शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

वाळू चोरी रोखण्यासाठी प्रशासनाची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यातील सर्व वाळू गटांची मुदत ही बुधवारी संपली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व वाळू गटांमधील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यातील सर्व वाळू गटांची मुदत ही बुधवारी संपली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व वाळू गटांमधील उचल आता ३० सप्टेंबरपर्यंत बंद राहणार आहे. या काळात वाळूचा अवैध उपसा होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन उपाययोजना करीत आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी बैठक घेऊन अधिकाऱ्यांना निर्देश दिले. तसेच पोलीस, महसूल विभाग आणि परिवहन विभागाची संयुक्त पथके तयार केली जाणार आहेत.

जिल्हाधिकारी राऊत यांनी सकाळी वाळू चोरी रोखण्यासाठीच्या उपाययोजनांसदर्भात बैठक घेतली. त्यात पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, उपविभागीय परिवहन अधिकारी श्याम लोही, महसूल उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे, प्रांतअधिकारी प्रसाद मते, जळगावचे तहसीलदार नामदेव पाटील, जिल्हा खनिकर्म अधिकारी दीपक चव्हाण उपस्थित होते.

जिल्हाधिकारी राऊत यांनी येत्या काळात वाळू गटांची उचल अधिकृतरीत्या बंद असल्याने या काळात वाळू चोरी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही वाळू चोरी रोखण्यासाठी लवकरच पोलीस, महसूल आणि आरटीओची संयुक्त पथके तयार केली जाणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच वाळू चोरी करणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई करण्याच्या सूचनादेखील जिल्हाधिकारी राऊत यांनी दिल्या.

गुरुवारपासून वाळूची उचल बंद

राज्य शासनाच्या आदेशानुसार १० जून ते ३० सप्टेंबर या काळात वाळूची उचल कुणालाही करता येणार नाही. पावसाळ्याच्या काळात वाळू उत्खनन संपूर्ण बंद केले जाणार आहे. मात्र, तरीही अनेकजण चोरट्या मार्गाने वाळू उत्खनन आणि वाहतूक करतात. असे प्रकार आढळून आल्यास त्या वाहनांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी अधिकाऱ्यांना दिले.