शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पहूरसह परिसरात क्षारयुक्त पावसाने शेतकरी धास्तावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:15 IST

पहूरसह परिसरात अद्यापही नदी, नाले, धरणे, दमदार पावसाच्या अभावाने कोरडेठाक आहे. मात्र शुक्रवारी सकाळी हलक्या सरीचा पाऊस ...

पहूरसह परिसरात अद्यापही नदी, नाले, धरणे, दमदार पावसाच्या अभावाने कोरडेठाक आहे. मात्र शुक्रवारी सकाळी हलक्या सरीचा पाऊस पडल्याने शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे. क्षारयुक्त पाऊस झाल्याने केळी, कपाशी, मका, उडिद, मूग याबरोबरच मिरची, वांगी, कारली आदी भाजीपाला पिकांच्या पानांवर पांढरे ठिपके आढळून आले. गवताच्या पानांवरही ठिपके आढळले आहेत. यामुळे शेतकरी वर्ग धास्तावला आहे.

क्षारयुक्त पावसाने पिकांच्या उत्पादकतेवर परिणाम होईल, या चिंतेत शेतकरी दिसून येत आहे. गवताच्या पानांवरही ठिपके असल्याने गुरांच्या खाण्यात चारा येत आहे. याचा परिणाम गुरांच्या आरोग्यावर जाणवतो का? याचीही काळजी शेतकरी घेत आहे. याविषयी शेतकरी तज्ज्ञ लोकांकडून माहिती जाणून घेत आहेत.

तसेच पिकांच्या उत्पादनावर याचा परिणाम होईल, अशा उलटसुलट चर्चांनी शेतकऱ्यांना कोड्यात टाकले आहे.

प्रतिक्रिया

कपाशी पिकासह वांगे, मिरची, कारले आदी भाजीपाला लागवड केली आहे. शुक्रवारी दुपारी शेतात गेल्यावर क्षारयुक्त पावसामुळे पानांवर पांढरे ठिपके निदर्शनास आले. या प्रादुर्भावाने चिंता निर्माण झाली.

अजय कडूबा चौधरी,

भाजीपाला उत्पादक

यासंदर्भात कृषी विद्यापीठ व कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांशी चर्चा केली. त्यांच्या मतानुसार सोडियमयुक्त पाऊस झाला आहे. किड, रोग किंवा कोणताही प्रादुर्भाव नाही व उत्पादकतेवर काही परिणाम होणार नाही. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता स्वच्छ पाण्याची फवारणी करावी किंवा जोरदार पावसाने पांढरे डाग स्वच्छ होतील.

-अभिमन्यू चोपडे,

तालुका कृषी अधिकारी,

जामनेर

240721\24jal_3_24072021_12.jpg

पहूरसह परिसरात क्षारयुक्त पाऊस झाल्याने केळीच्या पानांवर पडलेले पांढरे डाग.