शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराण्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
4
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
5
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
6
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
7
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
8
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
9
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
10
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
11
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
12
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
13
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
14
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
15
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
16
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
17
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
18
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
19
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
20
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा

वर्षभरापासून बंद असलेली अमृतसर एक्स्प्रेसही १६ जूनपासून धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:13 IST

सुविधा : मात्र मुंबईकडे जाणारे वेळापत्रक बदलल्याने चाकरमान्यांची गैरसोय जळगाव : कोरोनामुळे वर्षभरापासून बंद असलेली अमृतसर एक्स्प्रेस ...

सुविधा : मात्र मुंबईकडे जाणारे वेळापत्रक बदलल्याने चाकरमान्यांची गैरसोय

जळगाव : कोरोनामुळे वर्षभरापासून बंद असलेली अमृतसर एक्स्प्रेस येत्या १६ जूनपासून पुन्हा सुरू होणार आहे. यामुळे पंजाब प्रातांत जणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, दुसरीकडे मात्र या गाडीचे मुंबईकडे जाताना वेळापत्रक बदलल्यामुळे नेहमी अपडाऊन करणाऱ्या चाकरमान्यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होणार आहे.

गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर रेल्वे प्रशासनातर्फे प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असलेली अमृतसर एक्स्प्रेसही बंद करण्यात आली होती. कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर इतर गाड्यांप्रमाणे ही गाडीही सुरू करण्याबाबत प्रवाशांमधून मोठ्या प्रमाणावर मागणी करण्यात येत होती. मात्र, कोरोनामुळे वारंवार ही गाडी रद्द करण्यात येत होती. गेल्या दोन महिन्यांत ही गाडी दोनदा रद्द करण्यात आली होती. रेल्वे प्रशासनाने सुरुवातीला काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात यंदा १० एप्रिलपासून चालविण्याचे जाहीर केले होते. मात्र, तांत्रिक कारण सांगून रेल्वे प्रशासनातर्फे दोनच दिवसांत ही गाडी स्थगित करून, २० एप्रिलपासून सुरू करण्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, ज्या प्रवाशांनी १० एप्रिलचे तिकीट बुकिंग केले होते, त्यांना पुन्हा ही तिकिटे रद्द करून, २० एप्रिलची तिकिटे काढावी लागली, तर रेल्वे प्रशासनातर्फे पुन्हा चार दिवसांनी प्रसिद्धी पत्रक काढून कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे २० एप्रिलपासून सुरू होणारी गाडी पुन्हा पुढील आदेश येईपर्यंत स्थगित करण्यात येत असल्याचे जाहीर केले होते. यामुळे प्रवाशांमधून रेल्वेच्या या निर्णयाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती.

इन्फो :

वेळापत्रकात बदल झाल्याने चाकरमान्यांची गैरसोय

जळगाव मार्गे मुंबई ते पंजाब प्रांतादरम्यान धावणारी ही पंजाब एक्स्प्रेस पूर्वीच्या वेळापत्रकानुसार पंजाबहून जळगावला सायंकाळी साडेसात वाजता यायची. ज्यामुळे जळगाव शहरात काम करणारा पाचोरा, चाळीसगाव येथील हजारो नोकरदार वर्ग सायंकाळी या गाडीने घराकडे परतायचा. मात्र, आता नव्या वेळापत्रकानुसार ही गाडी जळगावला सायंकाळी पाच वाजताच येणार असल्यामुळे पाचोरा व चाळीसगाव येथील नोकरदार वर्ग व चाकरमान्यांची गैरसोय होणार आहे. तरी रेल्वे प्रशासनाने या गाडीची पूर्वीप्रमाणे वेळ ठेवण्याची मागणी चाकरमान्यांमधून होत आहे.