शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

कोरोनानंतर आता बर्ड फ्ल्यू चा धोका वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - कोरोनानंतर आता ‘बर्ड फ्ल्यू’ चा प्रसार केरळ, मध्यप्रदेश या राज्यांमध्ये सुरु झाला आहे. ‘बर्ड ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - कोरोनानंतर आता ‘बर्ड फ्ल्यू’ चा प्रसार केरळ, मध्यप्रदेश या राज्यांमध्ये सुरु झाला आहे. ‘बर्ड फ्ल्यू’ मुळे अनेक पक्षी, कोंबड्या दगावत असून, चिकन खाल्ल्यांने देखील ‘बर्ड फ्ल्यू’ चा प्रसार होतो. या अफवेमुळे नागरिकांमध्ये भिती पसरली आहे. यामुळे चिकनच्या मागणीत तब्बल ४० टक्क्यांची घट झाली आहे. यामुळे पोल्ट्रीधारक देखील हबकले असून, अनेक पोल्ट्रीधारकांनी निर्जंतुकीरणासाठी धावाधाव सुरु केली आहे. तसेच प्रशासनाने देखील त्या दृष्टीने उपाययोजना देखील सुरु केल्या आहेत.

देशातील काही राज्यांमध्ये ‘बर्ड फ्ल्यू’ चा प्रसार होत असला तरी राज्यात ‘बर्ड फ्ल्यू’ चा प्रसार झालेला नसल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, जिल्ह्यात पक्ष्यांचा मृत्यूची देखील सुदैवाने कोणतीही नोंद अद्याप झालेली नाही. मात्र, प्रशासन सतर्क असून, पक्षी मित्रांना देखील अलर्ट करण्यात आले आहे. कोंबड्यापासून याचा प्रादुर्भाव होत असल्याचा अफवा सोशल मीडियावर पसरवल्या जात असल्याने चिकनच्या मागणीत मोठी घट झाली आहे. शहरात दररोज सरासरीने १० टनापेक्षा अधिकची चिकनची विक्री होत असते, मात्र ही विक्री ६ टनपर्यंत आली आहे. चिकन ऐवजी आता खवय्ये मटनला पसंती देत आहेत. यासह कोरोनामध्ये मागणी वाढलेल्या अंड्यांची आता ‘बर्ड फ्ल्यू’ मुळे मागणी काही प्रमाणात घटली आहे.

राज्य शासनाने ‘बर्ड फ्ल्यू’ संदर्भात आदेश काढले आहेत. त्यानुसार नियोजन करण्यात येत आहे. विविध ठिकाणी सर्वेक्षण करण्यात येणार असून, मृत पक्षी आढळल्यास तत्काळ प्रशासनाला कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

-डॉ. ए. डी. पाटील, प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त

मृत पक्षी आढळल्यास तत्काळ कळवा

हिमाचल प्रदेश आणि केरळ या दोन राज्यांमध्ये बर्ड फ्ल्यूने धुमाकूळ घातला आहे. अद्याप राज्यात त्याचा प्रादुर्भाव दिसून आलेला नसला तरी प्रशासन मात्र त्यासाठी सतर्क झाले आहे. जिल्ह्यातील पाणवठे किंवा जेथे पक्षी जास्त येतात. त्या ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तसेच धरण किंवा अभयारण्यातदेखील मोठ्या प्रमाणात स्थलांतरित पक्षी येतात. तेथे मृत पक्षी आढळलेल्या धरणांवरील उपअभियंता आणि अभयारण्यांसाठी वनविभागाने माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पशु संवर्धन विभागाकडून

अशी घेतली जातेय काळजी

- आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्या अडचणींवर निवारण करण्यासाठी रॅपिड रेस्क्यू टीमची स्थापना करण्यात आली आहे.

-जळगावातील पाणवठ्यांवर स्थलांतरित पक्षी हे दरवर्षी तीन हजार किमीचा प्रवास करून हिवाळ्यात दाखल होत असून, अनेक पक्षी याआधीच दाखल झाले आहेत. पक्षी मित्रांच्या मदतीने अशा पक्ष्यांचा शोध घेवून, मृत पक्ष्यांची माहिती मागवली जाणार.

-जिल्ह्यात अजून तरी मृत पक्षींची नोंद नाही