबाहेर पडत नाही. त्यातच जो प्रेक्षकवगर आहे, तो मध्यम व सामान्य वर्गातील आहे. त्यामुळे ३०-४० हजार रूपये पगार असलेल्या व्यक्तीला महिन्यातून एकदा जरी कुटुंबासमवेत चित्रपट बघायला चित्रपटगृहात जायचे म्हटले तरी चार जणांसाठी दीड हजारांपर्यंत खर्च येतो. अशा स्थितीत जर महिन्याला चार-पाच चित्रपट प्रदर्शित होणार असतील, तर साहजिकच एखाद्याच चित्रपटाला न्याय मिळतो. त्यातच सैराटला यश मिळाल्यापासून थोडा पैसा मिळालेला व्यक्ती चित्रपट काढण्याच्या मागे लागतो. मात्र चित्रपट काढणे वाटते तितके सोपे नाही. तसेच ‘मार्केटिंग’अभावी अनेक चित्रपट लोकांपर्यंत पोहोचतच नाहीत, अशी खंतही व्यक्त केली.विक्रम गोखले आदर्शमराठी चित्रपटसृष्टीतील आदर्श कोण? या प्रश्नावर जुवेकर म्हणाले की, विक्रम गोखले, मकरंद राजाध्यक्ष हे त्यांच्यासाठी आदर्श असल्याचे सांगितले.  नाम फाऊंडेशनतर्फे मराठी चित्रपट कलावंतांनी कार्य सुरू केले आहे. त्याबाबत विचारणा केली असता जुवेकर म्हणाले की, यात सर्वाधिक श्रेय अरविंद जगताप यांना जाते. त्यांचीच ही मूळ संकल्पना. मात्र कलावंत जोडले गेले तर लोकांचा अधिक प्रतिसाद मिळतो. त्यामुळे नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांना त्यांनी या कामात जोडले. नाना व मकरंद ही मोठी नावे आहेत. त्यांनीही तेवढीच मोठी भूमिका यात पार पाडली आहे.रंगभूमीचा अनुभव महत्वाचातुम्ही नाटक, सिरीयल्स व चित्रपट या तिन्ही माध्यमात काम केले आहे. कोणता अनुभव चांगला वाटला? या प्रश्नावर जुवेकर म्हणाले की, तिन्ही माध्यमे वेगळी आहेत. मात्र रंगभूमीवर काम केलेला कलावंत हा तावून-सलाखून निघालेल्या सोन्यासारखा असतो. रंगभूमीवर ‘लाईव्ह परफॉर्मन्स’ असतो. प्रेक्षकांची दादही लगेच समजते. टीव्ही, सिनेमाचे तसे नाही, त्यातच सिरीयलमधील कलावंतांना तर त्या पात्राच्या नावानेच ओळखले जाते. सिरीयल संपली की वर्षभरात लोक विसरून जातात. त्यापेक्षा चित्रपटातील भूमिका मात्र लोकांच्या कायम स्मरणात राहतात.