शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
2
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
3
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
4
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
5
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
6
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
7
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
8
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
9
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
10
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
11
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
12
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
13
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
14
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
15
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
16
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
17
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
18
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
19
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
20
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!

दोन दिवसांच्या पावसाने पालेभाज्या खाऊ लागल्या भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या आठवड्यात पावसाअभावी आवक चांगली असलेल्या पालेभाज्या या आठवड्यात झालेल्या दोन दिवसांच्या पावसानंतर पुन्हा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या आठवड्यात पावसाअभावी आवक चांगली असलेल्या पालेभाज्या या आठवड्यात झालेल्या दोन दिवसांच्या पावसानंतर पुन्हा वधारल्या आहेत. हिरव्या पालेभाज्यांसह टोमॅटोही भाव वधारले असून किराणा साहित्यासह खाद्यतेल या आठवड्यात स्थिर राहिले.

पाऊस नसल्याने सर्वांनीच चिंता वाढली असताना पालेभाज्यांसह सर्वच भाज्यांची आवक वाढल्याने गेल्या आठवड्यात त्यांचे भाव कमी झाले होते. मात्र, या आठवड्यात मंगळवारी व गुरुवारी जोरदार पाऊस झाला व त्याचा भाजीपाल्याच्या आवकवर परिणाम झाला. त्यामुळे गेल्या आठवड्यात कमी झालेले भाव पुन्हा वाढले आहेत. दुसरीकडे खाद्यतेलाचा सध्या दिलासा असून गेल्या आठवड्यात कमी झालेेले भाव अजूनही स्थिर आहेत. यामध्ये सोयाबीन तेल १४६, शेंगदाणा तेल- १७०, सूर्यफूल तेल १५५, पाम तेल १२६ रुपये प्रति किलोवर आहे. तेलासह इतर किराणा साहित्याचेही भाव स्थिर आहेत.

ग्राहकांची प्रतीक्षा

कोरोना संसर्ग कमी होत नाही तोच डेल्टा प्लसच्या संसर्गामुळे निर्बंध घालण्यात आल्याने त्याचा व्यवसायावर मोठा परिणाम होत असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. यामध्ये किराणा दुकान, भाजीपाला विक्री यांना दुपारी ४ वाजेपर्यंतच परवानगी असल्याने पाहिजे तसा व्यवसाय होत नसून ग्राहकी वाढण्याची प्रतीक्षा असल्याचे सांगितले जात आहे. ग्राहकी कमी असल्याने किराणा साहित्याचे भावदेखील स्थिर आहेत. यामध्ये बेसन पीठ ८० ते ९० रुपये प्रतिकिलोवर कायम आहे. साखर ३६ रुपये प्रतिकिलोवर स्थिर असून रवा ३५ ते ४० रुपये तर मैदा ३५ ते ३८ रुपये प्रतिकिलोवर व इतरही किराणा मालाचे भाव स्थिर आहेत.

कोथिंबीर पुन्हा वधारली

पावसाचा हिरव्या पालेभाज्यांवर परिणाम झाल्याने कोथिंबीर, मेथी, पालक यांचे भाव वाढले आहेत. यामध्ये ५० रुपयांवर असलेली मेथी पुन्हा ७० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. कोथिंबीरचे भावदेखील ७० ते ८० रुपये प्रति किलोवर तर पालक ५० रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.

टोमॅटोत पुन्हा भाववाढ

गेल्या काही दिवसांपासून कमी झालेल्या टोमॅटोचे भाव पुन्हा वाढून ते ३५ ते ४० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. लिंबूचे ३० रुपये प्रति किलोवर असून या सोबतच बटाट्याचे भाव २० रुपये प्रति किलो तर कांद्याचे भाव अजूनही ३० रुपये प्रति किलोवर आहे. लसण १५० ते २०० रुपयांवर आहे.

भाजीपाल्याचे भाव पुन्हा वाढल्याने दैनंदिन भाजीपाला खरेदीचे बजेट वाढले आहे. किराणा साहित्य, खाद्यतेलाचेही भाव कमी असल्याने काहीसा दिलासा आहे.

- समाधान बाविस्कर, ग्राहक

खाद्यतेलासह इतर किराणा साहित्याचे भाव स्थिर आहे. निर्बंधामुळे व्यवसायावर मोठा परिणाम होत असून ग्राहकी वाढण्याची प्रतीक्षा आहे.

- रमेश चौधरी, व्यापारी

पाऊस झाल्याने त्याचा परिणाम आवकवर होऊन पालेभाज्यांचे भाव वाढले आहेत. टोमॅटोचेही भाव वाढले असून कांदे, बटाटे स्थिर आहेत.

- अर्जुन तायडे, भाजीपाला विक्रेते