शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

खरीपची लागवड सुरू झाली तरी रब्बीची खरेदी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:13 IST

नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना नाईलाजास्तव व्यापाऱ्यांना द्यावा लागला माल : शासकीय खरेदी केवळ व्यापार्‍यांच्या फायद्याची लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ...

नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना नाईलाजास्तव व्यापाऱ्यांना द्यावा लागला माल : शासकीय खरेदी केवळ व्यापार्‍यांच्या फायद्याची

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात शेतकऱ्यांनी आता खरीप हंगामासाठी लागवड करायला सुरुवात केली असताना, दुसरीकडे शासनाने अद्यापही रब्बीची धान्य खरेदीसाठी शासकीय खरेदीला सुरुवात केलेली नाही. शासकीय खरेदीला सुरुवात न झाल्यामुळे शेतकऱ्यांनी नोंदणी करूनदेखील खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना नाईलाजास्तव व्यापाऱ्यांना कमी भावात माल विक्री करावा लागत आहे.

दरवर्षी शासकीय खरेदीला एप्रिल महिन्यातच सुरुवात होत असते, मात्र यावर्षी नोंदणी प्रक्रिया संपूनदेखील अद्यापपर्यंत शासकीय खरेदी सुरू झालेली नाही. शासकीय खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना हमीभाव उपलब्ध होतो यामुळे शेतकऱ्यांचा भर आपला माल शासकीय खरेदी केंद्रावर विक्री करण्यावर असतो. मात्र, यावर्षी खरीप हंगामाला सुरुवात झाली असतानादेखील खरेदी सुरू न झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे याबद्दल जिल्ह्यातील कोणताही लोकप्रतिनिधी चकार शब्द काढायला तयार नाही.

व्यापाऱ्यांचा होणार फायदा

शासकीय खरेदी केंद्र सुरू झाले नसल्याने, शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा तब्बल ४०० ते ५०० रुपये कमी दराने व्यापाऱ्यांना आपला माल नाईलाजास्तव विकावा लागत आहे. गेल्या वर्षीदेखील मक्‍याची खरेदी अचानकपणे थांबविण्यात आल्यामुळे तब्बल १४ हजार शेतकऱ्यांना नोंदणी करूनदेखील आपला माल विक्री करता आला नव्हता. यावर्षीदेखील आठ हजार नोंदणी केली आहे. तसेच जिल्ह्यात ६० हजार क्विंटल मका खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र, खरेदी सुरू केली नाही तर या उद्दिष्टाच्या फायदादेखील शेतकऱ्यांना होणार नाही. शेतकऱ्यांच्या नावावर व्यापारी आपला माल शासकीय खरेदी केंद्रावर विक्री करतील, असा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.

तर नोंदणीचे ढोंग कशाला ?

शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी केलीच जात नाही, तर शासनाकडून नोंदणीचे ढोंग कशाला केले जाते ? असा आरोप शेतकरी संघटनांकडून केला जात आहे. हमीभाव केवळ नावालाच असून, याचा फायदादेखील केवळ व्यापाऱ्यांनाच होतो असा दावा आता शेतकऱ्यांकडून केला जात आहे. तसेच खरेदी करायची नसेल तर घोषणादेखील करण्यात येऊ नये असा ही संतप्त सवाल शेतकरी करत आहेत.

कोट..

मका, ज्वारी, बाजरी, गहू हे धान्य आता शेतकऱ्यांना स्वतः विक्री करावे लागतील, किंवा कमी दरात व्यापाऱ्यांनाच द्यावे लागतील असा कुचकामी पर्याय शासनाने आता शेतकऱ्यांचा माथी मारून दिला आहे. माल खरेदी केला जात नाही, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली जात नाही. शेतकऱ्यांना शासनाने वाऱ्यावर सोडून दिले आहे.

- जनार्दन सदाशिव चौधरी, शेतकरी, आव्हाने