शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

तीन-चार तास का असेना व्यवसाय करण्यास परवानगी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यासह शहरात फेब्रुवारी महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाकडून काढण्यात आलेल्या नियमावलीनुसार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यासह शहरात फेब्रुवारी महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाकडून काढण्यात आलेल्या नियमावलीनुसार ६ एप्रिलपासून शहरातील मार्केटमधील दुकाने बंद आहेत. गेल्या वर्षीदेखील कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शहरातील मार्केटमधील सर्व दुकाने १३५ दिवस बंद होती. यावर्षीही तीच परिस्थिती निर्माण झाली असून, महिनाभरापासून दुकाने बंद असल्याने मार्केटमधील दुकानदारांवर उपासमारीची वेळ आली आहे. गाळेधारकांना पोटापाण्याचा विचार करून दिवसातून किमान ३ ते ४ तास का असेना व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी महात्मा फुले मार्केट असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे.

सोमवारी महात्मा फुले मार्केट व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी हिरानंद मंधवानी, प्रेमचंद जैन, राजेश वर्यानी, बबलू समदडिया, अशोक कौराणी यांच्यासह काही गाळेधारक उपस्थित होते.

गाळेधारकांनी प्रशासनाला सुचवले चार पर्याय

१. फुले मार्केट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना दिलेल्या निवेदनात व्यवसाय सुरू करण्यासाठी चार पर्याय सुचवले आहेत. यामध्ये पहिला पर्याय एक दिवस अत्यावश्यक सेवांचे व्यवसाय सुरू ठेवावे तर दुसऱ्या दिवशी इतर व्यवसायात सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात यावी.

२. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या दुकानांना प्रशासनाने सकाळी ७ ते ११ ही वेळ निश्चित करून दिली आहे. तर प्रशासनाने आता इतर व्यावसायिकांना सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी.

३. गेल्या वर्षी जिल्हा प्रशासनाने पी १, पी २ या पद्धतीने व्यवसाय करण्यास परवानगी दिली होती. याच पद्धतीनुसार यावर्षीदेखील जिल्हा प्रशासनाने व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी.

४. जिल्हा प्रशासनाने सोमवार, मंगळवार, बुधवार या तीन दिवशी अत्यावश्यक सेवांच्या व्यवसाय करणाऱ्यांना परवानगी देण्यात यावी. तर गुरुवार, शुक्रवार व शनिवार या तीन दिवशी इतर व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात यावी, अशीही मागणी फुले मार्केट असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे. यात चार पर्यायांवर जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा, अशी ही विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

तर आमच्यावर येईल उपासमारीची वेळ

गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा प्रादुर्भावामुळे व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. त्यात सर्व व्यापारी बांधवांना नियमित भाडे भरावे लागते, त्यात दुकानांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनादेखील नियमित वेतन द्यावे लागत आहे; मात्र पुन्हा अनेक दिवस दुकाने बंद ठेवावी लागली तर सर्व व्यापारी बांधवांवर उपासमारीची वेळ येईल. त्यामुळे प्रशासनाने व्यापारी बांधवांच्या कुटुंबीयांच्या व दुकानांमध्ये काम करणाऱ्या कामगार वर्गाचा विचार करून काही वेळ दुकाने सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंतीदेखील व्यापारी बांधवांनी केली आहे.