शहरं
Join us  
Trending Stories
1
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
2
इथे मतदान करा, तिकडचे बटन दाबा...! आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान केंद्रातच महिलेला सूचना, गुन्हा दाखल...
3
महाडमध्ये शिंदेसेना अन् राष्ट्रवादीत तुफान राडा; वाहनांची तोडफोड, तटकरे-गोगावले संघर्ष पेटला
4
आधी फिरून येऊ म्हणाला, मग भांडण उकरून काढलं; संतापलेल्या रिक्षा चालकानं गर्लफ्रेंडला काचेच्या बाटलीनं मारलं!
5
“नगरपालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा रडीचा डाव, बोगस मतदानावर कठोर कारवाई करा”: सपकाळ
6
हर्षित राणाला गौतम गंभीर इतक्या वेळा संधी का देतो? व्हायरल VIDEO मध्ये सापडलं उत्तर
7
सोन्यापेक्षा चांदीची किंमत दुप्पट! चांदीने दिला ८५% रिटर्न, लवकरच २ लाख रुपये प्रति किलोचा टप्पा पार करणार?
8
केंद्राचा मोठा निर्णय; पंतप्रधान कार्यालयाचे नाव बदलले, ‘सेवा तीर्थ’ नावाने ओळखले जाणार
9
न्यूयॉर्कमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे बालपणीचे घर विक्रीला निघाले;  २०१६ मध्ये ट्रम्प यांना आठवण झालेली...
10
कमाल झाली! चाहता मैदानात घुसला; सामना थांबला आणि हार्दिक पांड्यानं हसत सेल्फीसाठी दिली पोझ
11
स्कूटी घेऊन जाताना कोसळला, २७ वर्षीय विनीतचा हार्ट अटॅकने मृत्यू; धडकी भरवणारा Video
12
पाकिस्तानमध्ये 'एचआयव्ही'चा कहर! १५ वर्षांत रुग्णसंख्या तिपटीने वाढली; लहान मुलांनाही संसर्ग! 
13
भाडे देणे म्हणजे खर्च नाही, तर आर्थिक स्वातंत्र्य! घर खरेदीच्या मोहात पडण्यापूर्वी 'हे' गणित समजून घ्या!
14
Video: विराट - गंभीरमधील वाद ताणला गेला का? एअरपोर्टवर सिलेक्टरशी किंग कोहलीशी गंभीर चर्चा
15
कर्जमुक्त असलेल्या कंपनीच्या शेअर्सवर गुंतवणूकदारांच्या उड्या, २०% चं अपर सर्किट; ₹३३ वर आली किंमत
16
"प्रत्येक नागरिकाच्या फोनमध्ये प्रवेश कशाला?"; 'संचार साथी' ॲपवरुन प्रियांका गांधींचा केंद्राला थेट सवाल
17
कार बाजारात मोठा उलटफेर; ह्युंदाई चौथ्या क्रमांकवर फेकली गेली, पहिली मारुती, दोन, तीन नंबरला कोण? 
18
१५ डिसेंबरपूर्वी करा 'हे' महत्त्वाचं काम; अन्यथा भरावा लागेल मोठा दंड
19
'संचार साथी' ॲपचे ५ महत्त्वाचे फीचर्स : चोरी झालेले फोन ब्लॉक करा आणि फ्रॉडला आळा घालण्यापर्यंत...
20
अरेरे! "५ लाख वाया गेले, माझी सर्व अब्रू गेली..."; नवरदेवाची व्यथा, नवरीने २० मिनिटांत मोडलं लग्न
Daily Top 2Weekly Top 5

अन् चुकला काळजाचा ठोका; चाळीसगावला पुन्हा आला पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:21 IST

गेल्या काही दिवसांपासून चाळीसगाव शहरासह ग्रामीण भागात पावसाची संततधार कायम असल्याने ३० ऑगस्ट रोजी अतिवृष्टी झाली. ३१ रोजी आलेल्या ...

गेल्या काही दिवसांपासून चाळीसगाव शहरासह ग्रामीण भागात पावसाची संततधार कायम असल्याने ३० ऑगस्ट रोजी अतिवृष्टी झाली. ३१ रोजी आलेल्या पुराने अनेकांचे संसार गिळले. घरे वाहून गेली. हजारो एकर शेतीचे नुकसान झाले असून, हजारो जनावरे मृत्युमुखी पडली. जीवित, वित्तहानी झाल्याने ग्रामीण भागात अजूनही सन्नाटा आहे. शहरातही शिवाजी घाटावरील दुकानदारांचे मोठे नुकसान झाले. रिंगरोड भागासह दाळेवाले खळे परिसरातील अनेक घरांमध्ये पुराचे पाणी घुसले. त्यामुळे नागरिकांना मोठा फटका बसला आहे.

पुराच्या याच कटु आठवणी आठ दिवसांच्या अंतराने बुधवारी सकाळी पुन्हा ताज्या झाल्याने चाळीसगावकर चांगलेच धास्तावले. पहाटेपासूनच डोंगरी व तितूर दुथडी भरून वाहत होत्या. घाट रोडवरील पुलासह भाजी मंडईच्या जवळील पुरावरूनही चार ते पाच फूट पाणी वाहत होते. मंगळवारी सकाळी ११ वाजता बामोशी बाबांच्या दर्गाहातील पायऱ्यांपर्यंत पुराचे पाणी पोहोचले. बुधवारी दुपारनंतर पाणी ओसरण्यास सुरुवात झाल्यानंतर दुपारी १ वाजता वाहतूक सुरू होऊन संपर्कही पूर्ववत झाला.

चौकट

आमदारांसह प्रांताधिकारी व तहसीलदारांचे ‘जागते रहो’

मंगळवारी असलेली पावसाची संततधार, घोडेगाव व करजगाव परिसरात झालेली अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर येणार हे निश्चित होते. त्यामुळे प्रशासन अलर्ट झाले. नदीकाठावरील नागरिक, दुकानदारांना सर्तकतेच्या सूचना दिल्या गेल्या. नवीन पुलावरील फेरीवाल्यांना मंगळवारी दुपारीच येथून हटविण्यात आले. रात्री १२ नंतर नद्यांमधील पाणी पातळीत मोठी वाढल्याने मध्यरात्री आमदार मंगेश चव्हाण हे घाटरोडवर पोहोचले. बुधवारी पहाटे ५ वाजेपर्यंत त्यांच्यासह प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार अमोल मोरे परिस्थितीवर पूर्ण लक्ष ठेवून होते. नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यासाठी पालिकेचा सायरनही वाजविण्यात आला.

-खडकी बु. येथे नदी काठालगत राहणाऱ्या १००हून अधिक नागरिकांना बुधवारी पहाटे धनंजय मांडोळे यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत सुरक्षितस्थळी हलविले.

चाैकट

हिरापूर रोड परिसरात नदीकाठच्या अनेक घरांमध्ये शिरले पाणी

बुधवारी पहाटे तितूर नदीला पूर आल्याने हिरापूर रोडलगत नदी काठावर असणाऱ्या अनेक घरांमध्ये १० ते १२ फुटांपर्यंत पुराचे पाणी घुसले. यात काहींचे संसार वाहून गेले. त्यामुळे हे नागरिक हवालदिल झाले आहेत.

- मंगळवार अखेर तालुक्यात ८९० मिमी पावसाची नोंद झाली असून, गेल्या अनेक वर्षात प्रथम विक्रमी पर्जन्यमान झाल्याने ओल्या दुष्काळी स्थिती उद्भवली आहे.