शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
2
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
3
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
4
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
5
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
6
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
7
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
8
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
9
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
10
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
11
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
12
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
13
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
14
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
15
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
16
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
17
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
18
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
19
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
20
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक

जिल्ह्यात पपई लागवडीचे क्षेत्र वाढले; पाच हजार हेक्‍टरवर लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत २०२०-२१ या वर्षाकरता स्ट्रॉबेरी या फळाचादेखील समावेश करण्यात आला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत २०२०-२१ या वर्षाकरता स्ट्रॉबेरी या फळाचादेखील समावेश करण्यात आला आहे. या योजनेत आतापर्यंत नऊ फळांचा समावेश करण्यात आला असून, या योजनेत आता पपईचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी जिल्ह्यातील पपई उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान जिल्ह्यात गेल्या काही वर्षांमध्ये पपईची लागवड मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

विशेष म्हणजे पीक बदलासाठी शेतकऱ्यांकडून पपईला प्राधान्य दिले जात आहे. जिल्ह्यात सुमारे पाच हजार हेक्‍टरवर पपईची लागवड आता केली जात असून पपईला मिळणारा बाजारभाव व वाढत जाणारी मागणी पाहता येणाऱ्या काळात पपईचे लागवड क्षेत्र वाढण्याची शक्यता कृषितज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

जिल्ह्यातील जवळजवळ बहुतेक तालुक्यांमध्ये पपईची लागवड आता वाढत आहे. विशेष म्हणजे केळी उत्पादक शेतकरी काही महिन्यांच्या पीक बदलासाठी पपईला प्राधान्य देत आहेत. जिल्हाभरात पपई लागवड क्षेत्र वाहत असल्याने इतर फळांप्रमाणे पपईलादेखील हवामान आधारित फळपीक विमा योजनेचे कवच मिळावे यासाठी पपई उत्पादक शेतकरी आग्रही आहेत. यासाठी पालक मंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, खासदार उमेश पाटील यांच्यासह कृषिमंत्र्यांनादेखील पपई उत्पादक शेतकऱ्यांनी निवेदन दिले आहे.

लागवड क्षेत्र जास्त असल्याने मिळावे विमा कवच

हवामान आधारित फळपीक विमा योजनेत नुकताच स्ट्रॉबेरीचा समावेश करण्यात आला आहे. स्ट्रॉबेरीची लागवड ही प्रायोगिक तत्त्वावर केली जाते. त्यात पश्चिम महाराष्ट्रातील दोन ते तीन जिल्हे सोडल्यास इतर ठिकाणी स्ट्रॉबेरीची लागवड की कमी प्रमाणात केली जाते. राज्यभरात दोन ते चार हजार हेक्‍टरवर स्ट्रॉबेरीची लागवड होत असते. त्या तुलनेत पपईची लागवड क्षेत्र आता राज्यात ५० हजार हेक्‍टरपर्यंत पोहोचले आहे. जळगाव जिल्ह्यात येते तीन ते पाच हजार हेक्टर क्षेत्रावर पपईची लागवड होत असते. त्यामुळे लागवड क्षेत्राचा विचार करून पपईचा समावेश या योजनेत करण्यात यावा, अशीही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. पपईलादेखील निसर्गाचा मोठ्या प्रमाणात फटका बसत असतो. यासह कमी तापमान, वादळ, गारपीट व अतिवृष्टीमुळेदेखील पपईचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. अशा परिस्थितीत पहिल्या नुकसान भरपाई हे फार काही मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. पपईचा समावेश फळपीक विमा योजनेत करण्यात आला तर पपई उत्पादक शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. याबाबत राज्य शासनाने गांभीर्याने विचार करावा, अशीही मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.