शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

कोरोना काळात ४८ महिलांवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या काळात जळगाव जिल्ह्यात मार्च व एप्रिल या दोन महिन्यात २२ महिलांवर बलात्कार झाले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाच्या काळात जळगाव जिल्ह्यात मार्च व एप्रिल या दोन महिन्यात २२ महिलांवर बलात्कार झाले आहेत तर ४६ महिलांचा विनयभंग झाल्याची नोंद पोलीस दप्तरी आहे. या दोन महिन्यात महिला अत्याचाराच्या ६८ घटना घडलेल्या आहेत.

कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्याने प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. आस्थापना विविध उद्योग बंद ठेवण्यात आले आहे. शासकीय कार्यालयांमध्ये देखील फक्त पाच टक्के अधिकारी-कर्मचाऱ्यांना उपस्थिती लागू आहे. त्यामुळे त्याचा परिणाम वेगवेगळ्या क्षेत्रावर झालेला आहे, असे असताना महिला अत्याचाराच्या घटना मात्र कमालीच्या वाढलेल्या आहेत. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात बलात्काराच्या ४० तर विनयभंगाच्या ९८ अशा १३८ घटनांची पोलीस ठाण्यांमध्ये नोंद झालेली आहे.

२०१९ मध्ये जळगाव जिल्ह्यात बलात्काराच्या १०९ घटना घडल्या होत्या तर २०२० मध्ये ९१ घटना घडल्या होत्या. महिन्याला सरासरी ७ ते ८ घटनांची नोंद होती. आता या चार महिन्यात बलात्कार ४० घटना घडलेल्या आहेत, सरासरी एका महिन्यात बलात्काराच्या १० घटना घडत आहेत. विनयभंगाच्या चार महिन्यात ९८ घटना घडलेल्या आहेत. मागील वर्षभरात विनयभंगाच्या ३०४ घटना घडल्या होत्या.