शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

वर्षभरापासून बंद असलेली अमृतसर एक्स्प्रेसही १६ जूनपासून धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:13 IST

सुविधा : मात्र मुंबईकडे जाणारे वेळापत्रक बदलल्याने चाकरमान्यांची गैरसोय जळगाव : कोरोनामुळे वर्षभरापासून बंद असलेली अमृतसर एक्स्प्रेस ...

सुविधा : मात्र मुंबईकडे जाणारे वेळापत्रक बदलल्याने चाकरमान्यांची गैरसोय

जळगाव : कोरोनामुळे वर्षभरापासून बंद असलेली अमृतसर एक्स्प्रेस येत्या १६ जूनपासून पुन्हा सुरू होणार आहे. यामुळे पंजाब प्रातांत जणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, दुसरीकडे मात्र या गाडीचे मुंबईकडे जाताना वेळापत्रक बदलल्यामुळे नेहमी अपडाऊन करणाऱ्या चाकरमान्यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होणार आहे.

गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर रेल्वे प्रशासनातर्फे प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असलेली अमृतसर एक्स्प्रेसही बंद करण्यात आली होती. कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर इतर गाड्यांप्रमाणे ही गाडीही सुरू करण्याबाबत प्रवाशांमधून मोठ्या प्रमाणावर मागणी करण्यात येत होती. मात्र, कोरोनामुळे वारंवार ही गाडी रद्द करण्यात येत होती. गेल्या दोन महिन्यांत ही गाडी दोनदा रद्द करण्यात आली होती. रेल्वे प्रशासनाने सुरुवातीला काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात यंदा १० एप्रिलपासून चालविण्याचे जाहीर केले होते. मात्र, तांत्रिक कारण सांगून रेल्वे प्रशासनातर्फे दोनच दिवसांत ही गाडी स्थगित करून, २० एप्रिलपासून सुरू करण्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, ज्या प्रवाशांनी १० एप्रिलचे तिकीट बुकिंग केले होते, त्यांना पुन्हा ही तिकिटे रद्द करून, २० एप्रिलची तिकिटे काढावी लागली, तर रेल्वे प्रशासनातर्फे पुन्हा चार दिवसांनी प्रसिद्धी पत्रक काढून कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे २० एप्रिलपासून सुरू होणारी गाडी पुन्हा पुढील आदेश येईपर्यंत स्थगित करण्यात येत असल्याचे जाहीर केले होते. यामुळे प्रवाशांमधून रेल्वेच्या या निर्णयाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती.

इन्फो :

वेळापत्रकात बदल झाल्याने चाकरमान्यांची गैरसोय

जळगाव मार्गे मुंबई ते पंजाब प्रांतादरम्यान धावणारी ही पंजाब एक्स्प्रेस पूर्वीच्या वेळापत्रकानुसार पंजाबहून जळगावला सायंकाळी साडेसात वाजता यायची. ज्यामुळे जळगाव शहरात काम करणारा पाचोरा, चाळीसगाव येथील हजारो नोकरदार वर्ग सायंकाळी या गाडीने घराकडे परतायचा. मात्र, आता नव्या वेळापत्रकानुसार ही गाडी जळगावला सायंकाळी पाच वाजताच येणार असल्यामुळे पाचोरा व चाळीसगाव येथील नोकरदार वर्ग व चाकरमान्यांची गैरसोय होणार आहे. तरी रेल्वे प्रशासनाने या गाडीची पूर्वीप्रमाणे वेळ ठेवण्याची मागणी चाकरमान्यांमधून होत आहे.