शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
4
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
5
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
6
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
7
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
8
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
9
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...
10
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
11
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
12
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
13
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
14
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
15
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
16
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
17
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
18
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
19
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  

आंध्र प्रदेशातील हंगाम संपल्याने खान्देशी केळी ठरणार हुकमी एक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 20:11 IST

दिलासा : ईदच्या पार्श्वभूमीवर आखाती राष्ट्रात केळीला मागणी

रावेर : खान्देशी केळीला पर्याय असलेल्या आंध्रप्रदेशातील व सोलापूर जिल्ह्यातील केळी उत्पादकांचा केळीचा हंगाम कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये संपुष्टात आल्याने रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर केळीची आखाती राष्ट्रात व सबंध देशभरातही केळीच्या मागणीत वाढ झाली आहे. खान्देशी केळीला देशभरात कुठल्याही केळीचा पर्याय आता उपलब्ध नसल्याने खान्देशी केळीला सुगीचे दिवस येवू घातले आहे. लॉकडाऊनमध्ये संधीसाधू व जास्त नफेखोरीच्या हव्यासापोटी पिळवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांनी पतझड केलेली केळीच आता हुकूमी एक्का ठरणार असल्याचे चित्र सुखावणारे ठरले आहे.कोरोनाच्या महामारीत उत्तर भारतात वाढती मागणी असतांना काही कथित व्यापाºयांनी कृत्रिम मंदीचे चित्र रंगवून दररोज दोनशे ते अडीचशे ट्रक भरून केळी उत्तर भारतात रवाना करून ‘अभी नही तो कभी नही ’ या उक्तीप्रमाणे अक्षरश: शेतकºयांची आर्थिक लूट केली. किराणा, भाजीपाला, फळभाज्या विक्रेते त्या उक्तीला अपवाद ठरण्यासारखे चित्र कोणत्याही शहरात व ग्रामीण भागात दिसले नाही.मात्र प्रशासनानेही दुर्लक्ष केल्याची शोकांतिका आहे.चालली अनागोंदीसबंध देशभरात केळीचा पुरवठा करणाºया खान्देशी केळीला पर्याय म्हणून स्वस्त दरातील आंध्रप्रदेशातील केळी उपलब्ध होती. म्हणून खान्देशात प्रसारमाध्यमांनी उठवलेला आवाजही कथित केळी व्यापाºयांसाठी मात्र जणूकाही ‘रात्रीचा गोंधळचं’ वाटल्याची अनुभूती जनसामान्यांनी घेतली. तब्बल महिनाभराच्या या लॉकडाऊनमध्ये केळी व्यापाºयांनी चालवलेल्या अनागोंदीला शासन, प्रशासन, केळी उत्पादकांच्या संघटना व स्वत: केळी उत्पादक शेतकरी लगाम घालण्यात अपयशी ठरले.आता खान्देशी केळीलापर्याय नाहीखान्देशी केळीला पर्याय म्हणून स्वस्त दरातील आंध्रप्रदेशातील केळीचा बागायतीचा हंगाम आटोपल्याने व सोलापूर जिल्ह्यातील केळीची निर्यात संपुष्टात आल्याने, खान्देशी केळीशिवाय सबंध देशभरात कुठेही पर्याय उपलब्ध नाही. त्यातच आखाती देशात व सबंध देशभरातही रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर केळीची वाढती मागणी असल्याने व बाजारपेठेत अजून आंबा वा द्राक्ष आपले पाय टिकवू न शकल्याने सद्यस्थितीत खान्ेदशी केळीला सुगीचे दिवस येण्याचे संकेत प्राप्त झाले आहेत.निर्यातीस झाली सुरुवातआखाती राष्ट्रात गुणात्मक दर्जाच्या केळी निर्यातीसाठी तांदलवाडी व अटवाडे येथील केळी निर्यातदार कंपनीकडून केळी निर्यातीला आरंभ झाला असून, स्थानिक बाजारपेठेत आता केळीची मागणीही वाढल्याने बाजार समितीने घोषीत केलेल्या केळी बाजारभावात अर्थात किमान ६०० ते ७०० रूपये प्रतिक्विंटल दरात केळीमालाच्या खरेदीला तालूक्यात आरंभ झाल्याची चर्चा आहे.