शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

आर्टिकल- कचरा वेचक, बालमजूर, आर्थिक दुर्बल घटकातील मुले आणि कोरोना...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:32 IST

ऑक्टोबरमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार केरळ राज्यात लॉकडाऊनपासून सुमारे १७३ मुलांनी आत्महत्या केल्या आहेत. यातील बहुतांश आत्महत्या या कुटुंबाकडे शिक्षण ...

ऑक्टोबरमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार केरळ राज्यात लॉकडाऊनपासून सुमारे १७३ मुलांनी आत्महत्या केल्या आहेत. यातील बहुतांश आत्महत्या या कुटुंबाकडे शिक्षण सुरू ठेवण्यासाठी संसाधने नाहीत म्हणून झाल्या आहेत. बऱ्याच मुलांनी कुटुंबाला मदत करण्यासाठी कचरा वेचणे, गल्लोगल्ली फिरून खायला मागणे तसेच इतर ठिकाणी काम करणे सुरू केले आहे. पुढील काळात सगळ्या इयत्तेच्या शाळा सुरू झाल्यानंतर या मुलांना पुन्हा एकदा शिक्षणप्रक्रियेत आणण्यासाठी काम करण्याची गरज लागणार आहे.

बहुतांश शहरांमधून मजूर आपापल्या कुटुंबांसोबत गावी परतले आहेत. यातले काही मजुरांनी कामाच्या ठिकाणी परत येण्यास सुरुवात जरी केलेली असली तरी कोरोनाच्या भीतीने त्यांनी त्यांचे इतर कुटुंब गावाकडेच ठेवली आहेत. ही मुले शिक्षणप्रक्रियेशी पूर्णपणे तुटली आहेत. या मुलांचा शोध घेत त्यांचे शिक्षण थांबणार नाही ना, याची काळजी घेणे गरजेचे आहे. शालेय समिती आणि स्थानिक संस्था एकत्रितपणे हे काम करू शकतात.

आर्थिक-दुर्बल घटकातील मुलांवर कोरोनाचे होणारे परिणाम, प्रश्न किंवा चर्चा या केवळ शालेय शिक्षण

आणि त्याला पर्याय वाटणारे इ-लर्निंग याभोवतीच फिरताना दिसत आहेत. मात्र हे प्रश्न एवढ्यानेच संपणारे

नाहीत. स्वच्छता, आरोग्य, व्यसने, वाढती बालमजुरी, बालविवाह, बाललैंगिक अत्याचार असे त्याचे व्यापक

स्वरूप आहे. येणाऱ्या काळात आपल्याला या सगळ्यांना तोंड द्यावे लागणार आहे. यामुळेच वस्ती-पातळीवर

संस्थांनी उपाययोजना करण्याची गरज पूर्वीपेक्षा वाढलेली आहे.

या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे येणाऱ्या काळात आपल्याला मिळतीलच ! काही प्रश्नांची उत्तरे

आपल्याला एकत्र येऊन शोधावी लागणार आहेत. एक मात्र खरे, की इथून पुढे काहीच पूर्वीसारखे नसणारे!

एकमेकांशी वागण्याचे, भेटण्याचे, देवाण-घेवाणीचे सगळे संदर्भ बदलणार आहेत. खरे तर कोरोनाने आपल्याला

एक संधी दिली आहे बदलण्याची. आपण ज्या सामाजिक संरचनेमध्ये जगतो, त्याची पुनर्मांडणी करण्याची,

पुनर्रचना करण्याची ! संसाधनाचे समान आणि निहाय वाटप करण्याची.

- अद्वैत दंडवते, संचालक, सहसंस्थापक तथा कार्यकारी संचालक, वर्धिष्णू सोसायटी