शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेविरोधात महायुद्धाची तयारी? दक्षिण आफ्रिकेत चीन-रशिया-इराणच्या खतरनाक युद्धनौका पोहचल्या
2
मराठी सिंधी म्हणजे वडापाव- दाल पकवान एकत्र; उल्हासनगर शहर विकासासाठी निधी देणार - एकनाथ शिंदे
3
Uddhav Thackeray: "तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढा अन्..."; MIM सोबत युती अन् हिंदुत्वावरून भाजपावर घणाघात
4
WPL 2026 : Nadine De Klerk ची अविश्वसनीय खेळी! MI च्या तोंडचा घास हिरावून घेत RCB ला जिंकून दिली मॅच
5
Raj Thackeray: उमेदवारी मागे घ्यायला 'त्या' तिघांना १५ कोटींची ऑफर; राज ठाकरेंनी डागली सत्ताधाऱ्यांवर तोफ
6
Virat Kohli Viral Photo: चक्क बच्चे कंपनीसोबत किंग कोहलीला भेटायला आला 'चिकू' अन्...
7
मीरा भाईंदरमध्ये विविध समाजांच्या भवनासाठी सरकार मोफत जागा देणार; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
8
भाजपा नेते गणेश नाईकांचा नगरविकास खात्यावर गंभीर आरोप; "२२०० कोटी कुठे गेले, ईडीनं चौकशी करावी"
9
यो यो हनी सिंगच्या 'त्या' कृतीनंतर हरमनप्रीतसह स्मृतीही गोंधळली; व्हिडिओ व्हायरल
10
"मी जर तोंड उघडलं तर संपूर्ण देश..."; बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा भाजपला इशारा
11
अमेरिकेच्या अरेरावीला सडेतोड उत्तर ! रशिया-चीन-इराणचा समुद्रात एकत्रित नौदल युद्धाभ्यास
12
'सरपंच साब'वर पुन्हा अन्याय नको... तिलक वर्माच्या जागी श्रेयस अय्यरलाच टीम इंडियात संधी मिळायला हवी!
13
कर्ज फेडू शकत नसल्यानं पाकिस्तानचा मास्टरस्ट्रोक; सौदीला गजब ऑफर, अमेरिकेचेही टेन्शन वाढलं
14
"पाकिस्तानच्या संविधानात 'असे' लिहिले आहे, आपल्या संविधानात नाही...!" नितेश राणेंच्या 'त्या' विधानावर नेमकं काय म्हणाले ओवेसी? 
15
दुचाकी वाचवायला गेला आणि तीन जणांचा जीव गेला, ट्रक अपघाताचा थरकाप उडणारा सीसीटीव्ही व्हिडीओ
16
समृद्धी महामार्गाच्या घोटाळ्यातून पन्नास खोके, एकदम ‘ओके’! हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
17
अंकिता भंडारी हत्याकांडाचा तपास आता सीबीआयकडे, उत्तराखंड सरकारचा निर्णय  
18
‘१४० कोटी जनतेच्या गरजेसाठी कुठूनही स्वस्तात तेल आणू’, ट्रम्प यांच्या ५०० टक्के टॅरिफच्या धमकीला भारताचं थेट उत्तर 
19
विरुद्ध दिशेने आलेल्या वाहनांची कंटेनरला धडक: ठाण्यात विचित्र अपघातात चाैघे जखमी, १२ वाहनांचे नुकसान
20
‘गुन्ह्यांची माहिती लपवणाऱ्या किशोरी पेडणेकरांची उमेदवारी रद्द करा’, निलेश राणे यांची मागणी  
Daily Top 2Weekly Top 5

सर्वच नष्ट झाले, पंचनाम्याची काय गरज?; मदतीसाठी केवळ चालढकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:16 IST

जळगाव : पूरग्रस्त कोकण, पश्चिम महाराष्ट्रात सर्वच नष्ट झाले असताना पंचनामे करायची गरज नाही, त्यांना आज तातडीची मदत मिळणे ...

जळगाव : पूरग्रस्त कोकण, पश्चिम महाराष्ट्रात सर्वच नष्ट झाले असताना पंचनामे करायची गरज नाही, त्यांना आज तातडीची मदत मिळणे गरजेचे आहे. असे असताना राज्य सरकार केवळ चालढकल करीत असल्याचा आरोप माजी मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावात केला. महाविकास आघाडी सरकारचा ढिसाळ कारभार पाहिला तर तळीयेतील घटनेनंतर २२ तास उलटूनही तेथे तलाठी नाही की कोणताही प्रशासकीय अधिकारी पोहोचू शकला नव्हता, अशीही टीका महाजन यांनी केली.

कोकण, पश्चिम महाराष्ट्र या भागात पूरपरिस्थिती उद्‌भवल्यानंतर तेथे गिरीश महाजन यांनी मदत केल्यानंतर ते शनिवारी जळगावात आले होते. त्यांच्या उपस्थितीत पत्रकार संघाच्या वतीने पूरग्रस्तांना मदत पाठविण्यात आली. यावेळी पूरग्रस्तांच्या मदतीविषयी बोलताना महाजन यांनी सरकारवर टीका केली.

संस्था सरसावल्या, सरकारचे केवळ दौरे

पूरग्रस्त भागात गंभीर परिस्थिती उद्भवल्याने त्या भागात आज लोकांच्या अंगावर कपडे नाहीत, पांघरायला काहीच नाही, असे सर्व उद्‌ध्वस्त झालेले असताना त्यांना तातडीची मदत मिळणे गरजेेचे आहे. मात्र, सरकार पंचनाम्यात अडकले आहे. जेेथे सर्व उद्‌ध्वस्त झाले आहे, तेथे पंचनाम्याची काय गरज, असा सवाल करीत पूरग्रस्तांना आज तातडीच्या मदतीची गरज असल्याचे महाजन म्हणाले. अशा परिस्थितीत त्या भागात अनेक संस्था मदतीसाठी सरसावल्या आहेत, मात्र सरकार केवळ दौरे करीत असल्याची टीकादेखील महाजन यांनी केली.

विरोधी पक्ष जातात म्हणून सरकारचाही सोपस्कार

पूरग्रस्तांच्या भेटीसाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व अन्य विरोधी पक्षातील नेते जात असल्याने मुख्यमंत्री व इतर मंत्रीही दौरे करीत असल्याची टीका महाजन यांनी केली. मात्र त्यातून पूरग्रस्तांच्या पदरी काहीच पडले नसल्याचे ते म्हणाले. पूरग्रस्तांना मदतीची गरज असल्याने मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान नागरिक संतापले होते. त्यावेळी त्यांना आधार देण्याऐवजी भास्कर जाधव कशा पद्धतीने बोलले हे सर्वांनी पाहिल्याचेदेखील महाजन म्हणाले.

आम्ही पोहोचू शकतो, प्रशासन का नाही?

तळीयेच्या घटनेविषयी आम्हाला माहिती मिळाल्यानंतर आम्ही तेथे पोहोचलो. मात्र घटनेच्या २२ तासांनंतर तेथे प्रशासकीय अधिकारी नाही, की सरकारमधील कोणीही पोहोचले नव्हते. आम्ही जाऊ शकतो, मग मदतीसाठी सरकार का पोहोचू शकत नाही, असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला. नागरिकांच्या मदतीने आम्ही तेथे ३२ मृतदेह काढले, तोपर्यंत कोणीही पोहोचले नसल्याचे महाजन म्हणाले.

संजय राऊत यांचे समर्थन दुर्दैवी

शिवसेनेत गुंड असल्याचे समर्थन खासदार संजय राऊत करीत असतील तर हे दुर्दैव आहे. सत्ताधारी पक्षाने असे व्यक्तव्य करीत असल्यास काय बोलणार, अशी टीका महाजन यांनी केली.