शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Election 2026: 'हा काय विकास? शाई पुसा आणि पुन्हा मतदान करा!'; राज ठाकरेंचा संताप, 'पाडू' मशीनवरून सरकारला ठणकावले
2
भाजप आणि शिंदे सेनेत राडा, काय म्हणाले भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण?
3
'या' देशाकडे आहे जगातील सर्वाधिक १,१०,००० मेट्रिक टन चांदी; पाहा भारताकडे किती आहे चांदीचा साठा
4
BMC Election 2026: मोठी बातमी! शाईऐवजी मार्कर निवडणूक आयोगानेच दिला, पुसला जातोय...; मुंबई आयुक्तांची कबुली
5
मतदान केंद्रात शिरला घोणस जातीचा विषारी साप, उडाली खळबळ
6
Maharashtra Municipal Election 2026 Voting LIVE Updates: “हे आम्ही खपवून घेणार नाही”; मतदान केल्यावर राज ठाकरेंचा इशारा
7
मुलानेच केला आईचा खून, बंदुकीतून झाडली गोळी, भयानक घटनेनं कोकण हादरलं, धक्कादायक कारण समोर आलं 
8
IIT इंजिनिअर बनला 'डिजिटल धोबी'! ८४ लाखांची नोकरी सोडून उभा केला १६० कोटींचा 'यूक्लीन' ब्रँड
9
६५-७० लढाऊ विमाने घेऊन अमेरिकेची युद्धनौका इराणच्या दिशेने निघाली; समुद्रात मोठी खळबळ...
10
सासू, पाच सुना आणि मुलगी, भीषण अपघातात झाला मृत्यू, अंत्यसंस्काराहून परतताना घडली दुर्घटना
11
"मैत्रीपूर्ण लढत कधीच होत नाही, हा केवळ..."; मनसे नेते राजू पाटील यांची शिवसेना-भाजप युतीवर टीका
12
Makar Sankranti 2026: मुलांच्या दीर्घायुष्यासाठी माता कुंतीने दिले होते 'हे' दान; यंदा तुम्हीही लुटा 'कुंतीचे वाण'
13
२१ जानेवारीपासून अमेरिकेची दारे बंद! ७५ देशांसाठी व्हिसा प्रक्रिया रोखली; भारतावर काय होणार परिणाम?
14
मनसेच्या उमेदवारासमोरच पहिला दुबार मतदार सापडला, तो ही दादरमध्ये...; फोडला की सोडला? पुढे काय झाले...
15
PMC Election 2026: पुण्यात मोठा राडा! शाई पुसण्याच्या बाटलीसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्याला पकडले
16
निवृत्तीची चिंता संपली! पोस्टाची 'ही' स्कीम करेल मालामाल; दरमहा होईल ₹२०,००० ची कमाई, किती करावी लागेल गुंतवणूक?
17
कल्याणमध्ये मतदानादरम्यान खळबळ: बोटाला लावलेली शाई लगेच पुसली जातेय! मनसे उमेदवार उर्मिला तांबे यांचा निवडणूक प्रशासनाला संतप्त सवाल
18
कर्मचाऱ्यांना मिळणार ₹२ कोटींपर्यंतच्या इन्शुरन्स, स्वस्त लोनसह हे फायदे; लाँच झाली नवी सुविधा, जाणून घ्या
19
काही हरवलंय? काळजी सोडा! 'हा' एक मंत्र तुमची वस्तू शोधून देईल; अनेकांनी घेतलाय अनुभव 
20
731666404000 रुपये 'साफ'...! मुकेश अंबानी 100 अब्ज डॉलरच्या क्लब मधून बाहेर; आता Q3 वर नजर
Daily Top 2Weekly Top 5

पहूरसह परिसरात क्षारयुक्त पावसाने शेतकरी धास्तावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:15 IST

पहूरसह परिसरात अद्यापही नदी, नाले, धरणे, दमदार पावसाच्या अभावाने कोरडेठाक आहे. मात्र शुक्रवारी सकाळी हलक्या सरीचा पाऊस ...

पहूरसह परिसरात अद्यापही नदी, नाले, धरणे, दमदार पावसाच्या अभावाने कोरडेठाक आहे. मात्र शुक्रवारी सकाळी हलक्या सरीचा पाऊस पडल्याने शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे. क्षारयुक्त पाऊस झाल्याने केळी, कपाशी, मका, उडिद, मूग याबरोबरच मिरची, वांगी, कारली आदी भाजीपाला पिकांच्या पानांवर पांढरे ठिपके आढळून आले. गवताच्या पानांवरही ठिपके आढळले आहेत. यामुळे शेतकरी वर्ग धास्तावला आहे.

क्षारयुक्त पावसाने पिकांच्या उत्पादकतेवर परिणाम होईल, या चिंतेत शेतकरी दिसून येत आहे. गवताच्या पानांवरही ठिपके असल्याने गुरांच्या खाण्यात चारा येत आहे. याचा परिणाम गुरांच्या आरोग्यावर जाणवतो का? याचीही काळजी शेतकरी घेत आहे. याविषयी शेतकरी तज्ज्ञ लोकांकडून माहिती जाणून घेत आहेत.

तसेच पिकांच्या उत्पादनावर याचा परिणाम होईल, अशा उलटसुलट चर्चांनी शेतकऱ्यांना कोड्यात टाकले आहे.

प्रतिक्रिया

कपाशी पिकासह वांगे, मिरची, कारले आदी भाजीपाला लागवड केली आहे. शुक्रवारी दुपारी शेतात गेल्यावर क्षारयुक्त पावसामुळे पानांवर पांढरे ठिपके निदर्शनास आले. या प्रादुर्भावाने चिंता निर्माण झाली.

अजय कडूबा चौधरी,

भाजीपाला उत्पादक

यासंदर्भात कृषी विद्यापीठ व कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांशी चर्चा केली. त्यांच्या मतानुसार सोडियमयुक्त पाऊस झाला आहे. किड, रोग किंवा कोणताही प्रादुर्भाव नाही व उत्पादकतेवर काही परिणाम होणार नाही. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता स्वच्छ पाण्याची फवारणी करावी किंवा जोरदार पावसाने पांढरे डाग स्वच्छ होतील.

-अभिमन्यू चोपडे,

तालुका कृषी अधिकारी,

जामनेर

240721\24jal_3_24072021_12.jpg

पहूरसह परिसरात क्षारयुक्त पाऊस झाल्याने केळीच्या पानांवर पडलेले पांढरे डाग.