शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
3
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
4
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
5
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
6
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
7
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
8
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
9
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
10
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
11
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
12
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
13
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
14
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
15
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
16
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
17
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
18
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
19
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
20
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया

'पुस्तक भिशी'तून वाचन चळवळीला गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:12 IST

जळगाव : पुस्तकांशी मैत्री व्हावी...रुची-अभिरुची संस्कारित व्हावी...पुस्तकं विकत घेऊन वाचनाची सदाचारी सवय रुजावी आणि वाचन चळवळीला गती मिळावी... यासाठी ...

जळगाव : पुस्तकांशी मैत्री व्हावी...रुची-अभिरुची संस्कारित व्हावी...पुस्तकं विकत घेऊन वाचनाची सदाचारी सवय रुजावी आणि वाचन चळवळीला गती मिळावी... यासाठी 'परिवर्तन' संस्थेने 'पुस्तक भिशी' उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाला वाचनप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

कोरोनामुळे लॉकडाउन लागले आणि सर्वचं व्यक्ती घरात अडकली. अनेक दिवसांपासून घरातचं राहिल्यामुळे नागरिकांना वेळ घालविणेही कठीण झाले. बैैठे खेळ, टीव्ही, मोबाईल हे किती वेळ खेळत बसणार हा प्रश्न. अशा परिस्थितीत वाचन चळवळ दृढ व्हावी आणि नागरिकांची पुस्तकांशी मैत्री व्हावी यासाठी परिवर्तनचे अध्यक्ष व ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील यांनी पुस्तक भिशीची संकल्पना मांडली व राबविली. रंगकर्मी मंजुषा भिडे व साहित्यिक ज्ञानेश्वर शेंडे हे या उपक्रमाचे प्रमुख आहे. सर्व आर्थिक बाजू सांभाळण्याची जबाबदारी उत्स्फूर्तपणे हेमंत भिडे यांनी घेतली आणि या उपक्रमाला सुरूवात झाली.

आणि...निवडला जातो भिशी विजेता..

या उपक्रमातंर्गत दर महिन्याला दोनशे रूपये प्रत्येकी जमा होतात. १२ सहभागी सदस्यांचा एक ग्रुप असून त्यातील एकाची निवड भिशी विजेता 'भाग्यवान वाचक' या दृष्टीने करण्यात येते. आतापर्यंत तीन पुस्तक भिशी तयार झाले असून आणखी एक भिशी गट प्रस्तावित आहे. महिन्यातील पहिल्या रविवारी सहभागी सदस्यांची आॅनलाईन भेट होते. त्यावेळी चिठ्ठ्या टाकून वाचकांची निवड करण्यात येते. तसेच वाचन समृद्धी अनुभवलेल्या जाणत्या व्यक्तिमत्त्वांचे या विषयावर विवेचन आयोजित केले जाते. त्याचबरोबर ज्येष्ठ साहित्यिक, साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित कवी श्रीकांत देशमुख यांनी प्रथम पुष्प गुंफले तर दुसरे पुष्प ज्येष्ठ अभिनेते, लेखक व अर्थतज्ज्ञ दीपक करंजीकर यांनी गुंफले. या रविवारी ऑनलाईन झालेल्या भिशीत सोनाली पाटील यांनी डॉ.भालचंद्र नेमाडे लिखित 'बिढार' कादंबरीवर आणि डॉ.स्नेहल पाटील यांनी ' नॉट विदाऊट माय डॉक्टर,' या पुस्तकांवर विवेचन केले. जुलै महिन्यातील पहिल्या रविवारचे 'भाग्यवान विजेते ' तीन भिशी सदस्य आहेत. उदय सपकाळे, जयश्री पाटील आणि शंभू पाटील हे तीन भाग्यवान विजेते असून त्यांनी वाचलेल्या पुस्तकावर तिघेही वाचकांशी ऑनलाईन संवाद साधणार आहेत.

त्या रक्कमेतून विकत घेतली जातात केवळ पुस्तकचं

भिशीतून प्राप्त रकमेतून फक्त पुस्तकच विकत घेतली जातात. 'मला आवडलेलं पुस्तक' यावर भिशी विजेते आपले विचार व्यक्त करतात. भिशीचा उद्देश फक्त पुस्तक विकत घेणे एवढाच नव्हे तर ती पुस्तक वाचून त्यावर बोलणे, ती पुस्तकं इतरांना उपलब्ध करून देणे, विचारांसोबत पुस्तकांचही आदान प्रदान होत राहणे हा सुद्धा आहे, अशी माहिती कलावंत हर्षल पाटील यांनी दिली. आता पर्यंत या योजनेत ३६ वाचक सहभागी झाले असून एकत्रित ७ हजार २०० रूपये रक्कमेची पुस्तके प्रत्येक महिन्याला सध्या विकत घेतली जातात. पुढील महिन्यात आणखी दोन पुस्तक भिशी प्रस्तावित आहेत.