शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

'पुस्तक भिशी'तून वाचन चळवळीला गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:12 IST

जळगाव : पुस्तकांशी मैत्री व्हावी...रुची-अभिरुची संस्कारित व्हावी...पुस्तकं विकत घेऊन वाचनाची सदाचारी सवय रुजावी आणि वाचन चळवळीला गती मिळावी... यासाठी ...

जळगाव : पुस्तकांशी मैत्री व्हावी...रुची-अभिरुची संस्कारित व्हावी...पुस्तकं विकत घेऊन वाचनाची सदाचारी सवय रुजावी आणि वाचन चळवळीला गती मिळावी... यासाठी 'परिवर्तन' संस्थेने 'पुस्तक भिशी' उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाला वाचनप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

कोरोनामुळे लॉकडाउन लागले आणि सर्वचं व्यक्ती घरात अडकली. अनेक दिवसांपासून घरातचं राहिल्यामुळे नागरिकांना वेळ घालविणेही कठीण झाले. बैैठे खेळ, टीव्ही, मोबाईल हे किती वेळ खेळत बसणार हा प्रश्न. अशा परिस्थितीत वाचन चळवळ दृढ व्हावी आणि नागरिकांची पुस्तकांशी मैत्री व्हावी यासाठी परिवर्तनचे अध्यक्ष व ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील यांनी पुस्तक भिशीची संकल्पना मांडली व राबविली. रंगकर्मी मंजुषा भिडे व साहित्यिक ज्ञानेश्वर शेंडे हे या उपक्रमाचे प्रमुख आहे. सर्व आर्थिक बाजू सांभाळण्याची जबाबदारी उत्स्फूर्तपणे हेमंत भिडे यांनी घेतली आणि या उपक्रमाला सुरूवात झाली.

आणि...निवडला जातो भिशी विजेता..

या उपक्रमातंर्गत दर महिन्याला दोनशे रूपये प्रत्येकी जमा होतात. १२ सहभागी सदस्यांचा एक ग्रुप असून त्यातील एकाची निवड भिशी विजेता 'भाग्यवान वाचक' या दृष्टीने करण्यात येते. आतापर्यंत तीन पुस्तक भिशी तयार झाले असून आणखी एक भिशी गट प्रस्तावित आहे. महिन्यातील पहिल्या रविवारी सहभागी सदस्यांची आॅनलाईन भेट होते. त्यावेळी चिठ्ठ्या टाकून वाचकांची निवड करण्यात येते. तसेच वाचन समृद्धी अनुभवलेल्या जाणत्या व्यक्तिमत्त्वांचे या विषयावर विवेचन आयोजित केले जाते. त्याचबरोबर ज्येष्ठ साहित्यिक, साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित कवी श्रीकांत देशमुख यांनी प्रथम पुष्प गुंफले तर दुसरे पुष्प ज्येष्ठ अभिनेते, लेखक व अर्थतज्ज्ञ दीपक करंजीकर यांनी गुंफले. या रविवारी ऑनलाईन झालेल्या भिशीत सोनाली पाटील यांनी डॉ.भालचंद्र नेमाडे लिखित 'बिढार' कादंबरीवर आणि डॉ.स्नेहल पाटील यांनी ' नॉट विदाऊट माय डॉक्टर,' या पुस्तकांवर विवेचन केले. जुलै महिन्यातील पहिल्या रविवारचे 'भाग्यवान विजेते ' तीन भिशी सदस्य आहेत. उदय सपकाळे, जयश्री पाटील आणि शंभू पाटील हे तीन भाग्यवान विजेते असून त्यांनी वाचलेल्या पुस्तकावर तिघेही वाचकांशी ऑनलाईन संवाद साधणार आहेत.

त्या रक्कमेतून विकत घेतली जातात केवळ पुस्तकचं

भिशीतून प्राप्त रकमेतून फक्त पुस्तकच विकत घेतली जातात. 'मला आवडलेलं पुस्तक' यावर भिशी विजेते आपले विचार व्यक्त करतात. भिशीचा उद्देश फक्त पुस्तक विकत घेणे एवढाच नव्हे तर ती पुस्तक वाचून त्यावर बोलणे, ती पुस्तकं इतरांना उपलब्ध करून देणे, विचारांसोबत पुस्तकांचही आदान प्रदान होत राहणे हा सुद्धा आहे, अशी माहिती कलावंत हर्षल पाटील यांनी दिली. आता पर्यंत या योजनेत ३६ वाचक सहभागी झाले असून एकत्रित ७ हजार २०० रूपये रक्कमेची पुस्तके प्रत्येक महिन्याला सध्या विकत घेतली जातात. पुढील महिन्यात आणखी दोन पुस्तक भिशी प्रस्तावित आहेत.