शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

२० दिवसांनंतर पुन्हा ‘वीकेंड’ला बाजारपेठ बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाचा संसर्ग कमी होत नाही तोच डेल्टा प्लसचे रुग्ण समोर आल्याने जिल्ह्यात पुन्हा निर्बंध ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाचा संसर्ग कमी होत नाही तोच डेल्टा प्लसचे रुग्ण समोर आल्याने जिल्ह्यात पुन्हा निर्बंध लागू झाले व शनिवार, रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार २० दिवसांनंतर पुन्हा बंद झाले आहेत. रविवार, २७ जूनपासून याची अंमलबजावणी झाल्याने सकाळपासूनच बाजारपेठेत शुकशुकाट होता. दोन महिन्यांच्या खंडानंतर पुन्हा बाजारपेठ बंद झाल्याने व्यापारी वर्गदेखील हवालदिल झाले आहे.

फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापासून कोरोनाची दुसरी लाट आली व एप्रिल महिन्यापासून निर्बंध लागू झाले. यात अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे शहरातील महात्मा फुले मार्केट, गोलाणी मार्केट, महात्मा गांधी मार्केट यासह सर्वच मार्केट व इतरही दुकाने बंद झाली होती. व्यवसाय बंद झाल्याने व्यापाऱ्यांसह दुकानांवर काम करणारे कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले व दुकाने पुन्हा सुरू ठे‌वण्यासाठी विविध व्यापारी संघटना, व्यापारी बांधवांनी पाठपुरावा सुरू केला होता. या काळात दोन महिने दुकाने बंद राहिली.

पुन्हा बंदचे संकट

ब्रेक द चेनमध्ये संसर्ग कमी होत गेल्याने १ जूनपासून निर्बंध शिथिल करण्यात आले व अत्यावश्यक सेवेसह इतरही दुकानांना दुपारी दोन वाजेपर्यंत दुकाने उघडण्याची परवानगी मिळाली. त्यानंतर कोरोनाच्या वर्गीकरणातील पहिल्या टप्प्यात जळगाव जिल्हा असल्याने ७ जूनपासून अनलॉक होऊन सर्वच व्यवहारांना सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत व्यवसायाची परवानगी मिळाली. यामुळे व्यापारी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले होते. मात्र, दुकाने सुरू होऊन २० दिवस होत नाही तोच पुन्हा दुकाने बंद झाली. जिल्ह्यात कोरोना संसर्गापासून दिलासा मिळाला. मात्र, आता डेल्टा प्लसने चिंता वाढविली व पुन्हा निर्बंधाचे संकट ओढावले आहे. राज्य सरकारने सरसकट सर्वच जिल्हे तिसऱ्या टप्प्यात टाकल्याने अत्यावश्यक सेवेसह सर्वच व्यवहारांना दुपारी चार वाजेपर्यंतच परवानगी दिली आहे. यातही इतर व्यवहारांना केवळ सोमवार ते शुक्रवारपर्यंतच व्यवसायाची परवानगी राहणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी काढले.

जिल्हा प्रशासनाने काढलेल्या या आदेशाची रविवार, २७ जूनपासून अंमलबजावणी सुरू झाली. परिणामी, रविवारी सकाळपासून शहरातील बाजारपेठेत पुन्हा शुकशुकाट पाहायला मिळाला.

व्यापारी वर्ग संकटात

आठवड्यातील दोन दिवस व्यवसाय पुन्हा एकदा ठप्प झाल्याने व्यापारी वर्ग पुन्हा संकटात सापडला आहे. त्यातही सोमवार ते शुक्रवार केवळ दुपारी चार वाजेपर्यंतच व्यवसाय सुरू राहणार असल्याने संध्याकाळच्या वेळी होणारी मोठी खरेदीही ठप्प होणार आहे. शहरात दिवसभरापेक्षा संध्याकाळी खरेदीचे प्रमाण अधिक असते व त्याच वेळी नेमकी दुकाने बंद राहणार असल्याने आर्थिक घडी पुन्हा विस्कटण्याची भीती व्यापारी वर्गात आहे.

आठवडाभरानंतर घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण अगदी कमी असले तरी केवळ महिनाभरापूर्वीच्या नमुन्यातून डेल्टा प्लसचे रुग्ण समोर आल्याने निर्बंध लावण्यात आले आहेत. कोरोनाचा संसर्ग आठवडाभरात पाहून संसर्ग असाच स्थिर राहिला अथवा कमी झाल्यास व्यवसायांना पूर्णवेळ सुरू करण्याची परवानगी मिळावी, या मागणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.