शहरं
Join us  
Trending Stories
1
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
2
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
3
मुलींसाठी पार्टनरने घेतली होती खेळणी, पण रशियन महिलेची भेटच झाली नाही; गुहेतील कुटुंबाबत नवी माहिती
4
या देशात दोन भारतीय नागरिकांची हत्या, एकाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले; दूतावास अ‍ॅक्शनमोडवर
5
अतूट नातं! "पतीची सेवा करणं हेच..."; पाठीवर घेऊन पत्नीने पूर्ण केली १५० किमीची कावड यात्रा
6
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
7
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
8
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
9
'गुगल अन् मेटा'च्या अडचणी वाढणार! ईडीने पाठवली नोटीस, ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणात चौकशीसाठी बोलावले
10
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
11
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
12
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
13
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
14
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
15
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
16
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
17
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
18
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
19
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
20
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला

अन् चुकला काळजाचा ठोका; चाळीसगावला पुन्हा आला पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:21 IST

गेल्या काही दिवसांपासून चाळीसगाव शहरासह ग्रामीण भागात पावसाची संततधार कायम असल्याने ३० ऑगस्ट रोजी अतिवृष्टी झाली. ३१ रोजी आलेल्या ...

गेल्या काही दिवसांपासून चाळीसगाव शहरासह ग्रामीण भागात पावसाची संततधार कायम असल्याने ३० ऑगस्ट रोजी अतिवृष्टी झाली. ३१ रोजी आलेल्या पुराने अनेकांचे संसार गिळले. घरे वाहून गेली. हजारो एकर शेतीचे नुकसान झाले असून, हजारो जनावरे मृत्युमुखी पडली. जीवित, वित्तहानी झाल्याने ग्रामीण भागात अजूनही सन्नाटा आहे. शहरातही शिवाजी घाटावरील दुकानदारांचे मोठे नुकसान झाले. रिंगरोड भागासह दाळेवाले खळे परिसरातील अनेक घरांमध्ये पुराचे पाणी घुसले. त्यामुळे नागरिकांना मोठा फटका बसला आहे.

पुराच्या याच कटु आठवणी आठ दिवसांच्या अंतराने बुधवारी सकाळी पुन्हा ताज्या झाल्याने चाळीसगावकर चांगलेच धास्तावले. पहाटेपासूनच डोंगरी व तितूर दुथडी भरून वाहत होत्या. घाट रोडवरील पुलासह भाजी मंडईच्या जवळील पुरावरूनही चार ते पाच फूट पाणी वाहत होते. मंगळवारी सकाळी ११ वाजता बामोशी बाबांच्या दर्गाहातील पायऱ्यांपर्यंत पुराचे पाणी पोहोचले. बुधवारी दुपारनंतर पाणी ओसरण्यास सुरुवात झाल्यानंतर दुपारी १ वाजता वाहतूक सुरू होऊन संपर्कही पूर्ववत झाला.

चौकट

आमदारांसह प्रांताधिकारी व तहसीलदारांचे ‘जागते रहो’

मंगळवारी असलेली पावसाची संततधार, घोडेगाव व करजगाव परिसरात झालेली अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर येणार हे निश्चित होते. त्यामुळे प्रशासन अलर्ट झाले. नदीकाठावरील नागरिक, दुकानदारांना सर्तकतेच्या सूचना दिल्या गेल्या. नवीन पुलावरील फेरीवाल्यांना मंगळवारी दुपारीच येथून हटविण्यात आले. रात्री १२ नंतर नद्यांमधील पाणी पातळीत मोठी वाढल्याने मध्यरात्री आमदार मंगेश चव्हाण हे घाटरोडवर पोहोचले. बुधवारी पहाटे ५ वाजेपर्यंत त्यांच्यासह प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार अमोल मोरे परिस्थितीवर पूर्ण लक्ष ठेवून होते. नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यासाठी पालिकेचा सायरनही वाजविण्यात आला.

-खडकी बु. येथे नदी काठालगत राहणाऱ्या १००हून अधिक नागरिकांना बुधवारी पहाटे धनंजय मांडोळे यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत सुरक्षितस्थळी हलविले.

चाैकट

हिरापूर रोड परिसरात नदीकाठच्या अनेक घरांमध्ये शिरले पाणी

बुधवारी पहाटे तितूर नदीला पूर आल्याने हिरापूर रोडलगत नदी काठावर असणाऱ्या अनेक घरांमध्ये १० ते १२ फुटांपर्यंत पुराचे पाणी घुसले. यात काहींचे संसार वाहून गेले. त्यामुळे हे नागरिक हवालदिल झाले आहेत.

- मंगळवार अखेर तालुक्यात ८९० मिमी पावसाची नोंद झाली असून, गेल्या अनेक वर्षात प्रथम विक्रमी पर्जन्यमान झाल्याने ओल्या दुष्काळी स्थिती उद्भवली आहे.