शहरं
Join us  
Trending Stories
1
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
2
लाडकी बहीण योजनेसाठी सरकार किती निधी देते? ‘इतके’ कोटी होतात खर्च, आकडा पाहून व्हाल अवाक्
3
"पुन्हा मलाच...", तिसरी वेळ राष्ट्राध्यक्ष बनण्याची इच्छा; स्वतःचं कौतुक करत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...
4
प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात
5
"पुढच्या दीड वर्षात सिनेमा बंद होईल...", महेश मांजरेकरांनी केलं भाकीत; असं का म्हणाले?
6
समस्त ओला ईलेक्ट्रीक स्कूटर मालकांसाठी महत्वाची बातमी! तुमचे तुम्हीच स्पेअर पार्ट घ्या, मेकॅनिककडून दुरुस्त करा...
7
वंदे भारत-राजधानी ट्रेनचे तिकीट कमी होईल, तब्बल ५००₹ वाचतील; ९०% लोकांना ट्रिक माहिती नाही!
8
२५ देशामध्ये अफाट संपत्ती, मॉलचेही आहेत मालक; 'हे' आहेत UAE चे सर्वात श्रीमंत भारतीय, ५० हजार कोटींपेक्षा अधिक नेटवर्थ
9
मंदीच्या काळातही ‘या’ 8 क्षेत्रांत कर्मचारी कपातीचा धोका नाही, भविष्यात मोठी संधी; जाणून घ्या...
10
VIRAL : महिला प्रवासी रिक्षात विसरली इयरफोन; वस्तू परत करण्यासाठी रिक्षा चालकाने लढवली 'अशी' शक्कल! होतंय कौतुक
11
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
12
लग्नाच्या वर्षभरात योगिता चव्हाण-सौरभ चौघुलेच्या नात्यात दुरावा?, एकमेकांना केलं अनफॉलो, लग्नाचे फोटोही केले डिलीट
13
कॅनरा बँकेची गुंतवणूक असलेल्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण; निव्वळ नफा २० टक्क्यांनी घटला
14
बिहारमधील मतदानापूर्वी प्रशांत किशोर अडचणीत, नव्या गौप्यस्फोटामुळे खळबळ
15
वडिलांनी जमीन गहाण टाकून लेकासाठी 'नवरी' आणली; लग्नाच्या पहिल्या रात्रीच तिनं सगळ्यांची झोप उडवली!
16
लठ्ठपणा कमी करण्यासाठी 'ब्रह्मास्त्र'; आरोग्य मंत्रालयाने फ्रीमध्ये सांगितली वजन घटवण्याची पद्धत
17
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
18
UK च्या पंतप्रधानांचा डबल गेम! आधी भारतासोबत मोठा करार, आता 'या' विरोधी देशासोबत मिळवले हात
19
प्रबोधिनी एकादशी २०२५: १४२ दिवसांची विष्णुंची योगनिद्रा संपणार; २ दुर्मिळ योगांत ७ राशींचे भाग्य उजळणार
20
२५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्येपूर्वीची शेवटची पोस्ट व्हायरल, चाहते हळहळले

वर्षभरापासून बंद असलेली अमृतसर एक्स्प्रेसही १६ जूनपासून धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:13 IST

सुविधा : मात्र मुंबईकडे जाणारे वेळापत्रक बदलल्याने चाकरमान्यांची गैरसोय जळगाव : कोरोनामुळे वर्षभरापासून बंद असलेली अमृतसर एक्स्प्रेस ...

सुविधा : मात्र मुंबईकडे जाणारे वेळापत्रक बदलल्याने चाकरमान्यांची गैरसोय

जळगाव : कोरोनामुळे वर्षभरापासून बंद असलेली अमृतसर एक्स्प्रेस येत्या १६ जूनपासून पुन्हा सुरू होणार आहे. यामुळे पंजाब प्रातांत जणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, दुसरीकडे मात्र या गाडीचे मुंबईकडे जाताना वेळापत्रक बदलल्यामुळे नेहमी अपडाऊन करणाऱ्या चाकरमान्यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होणार आहे.

गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर रेल्वे प्रशासनातर्फे प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असलेली अमृतसर एक्स्प्रेसही बंद करण्यात आली होती. कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर इतर गाड्यांप्रमाणे ही गाडीही सुरू करण्याबाबत प्रवाशांमधून मोठ्या प्रमाणावर मागणी करण्यात येत होती. मात्र, कोरोनामुळे वारंवार ही गाडी रद्द करण्यात येत होती. गेल्या दोन महिन्यांत ही गाडी दोनदा रद्द करण्यात आली होती. रेल्वे प्रशासनाने सुरुवातीला काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात यंदा १० एप्रिलपासून चालविण्याचे जाहीर केले होते. मात्र, तांत्रिक कारण सांगून रेल्वे प्रशासनातर्फे दोनच दिवसांत ही गाडी स्थगित करून, २० एप्रिलपासून सुरू करण्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, ज्या प्रवाशांनी १० एप्रिलचे तिकीट बुकिंग केले होते, त्यांना पुन्हा ही तिकिटे रद्द करून, २० एप्रिलची तिकिटे काढावी लागली, तर रेल्वे प्रशासनातर्फे पुन्हा चार दिवसांनी प्रसिद्धी पत्रक काढून कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे २० एप्रिलपासून सुरू होणारी गाडी पुन्हा पुढील आदेश येईपर्यंत स्थगित करण्यात येत असल्याचे जाहीर केले होते. यामुळे प्रवाशांमधून रेल्वेच्या या निर्णयाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती.

इन्फो :

वेळापत्रकात बदल झाल्याने चाकरमान्यांची गैरसोय

जळगाव मार्गे मुंबई ते पंजाब प्रांतादरम्यान धावणारी ही पंजाब एक्स्प्रेस पूर्वीच्या वेळापत्रकानुसार पंजाबहून जळगावला सायंकाळी साडेसात वाजता यायची. ज्यामुळे जळगाव शहरात काम करणारा पाचोरा, चाळीसगाव येथील हजारो नोकरदार वर्ग सायंकाळी या गाडीने घराकडे परतायचा. मात्र, आता नव्या वेळापत्रकानुसार ही गाडी जळगावला सायंकाळी पाच वाजताच येणार असल्यामुळे पाचोरा व चाळीसगाव येथील नोकरदार वर्ग व चाकरमान्यांची गैरसोय होणार आहे. तरी रेल्वे प्रशासनाने या गाडीची पूर्वीप्रमाणे वेळ ठेवण्याची मागणी चाकरमान्यांमधून होत आहे.