शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरापासून बंद असलेली अमृतसर एक्स्प्रेसही १६ जूनपासून धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:13 IST

सुविधा : मात्र मुंबईकडे जाणारे वेळापत्रक बदलल्याने चाकरमान्यांची गैरसोय जळगाव : कोरोनामुळे वर्षभरापासून बंद असलेली अमृतसर एक्स्प्रेस ...

सुविधा : मात्र मुंबईकडे जाणारे वेळापत्रक बदलल्याने चाकरमान्यांची गैरसोय

जळगाव : कोरोनामुळे वर्षभरापासून बंद असलेली अमृतसर एक्स्प्रेस येत्या १६ जूनपासून पुन्हा सुरू होणार आहे. यामुळे पंजाब प्रातांत जणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, दुसरीकडे मात्र या गाडीचे मुंबईकडे जाताना वेळापत्रक बदलल्यामुळे नेहमी अपडाऊन करणाऱ्या चाकरमान्यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होणार आहे.

गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर रेल्वे प्रशासनातर्फे प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असलेली अमृतसर एक्स्प्रेसही बंद करण्यात आली होती. कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर इतर गाड्यांप्रमाणे ही गाडीही सुरू करण्याबाबत प्रवाशांमधून मोठ्या प्रमाणावर मागणी करण्यात येत होती. मात्र, कोरोनामुळे वारंवार ही गाडी रद्द करण्यात येत होती. गेल्या दोन महिन्यांत ही गाडी दोनदा रद्द करण्यात आली होती. रेल्वे प्रशासनाने सुरुवातीला काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात यंदा १० एप्रिलपासून चालविण्याचे जाहीर केले होते. मात्र, तांत्रिक कारण सांगून रेल्वे प्रशासनातर्फे दोनच दिवसांत ही गाडी स्थगित करून, २० एप्रिलपासून सुरू करण्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, ज्या प्रवाशांनी १० एप्रिलचे तिकीट बुकिंग केले होते, त्यांना पुन्हा ही तिकिटे रद्द करून, २० एप्रिलची तिकिटे काढावी लागली, तर रेल्वे प्रशासनातर्फे पुन्हा चार दिवसांनी प्रसिद्धी पत्रक काढून कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे २० एप्रिलपासून सुरू होणारी गाडी पुन्हा पुढील आदेश येईपर्यंत स्थगित करण्यात येत असल्याचे जाहीर केले होते. यामुळे प्रवाशांमधून रेल्वेच्या या निर्णयाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती.

इन्फो :

वेळापत्रकात बदल झाल्याने चाकरमान्यांची गैरसोय

जळगाव मार्गे मुंबई ते पंजाब प्रांतादरम्यान धावणारी ही पंजाब एक्स्प्रेस पूर्वीच्या वेळापत्रकानुसार पंजाबहून जळगावला सायंकाळी साडेसात वाजता यायची. ज्यामुळे जळगाव शहरात काम करणारा पाचोरा, चाळीसगाव येथील हजारो नोकरदार वर्ग सायंकाळी या गाडीने घराकडे परतायचा. मात्र, आता नव्या वेळापत्रकानुसार ही गाडी जळगावला सायंकाळी पाच वाजताच येणार असल्यामुळे पाचोरा व चाळीसगाव येथील नोकरदार वर्ग व चाकरमान्यांची गैरसोय होणार आहे. तरी रेल्वे प्रशासनाने या गाडीची पूर्वीप्रमाणे वेळ ठेवण्याची मागणी चाकरमान्यांमधून होत आहे.