शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

पाणी पित आहात ना ; मग काळजी घ्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:22 IST

जळगाव : सध्या पावसाळा असल्याने उघड्यावरील खाद्यपदार्थ खाण्याचे टाळणे, जितके महत्वाचे आहे. तितकेच पावसाळ्यात दूषित पाणी पिण्याचे प्रमाण टाळणेदेखील ...

जळगाव : सध्या पावसाळा असल्याने उघड्यावरील खाद्यपदार्थ खाण्याचे टाळणे, जितके महत्वाचे आहे. तितकेच पावसाळ्यात दूषित पाणी पिण्याचे प्रमाण टाळणेदेखील महत्वाचे आहे. कामानिमित्त घराबाहेर पडल्यानंतर,बाहेरील पाणीच प्यावे लागते. मात्र, हे पाणी स्वच्छ आहे का, हे पाणी भांड्यात किंवा टाकीत टाकले जाते, ते गाळून टाकले जाते का, पाण्याचा साठा असलेली भांडी, टाक्या स्वच्छ आहेत का, हे पाहणेदेखील गरजेचे आहे. विशेष म्हणजे सध्याचे वातावरण पाहता आणि ज्यांना सर्दी व तापाची किरकोळ लक्षणे आहेत, अशा रूग्णांनी तर पाणी उकळून पिण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ञांकडून करण्यात येत आहे.

दूषित पाण्यामुळे रूग्णालयांमध्ये कॉलरा, गॅस्ट्रो, टाईफाईडच्या रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. तसेच काविळचे रूग्ण सुद्धा आढळून येत आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून नागरिकांनी स्वच्छ पाणी पिण्या बरोबरच, उकळलेले पाणी पिणे महत्वाचे असल्याचे सांगण्यात येत आहे.

इन्फो :

दूषित पाण्यामुळे होणारे आजार

- दूषित पाण्यामुळे मुख्यत्वे टायफॉईड, कॉलरा, गॅस्ट्रो, काविळ हे आजार होण्याची शक्यता जास्त आहे.

- दूषित पाण्यामुळे उद्भवणारे आजार, हे जास्त करून पावसाळ्यातच उद्भवत असतात.

इन्फो :

आजाराची लक्षणे

- दूषित पाणी प्यायल्यामुळे पावसाळ्यात कॉलराचे होण्याचे प्रमाण सर्वाधिक जास्त दिसून येते. यामध्ये जुलाब, उलट्या व शरीरातील पाण्याची पातळी कमी होत असते.

- दूषित पाण्यामुळे टाईफाईड आजाराचेही प्रमाण मोठे असून, यामध्ये ताप, उलटी, सर्दी, भूक मंदावणे आदी लक्षणे आढळून येतात.

-तसेचर टाईफाईड मध्ये रूग्णांच्या पोटात दुखते, वेळेवर उपचार न घेतल्यास प्रकृती अधिकच खालावते.

- तसेच काही जणांना काविळचींही बाधा होत असल्याचे मनपाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी यांनी सांगितले.

इन्फो :

पाणी उकळून प्यायलेले बरे

- दरवर्षी पावसाळ्यातच या आजारांचे प्रमाण वाढत असल्यामुळे नागरिकांना पाणी गाळून आणि उकळून पिणे महत्वाचे आहे. तसेच पाण्याचा साठवण करणारी भांडी नेहमी स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. टाक्यांमध्ये जास्त दिवस साठवणूक केलेले पाणी न पिण्याचे आवाहनही वैद्यकीय तज्ञांकडुन करण्यात येत आहे.

इन्फो :

शहरात दररोज होतो ८० ते ९० दशलक्ष पाणी पुरवठा

जळगाव शहरात गेल्या अनेक वर्षांपासून वाघुर धरणावरून पाणी पुरवठा केला जात आहे. मनपा पाणी पुरवठा विभागातर्फे शहरात दररोज वेगवेगळ्या भागात पाणी पुरवठा केला जात आहे. दररोज ८० ते ९० दशलक्ष पाणी पुरवठा केला जात आहे. पाणी स्वच्छ राहण्यासाठी नियमित तुरटीसह पाणी शुद्ध करण्याचे आौषध टाकूनच पाणी पुरवठा केला जात आहे.