शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

खरीपची लागवड सुरू झाली तरी रब्बीची खरेदी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:13 IST

नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना नाईलाजास्तव व्यापाऱ्यांना द्यावा लागला माल : शासकीय खरेदी केवळ व्यापार्‍यांच्या फायद्याची लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ...

नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना नाईलाजास्तव व्यापाऱ्यांना द्यावा लागला माल : शासकीय खरेदी केवळ व्यापार्‍यांच्या फायद्याची

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात शेतकऱ्यांनी आता खरीप हंगामासाठी लागवड करायला सुरुवात केली असताना, दुसरीकडे शासनाने अद्यापही रब्बीची धान्य खरेदीसाठी शासकीय खरेदीला सुरुवात केलेली नाही. शासकीय खरेदीला सुरुवात न झाल्यामुळे शेतकऱ्यांनी नोंदणी करूनदेखील खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना नाईलाजास्तव व्यापाऱ्यांना कमी भावात माल विक्री करावा लागत आहे.

दरवर्षी शासकीय खरेदीला एप्रिल महिन्यातच सुरुवात होत असते, मात्र यावर्षी नोंदणी प्रक्रिया संपूनदेखील अद्यापपर्यंत शासकीय खरेदी सुरू झालेली नाही. शासकीय खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना हमीभाव उपलब्ध होतो यामुळे शेतकऱ्यांचा भर आपला माल शासकीय खरेदी केंद्रावर विक्री करण्यावर असतो. मात्र, यावर्षी खरीप हंगामाला सुरुवात झाली असतानादेखील खरेदी सुरू न झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे याबद्दल जिल्ह्यातील कोणताही लोकप्रतिनिधी चकार शब्द काढायला तयार नाही.

व्यापाऱ्यांचा होणार फायदा

शासकीय खरेदी केंद्र सुरू झाले नसल्याने, शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा तब्बल ४०० ते ५०० रुपये कमी दराने व्यापाऱ्यांना आपला माल नाईलाजास्तव विकावा लागत आहे. गेल्या वर्षीदेखील मक्‍याची खरेदी अचानकपणे थांबविण्यात आल्यामुळे तब्बल १४ हजार शेतकऱ्यांना नोंदणी करूनदेखील आपला माल विक्री करता आला नव्हता. यावर्षीदेखील आठ हजार नोंदणी केली आहे. तसेच जिल्ह्यात ६० हजार क्विंटल मका खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र, खरेदी सुरू केली नाही तर या उद्दिष्टाच्या फायदादेखील शेतकऱ्यांना होणार नाही. शेतकऱ्यांच्या नावावर व्यापारी आपला माल शासकीय खरेदी केंद्रावर विक्री करतील, असा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.

तर नोंदणीचे ढोंग कशाला ?

शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी केलीच जात नाही, तर शासनाकडून नोंदणीचे ढोंग कशाला केले जाते ? असा आरोप शेतकरी संघटनांकडून केला जात आहे. हमीभाव केवळ नावालाच असून, याचा फायदादेखील केवळ व्यापाऱ्यांनाच होतो असा दावा आता शेतकऱ्यांकडून केला जात आहे. तसेच खरेदी करायची नसेल तर घोषणादेखील करण्यात येऊ नये असा ही संतप्त सवाल शेतकरी करत आहेत.

कोट..

मका, ज्वारी, बाजरी, गहू हे धान्य आता शेतकऱ्यांना स्वतः विक्री करावे लागतील, किंवा कमी दरात व्यापाऱ्यांनाच द्यावे लागतील असा कुचकामी पर्याय शासनाने आता शेतकऱ्यांचा माथी मारून दिला आहे. माल खरेदी केला जात नाही, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली जात नाही. शेतकऱ्यांना शासनाने वाऱ्यावर सोडून दिले आहे.

- जनार्दन सदाशिव चौधरी, शेतकरी, आव्हाने