शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

साहसी खेळांचा शिक्षणात समावेश व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 00:08 IST

उमेश झिरपे : गिर्यारोहणामुळे मुलांचा व्यक्तिमत्व विकास होतो

लोकमत मुलाखत-जळगाव : साहसी खेळांचा समावेश हा शिक्षण पद्धतीत झाल्यास त्यामुळे मुलांचा व्यक्तिमत्व विकासात वाढ होईल. गिर्यारोहण तसेच अन्य साहसी खेळ खेळणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यासाठी स्वतंत्र गुण द्यावेत, यामुळे साहसी खेळांचा विकास होईल, असे मत प्रसिद्ध गिर्यारोहक उमेश झिरपे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.जळगावच्या आशा फाऊंडेशनने आयोजित केलेल्या व्याख्यानासाठी उमेश झिरपे हे जळगावला आले आहेत. त्यानिमित्ताने त्यांनी लोकमतशी विशेष चर्चा केली.झिरपे म्हणाले की,‘ जगभरात १४ आठ हजार मीटरपेक्षा जास्त उंचीची शिखरे सर करण्याचा आमचा मानस आहे. त्यातील सात शिखरे आम्ही सर देखील केली आहे. महाराष्ट्रातील सध्याची गिर्यारोहणाची स्थिती यावर बोलताना झिरपे म्हणाले की, महाराष्ट्रात सह्याद्रीच्या डोंगररागांमध्ये गिर्यारोहण आणि अ‍ॅडव्हेंचर टुरिझम सध्या वाढले आहे. या खेळांमध्ये सुरक्षितता अत्यंत महत्वाची असते. या क्षेत्रात देखील रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत, त्यासाठी प्रशिक्षीत व्यक्तींची गरज आहे. शासकीय पातळीवर देखील प्रयत्न सुरू आहेत.’ते पुढे म्हणाले की, गिर्यारोहण आणि अन्य साहसी खेळांमुळे मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. शाळेत जसे संगीत, चित्रकला, इतर खेळांसाठी विद्यार्थ्यांना स्वतंत्र गुण दिले जातात, त्याप्रमाणेच गिर्यारोहण, पॅरासेलिंग, स्कुबा डायव्हिंग या साहसी खेळांना देखील स्वतंत्र गुण दिले जावे. त्याने या खेळांना प्रोत्साहन मिळेल. तसेच लहान वयात मुले सध्या मोबाईल आणि इंटरनेटकडे आकर्षित होत आहेत. त्यांच्यातील उर्जेचा योग्य वापर देखील होईल. लहान मुलांसाठी विविध साहसी खेळांच्या प्रशिक्षणाचे आयोजन ‘गिरीप्रेमी’ या संस्थेमार्फत केले जाते.’एव्हरेस्ट वीर उमेश झिरपे यांनी सांगितले की, लहान मुलांमध्ये या खेळांमुळे नेतृत्वगुण, संघ भावना वाढीस लागते. त्यांचा आत्मविश्वास वाढतो. विद्यार्थ्यांना लाईफ स्किल्सचे शिक्षणच यातून मिळते.’

कांचनजुंगा चढाईसाठी कठीण शिखरमाऊंट कांचनजुंगा हे जगातील तिसरे सर्वात उंच शिखर असले तरी हे शिखर मला चढाईसाठी कठीण वाटते. हा पर्वत चढताना दगड आणि बर्फातून मार्ग काढावा लागतो. तर ६० ते ७० अंशाच्या कोनात बेस कॅम्पपासून ११०० मीटर चढाई करावी लागते.त्यासाठी २४ तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. प्रत्येक शिखर हे आव्हानात्मक असले तरी त्याचा वेगळेपणा असतो, असेही ते म्हणाले