शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
2
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
3
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
4
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
5
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
6
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
7
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
8
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
9
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
10
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
11
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
12
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
13
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
14
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
15
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
16
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...
17
Gold Silver Price 22 August: सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
18
या ₹15 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरला 5 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल! पण कारण काय?
19
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
20
WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकालाच 'हे' सीक्रेट सिक्युरिटी फीचर्स माहीत असायला हवेत!

दोन दिवसांच्या पावसाने पालेभाज्या खाऊ लागल्या भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या आठवड्यात पावसाअभावी आवक चांगली असलेल्या पालेभाज्या या आठवड्यात झालेल्या दोन दिवसांच्या पावसानंतर पुन्हा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या आठवड्यात पावसाअभावी आवक चांगली असलेल्या पालेभाज्या या आठवड्यात झालेल्या दोन दिवसांच्या पावसानंतर पुन्हा वधारल्या आहेत. हिरव्या पालेभाज्यांसह टोमॅटोही भाव वधारले असून किराणा साहित्यासह खाद्यतेल या आठवड्यात स्थिर राहिले.

पाऊस नसल्याने सर्वांनीच चिंता वाढली असताना पालेभाज्यांसह सर्वच भाज्यांची आवक वाढल्याने गेल्या आठवड्यात त्यांचे भाव कमी झाले होते. मात्र, या आठवड्यात मंगळवारी व गुरुवारी जोरदार पाऊस झाला व त्याचा भाजीपाल्याच्या आवकवर परिणाम झाला. त्यामुळे गेल्या आठवड्यात कमी झालेले भाव पुन्हा वाढले आहेत. दुसरीकडे खाद्यतेलाचा सध्या दिलासा असून गेल्या आठवड्यात कमी झालेेले भाव अजूनही स्थिर आहेत. यामध्ये सोयाबीन तेल १४६, शेंगदाणा तेल- १७०, सूर्यफूल तेल १५५, पाम तेल १२६ रुपये प्रति किलोवर आहे. तेलासह इतर किराणा साहित्याचेही भाव स्थिर आहेत.

ग्राहकांची प्रतीक्षा

कोरोना संसर्ग कमी होत नाही तोच डेल्टा प्लसच्या संसर्गामुळे निर्बंध घालण्यात आल्याने त्याचा व्यवसायावर मोठा परिणाम होत असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. यामध्ये किराणा दुकान, भाजीपाला विक्री यांना दुपारी ४ वाजेपर्यंतच परवानगी असल्याने पाहिजे तसा व्यवसाय होत नसून ग्राहकी वाढण्याची प्रतीक्षा असल्याचे सांगितले जात आहे. ग्राहकी कमी असल्याने किराणा साहित्याचे भावदेखील स्थिर आहेत. यामध्ये बेसन पीठ ८० ते ९० रुपये प्रतिकिलोवर कायम आहे. साखर ३६ रुपये प्रतिकिलोवर स्थिर असून रवा ३५ ते ४० रुपये तर मैदा ३५ ते ३८ रुपये प्रतिकिलोवर व इतरही किराणा मालाचे भाव स्थिर आहेत.

कोथिंबीर पुन्हा वधारली

पावसाचा हिरव्या पालेभाज्यांवर परिणाम झाल्याने कोथिंबीर, मेथी, पालक यांचे भाव वाढले आहेत. यामध्ये ५० रुपयांवर असलेली मेथी पुन्हा ७० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. कोथिंबीरचे भावदेखील ७० ते ८० रुपये प्रति किलोवर तर पालक ५० रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.

टोमॅटोत पुन्हा भाववाढ

गेल्या काही दिवसांपासून कमी झालेल्या टोमॅटोचे भाव पुन्हा वाढून ते ३५ ते ४० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. लिंबूचे ३० रुपये प्रति किलोवर असून या सोबतच बटाट्याचे भाव २० रुपये प्रति किलो तर कांद्याचे भाव अजूनही ३० रुपये प्रति किलोवर आहे. लसण १५० ते २०० रुपयांवर आहे.

भाजीपाल्याचे भाव पुन्हा वाढल्याने दैनंदिन भाजीपाला खरेदीचे बजेट वाढले आहे. किराणा साहित्य, खाद्यतेलाचेही भाव कमी असल्याने काहीसा दिलासा आहे.

- समाधान बाविस्कर, ग्राहक

खाद्यतेलासह इतर किराणा साहित्याचे भाव स्थिर आहे. निर्बंधामुळे व्यवसायावर मोठा परिणाम होत असून ग्राहकी वाढण्याची प्रतीक्षा आहे.

- रमेश चौधरी, व्यापारी

पाऊस झाल्याने त्याचा परिणाम आवकवर होऊन पालेभाज्यांचे भाव वाढले आहेत. टोमॅटोचेही भाव वाढले असून कांदे, बटाटे स्थिर आहेत.

- अर्जुन तायडे, भाजीपाला विक्रेते