शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

वादळ, वारे येऊन गेल्यानंतर ‘किसान ॲप’चा अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:12 IST

वाघडू, ता. चाळीसगाव : शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरावी, म्हणून शेतकऱ्यांसाठी किसान ॲप उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्या माध्यमातून ...

वाघडू, ता. चाळीसगाव : शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरावी, म्हणून शेतकऱ्यांसाठी किसान ॲप उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्या माध्यमातून शेती हवामानाची माहिती संदेशाद्वारे दिली जाते. त्याचा काही प्रमाणात शेतकऱ्यांना फायदाही होतो. पण गेल्या काही दिवसांपासून देण्यात येणारे संदेश हे वेळ गेल्यानंतर येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.

किसान ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हवामान, अतिवृष्टी, वातावरण याची माहिती, पाणी पिकावरील रोगराई, त्यासाठी नियोजन आदी माहितीचे संदेश दिले जातात. ही माहिती शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरते. परंतु गेल्या काही दिवसांपासून या ॲपद्वारे दिले जाणारे संदेश दोन-तीन दिवस उशिरा मिळत आहेत. गेल्या आठवड्यात तालुक्यात व जिल्ह्यात वादळी वारे व काही ठिकाणी पाऊस पडला. प्रत्यक्षात काही ठिकाणी वादळी वारे येऊन गेल्यानंतर दोन दिवसांनी हा संदेश शेतकऱ्यांच्या मोबाईलवर आला.

किसान ॲपवर काय माहिती मिळते?

किसान ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीच्या संबंधित सर्व माहिती मिळते. हवामान, अतिवृष्टी, हवामानाची माहिती ॲपद्वारे उपलब्ध होत असल्याने हवामान पाहून शेतकरी कामाचे नियोजन करीत आहेत. पीक पाणी, पिकासाठी रोगराई याविषयीदेखील माहिती मिळत असल्याने यादृष्टीने पिकाचे रक्षण करण्यास मदत होते. हवामान, रोगराई यासह आवश्यक सर्वच माहिती मिळत असल्याने शेतकऱ्यांना त्यांचा बराच फायदा होत आहे. अपडेट वेळेत मिळावे, तंत्रज्ञानाचे युग असल्याने कोणतीही माहिती वेळेत मिळणे अपेक्षित आहे. पूर्वी मोबाईल व इतर साधने नसल्याने माहितीसाठी अधिकाऱ्यांच्या भेटी घ्याव्या लागत होत्या. मात्र आता तंत्रज्ञानामुळे माहिती अपडेट होणे आवश्यक आहे.

वारा, वादळ याविषयी माहिती उपलब्ध होण्यास तंत्रज्ञानाच्या साहाय्याने बाजारपेठदेखील उपलब्ध होते. यामुळे त्यांचीही माहिती अपडेट असावी. माहिती उशिरा मिळते. सध्या तंत्रज्ञानाचे युग असून त्याचा उपयोग सर्व जग करते. शेतकरीदेखील आता तंत्रज्ञानाचा वापर करीत असून शेतकऱ्यांच्या सोयीसाठी असलेल्या ॲपद्वारे माहिती वेळेत उपलब्ध व्हावी, ॲपद्वारे वेळेत माहिती मिळाल्यास शेतकरी सावध होतो.

- काकासाहेब पाटील, वाघडू.

किसान ॲपद्वारे मिळणारे संदेश शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आहेत. गेल्या काही दिवसांपासून येणारे संदेश उशिरा प्राप्त होत आहेत.

- अमोल पाटील, उपसरपंच, रोकडे.

आज घरबसल्या शेतातील मोटार चालू-बंद करू शकतो आणि तंत्रज्ञान विकसित झाले आहे. असे असताना ॲपवर माहिती म्हणजे माहिती अपडेट केली जात नसावी, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. शासनाने याकडे प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आहे.

- सुनील पवार, भाजप युवा मोर्चा, तालुकाध्यक्ष