शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
3
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
6
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
7
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
8
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
9
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
10
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
11
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
12
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
14
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
15
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
16
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
17
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार
18
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 
19
एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
20
एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

राज्यातील आदिवासी विद्यार्थी अद्याप गणवेशविनाच

By admin | Updated: January 4, 2016 00:35 IST

शैक्षणिक वर्ष संपण्यास अवघा तीन महिन्यांचा कालावधी बाकी असला तरी यंदादेखील राज्यातील शासकीय आश्रमशाळेतील विद्याथ्र्याना गणवेश मिळाला नसल्याचे चित्र आहे.

रमाकांत पाटील,

नंदुरबार

शैक्षणिक वर्ष संपण्यास अवघा तीन महिन्यांचा कालावधी बाकी असला तरी यंदादेखील राज्यातील शासकीय आश्रमशाळेतील विद्याथ्र्याना गणवेश मिळाला नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आश्रमशाळेतील विद्यार्थी गेल्या वर्षी मिळालेल्या बिनमापाच्या गणवेशातच सध्या शाळांमध्ये दिसत आहेत.

आदिवासी विकास विभागातर्फे सुरू असलेल्या शासकीय आश्रमशाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता आणि भौतिक सुविधांच्या चर्चा दरवर्षीच रंगतात. शासनातर्फे या विद्याथ्र्याना दरवर्षी दोन गणवेशाचे जोड पुरविण्यात येतात. मात्र गेल्या अनेक वर्षात कधीही वेळेवर ते मिळाले नसल्याचे चित्र आहे. दोन वर्षापूर्वी आघाडीचे शासन असताना तेव्हाच्या आदिवासी विकासमंत्र्यांनी दरवर्षी सुरू असलेल्या गणवेशाच्या तक्रारी कमी करण्यासाठी विद्याथ्र्याच्या बँक खात्यावरच गणवेशाचे पैसे वर्ग करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र ठेकेदारी लॉबीने चर्चेत असलेल्या या विभागात ते शक्य झाले नाही. याउलट विद्याथ्र्याना व त्यांच्या पालकांचे संयुक्त बँक खाते उघडण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक व पालकांचाही नाहक वेळ गेला. नवीन शासन सत्तेवर आल्यानंतर गेल्या वर्षी या विद्याथ्र्याना ठेकेदाराकडून गणवेश पुरविण्यात आले. परंतु बहुतांश गणवेश विद्याथ्र्याच्या बिनमापाचे होते. शर्ट मोठा तर पॅन्ट लहान किंवा दोघे लहान-मोठे असे होते. काही विद्याथ्र्याना अगदी मापातच येत नसल्याने त्यांनी ते गणवेश परत पाठवले. परंतु त्यांना अद्यापर्पयत ते मिळालेले नाही.

एकीकडे ही स्थिती असताना किमान यंदा तरी चांगले गणवेश विद्याथ्र्याना मिळतील ही अपेक्षा पालक, विद्यार्थी व शिक्षकांना होती. पण दुसरे सत्र सुरू होऊन काही महिने झाले तरी अद्याप गणवेशाची प्रतीक्षा सुरूच आहे. हे गणवेश कधी मिळतील याबाबत अद्याप तरी स्थानिक पातळीवर प्रशासन नेमके सांगू शकत नाही.