शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
4
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
5
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
6
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
7
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
8
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
9
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
10
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
11
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
12
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
13
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
14
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
15
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
16
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
18
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
19
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
20
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...

वादळ, वारे येऊन गेल्यानंतर ‘किसान ॲप’चा अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:12 IST

वाघडू, ता. चाळीसगाव : शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरावी, म्हणून शेतकऱ्यांसाठी किसान ॲप उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्या माध्यमातून ...

वाघडू, ता. चाळीसगाव : शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरावी, म्हणून शेतकऱ्यांसाठी किसान ॲप उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्या माध्यमातून शेती हवामानाची माहिती संदेशाद्वारे दिली जाते. त्याचा काही प्रमाणात शेतकऱ्यांना फायदाही होतो. पण गेल्या काही दिवसांपासून देण्यात येणारे संदेश हे वेळ गेल्यानंतर येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.

किसान ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हवामान, अतिवृष्टी, वातावरण याची माहिती, पाणी पिकावरील रोगराई, त्यासाठी नियोजन आदी माहितीचे संदेश दिले जातात. ही माहिती शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरते. परंतु गेल्या काही दिवसांपासून या ॲपद्वारे दिले जाणारे संदेश दोन-तीन दिवस उशिरा मिळत आहेत. गेल्या आठवड्यात तालुक्यात व जिल्ह्यात वादळी वारे व काही ठिकाणी पाऊस पडला. प्रत्यक्षात काही ठिकाणी वादळी वारे येऊन गेल्यानंतर दोन दिवसांनी हा संदेश शेतकऱ्यांच्या मोबाईलवर आला.

किसान ॲपवर काय माहिती मिळते?

किसान ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीच्या संबंधित सर्व माहिती मिळते. हवामान, अतिवृष्टी, हवामानाची माहिती ॲपद्वारे उपलब्ध होत असल्याने हवामान पाहून शेतकरी कामाचे नियोजन करीत आहेत. पीक पाणी, पिकासाठी रोगराई याविषयीदेखील माहिती मिळत असल्याने यादृष्टीने पिकाचे रक्षण करण्यास मदत होते. हवामान, रोगराई यासह आवश्यक सर्वच माहिती मिळत असल्याने शेतकऱ्यांना त्यांचा बराच फायदा होत आहे. अपडेट वेळेत मिळावे, तंत्रज्ञानाचे युग असल्याने कोणतीही माहिती वेळेत मिळणे अपेक्षित आहे. पूर्वी मोबाईल व इतर साधने नसल्याने माहितीसाठी अधिकाऱ्यांच्या भेटी घ्याव्या लागत होत्या. मात्र आता तंत्रज्ञानामुळे माहिती अपडेट होणे आवश्यक आहे.

वारा, वादळ याविषयी माहिती उपलब्ध होण्यास तंत्रज्ञानाच्या साहाय्याने बाजारपेठदेखील उपलब्ध होते. यामुळे त्यांचीही माहिती अपडेट असावी. माहिती उशिरा मिळते. सध्या तंत्रज्ञानाचे युग असून त्याचा उपयोग सर्व जग करते. शेतकरीदेखील आता तंत्रज्ञानाचा वापर करीत असून शेतकऱ्यांच्या सोयीसाठी असलेल्या ॲपद्वारे माहिती वेळेत उपलब्ध व्हावी, ॲपद्वारे वेळेत माहिती मिळाल्यास शेतकरी सावध होतो.

- काकासाहेब पाटील, वाघडू.

किसान ॲपद्वारे मिळणारे संदेश शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आहेत. गेल्या काही दिवसांपासून येणारे संदेश उशिरा प्राप्त होत आहेत.

- अमोल पाटील, उपसरपंच, रोकडे.

आज घरबसल्या शेतातील मोटार चालू-बंद करू शकतो आणि तंत्रज्ञान विकसित झाले आहे. असे असताना ॲपवर माहिती म्हणजे माहिती अपडेट केली जात नसावी, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. शासनाने याकडे प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आहे.

- सुनील पवार, भाजप युवा मोर्चा, तालुकाध्यक्ष