शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
2
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
3
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
4
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
5
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
6
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
7
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
8
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
9
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
10
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
11
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
12
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
13
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
14
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
15
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
16
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
17
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
18
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
19
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
20
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!

पाणी पित आहात ना ; मग काळजी घ्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:22 IST

जळगाव : सध्या पावसाळा असल्याने उघड्यावरील खाद्यपदार्थ खाण्याचे टाळणे, जितके महत्वाचे आहे. तितकेच पावसाळ्यात दूषित पाणी पिण्याचे प्रमाण टाळणेदेखील ...

जळगाव : सध्या पावसाळा असल्याने उघड्यावरील खाद्यपदार्थ खाण्याचे टाळणे, जितके महत्वाचे आहे. तितकेच पावसाळ्यात दूषित पाणी पिण्याचे प्रमाण टाळणेदेखील महत्वाचे आहे. कामानिमित्त घराबाहेर पडल्यानंतर,बाहेरील पाणीच प्यावे लागते. मात्र, हे पाणी स्वच्छ आहे का, हे पाणी भांड्यात किंवा टाकीत टाकले जाते, ते गाळून टाकले जाते का, पाण्याचा साठा असलेली भांडी, टाक्या स्वच्छ आहेत का, हे पाहणेदेखील गरजेचे आहे. विशेष म्हणजे सध्याचे वातावरण पाहता आणि ज्यांना सर्दी व तापाची किरकोळ लक्षणे आहेत, अशा रूग्णांनी तर पाणी उकळून पिण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ञांकडून करण्यात येत आहे.

दूषित पाण्यामुळे रूग्णालयांमध्ये कॉलरा, गॅस्ट्रो, टाईफाईडच्या रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. तसेच काविळचे रूग्ण सुद्धा आढळून येत आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून नागरिकांनी स्वच्छ पाणी पिण्या बरोबरच, उकळलेले पाणी पिणे महत्वाचे असल्याचे सांगण्यात येत आहे.

इन्फो :

दूषित पाण्यामुळे होणारे आजार

- दूषित पाण्यामुळे मुख्यत्वे टायफॉईड, कॉलरा, गॅस्ट्रो, काविळ हे आजार होण्याची शक्यता जास्त आहे.

- दूषित पाण्यामुळे उद्भवणारे आजार, हे जास्त करून पावसाळ्यातच उद्भवत असतात.

इन्फो :

आजाराची लक्षणे

- दूषित पाणी प्यायल्यामुळे पावसाळ्यात कॉलराचे होण्याचे प्रमाण सर्वाधिक जास्त दिसून येते. यामध्ये जुलाब, उलट्या व शरीरातील पाण्याची पातळी कमी होत असते.

- दूषित पाण्यामुळे टाईफाईड आजाराचेही प्रमाण मोठे असून, यामध्ये ताप, उलटी, सर्दी, भूक मंदावणे आदी लक्षणे आढळून येतात.

-तसेचर टाईफाईड मध्ये रूग्णांच्या पोटात दुखते, वेळेवर उपचार न घेतल्यास प्रकृती अधिकच खालावते.

- तसेच काही जणांना काविळचींही बाधा होत असल्याचे मनपाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी यांनी सांगितले.

इन्फो :

पाणी उकळून प्यायलेले बरे

- दरवर्षी पावसाळ्यातच या आजारांचे प्रमाण वाढत असल्यामुळे नागरिकांना पाणी गाळून आणि उकळून पिणे महत्वाचे आहे. तसेच पाण्याचा साठवण करणारी भांडी नेहमी स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. टाक्यांमध्ये जास्त दिवस साठवणूक केलेले पाणी न पिण्याचे आवाहनही वैद्यकीय तज्ञांकडुन करण्यात येत आहे.

इन्फो :

शहरात दररोज होतो ८० ते ९० दशलक्ष पाणी पुरवठा

जळगाव शहरात गेल्या अनेक वर्षांपासून वाघुर धरणावरून पाणी पुरवठा केला जात आहे. मनपा पाणी पुरवठा विभागातर्फे शहरात दररोज वेगवेगळ्या भागात पाणी पुरवठा केला जात आहे. दररोज ८० ते ९० दशलक्ष पाणी पुरवठा केला जात आहे. पाणी स्वच्छ राहण्यासाठी नियमित तुरटीसह पाणी शुद्ध करण्याचे आौषध टाकूनच पाणी पुरवठा केला जात आहे.