शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जळगाव विभागातील ७ हजार शेतकऱ्यांचे तब्बल १५० कोटींचे चुकारे मिळणे बाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:17 IST

- १७ हजार ७७ शेतकऱ्यांचा कापूस खरेदी - विभागात ६ लाख ११ हजार ७८८ क्विंटल कापूस खरेदी - ९ ...

- १७ हजार ७७ शेतकऱ्यांचा कापूस खरेदी

- विभागात ६ लाख ११ हजार ७८८ क्विंटल कापूस खरेदी

- ९ हजार ८४० शेतकऱ्यांना देण्यात आली मालाची किंमत

- ९ हजार शेतकऱ्यांना २०० कोटी १७ लाख ५१ हजार १६७ रुपयांची अदायकी

- ७ हजार शेतकऱ्यांना मिळाली नाही चुकऱ्यांची रक्कम

- पणन महासंघाकडे अंदाजे १५० कोटी रुपये घेणे बाकी

राज्याची स्थिती

- राज्यात १ हजार ८०० कोटी रुपयांच्या कापसाची खरेदी

- १ हजार २१० कोटी रुपयांची केली अदायगी

- सुमारे २० हजार शेतकऱ्यांना ६२५ कोटींची अदायगी देणे बाकी

लोकमत न्यूज नेटवर्क

अजय पाटील

जळगाव - किमान आधारभूत दराने खरेदी करण्यात आलेल्या कापसाचे चुकारे शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत पणन महासंघाने दिलेले नाहीत. राज्यातील २० हजार शेतकऱ्यांना अद्याप ६२५ कोटी रुपयांचे चुकारे देणे बाकी असून, यामध्ये जळगाव विभागातील ७ हजार शेतकऱ्यांचे तब्बल १५० कोटी रुपयांचे चुकारे पणन महासंघाकडे बाकी आहेत. शेतकऱ्यांचे चुकारे अदा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाद्वारे बँक ऑफ महाराष्ट्र यांच्याकडून ६.३५ टक्के व्याजदराने १५०० कोटी रुपयांचे कर्ज घेतले असून, या कर्जास शासनाने हमी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह राज्यातील शेतकऱ्यांनाही लवकरच चुकाऱ्यांची रक्कम मिळणार असल्याची माहिती कापूस पणन महासंघाचे विभागीय अध्यक्ष संजय पवार यांनी ‘लोकमत’ ला दिली.

मंजूर होणाऱ्या शासन हमीवर कापूस पणन महासंघास द्यावे लागणारे हमी शुल्क देखील माफ करण्यात आले आहे. मंगळवारी मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. २०२०-२१ या हंगामाकरिता केंद्र शासनाने मध्यम धाग्याच्या कापसाला ५ हजार ५१५ प्रति क्विंटल तर लांब धाग्याच्या कापसाला ५ हजार ८२५ प्रति क्विंटल असा हमी दर निश्चित केला आहे. राज्यात झालेला समाधानकारक पाऊस, अनुकूल हवामान यामुळे या हंगामात ४०० लाख क्विंटल कापसाचे उत्पादन अपेक्षित आहे. त्यानुसार पणन व सीसीआयच्या माध्यमातून खरेदी सुरु आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात सरकीचे दर वाढल्याने खासगी बाजारात देखील आता कापसाला चांगला उठाव मिळाला आहे. त्यामुळे पणन व सीसीआयच्या केंद्रावर शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. शेतकऱ्यांचा कल आता खासगी बाजाराकडे वळला आहे.

निर्यात वाढल्याने बाजारात तेजी

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची मागणी वाढली आहे. मात्र, दुसरीकडे कापसाची आवक आता कमी झाली आहे. त्यामुळे गठाण, सरकीचे भाव वाढले आहेत. तसेच मागणी देखील जास्त असल्याने कापसाचे दर खासगी बाजारात ६ हजार रुपयांपर्यंत पोहचले आहेत. बांग्लादेश, चीन, व्हिएतनाम या देशांमध्ये भारताच्या कापसाची निर्यात देखील वाढली आहे. तर देशातंर्गत मिलांमध्येही कापसाला मागणी आहे. त्यामुळे कापसाची मागणी वाढली असून, आतापर्यंत सर्व गरजू शेतकऱ्यांनी आपला माल विक्री केला आहे. सधन शेतकऱ्यांनी अजूनही आपला माल विक्रीसाठी काढलेला नाही. मागणी असल्याने खासगी बाजारात कापसाचे दर वाढले असल्याची माहिती कापूस बाजारातील तज्ज्ञ हर्षल नारखेडे यांनी दिली.