शहरं
Join us  
Trending Stories
1
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
3
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
4
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
5
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
6
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
7
एकीकडे 'घरवाली' दुसरीकडे 'बाहेरवाली'; दोघींसोबत आनंदाने जगत होता तरुण अन् एक दिवस असं काही झालं... 
8
पितृपक्ष इंदिरा एकादशी २०२५: १० राशींवर श्रीहरी प्रसन्न, शिव-गौरी-लक्ष्मी कृपा; शुभ-लाभ-पैसा!
9
'क्रिस्टल ब्लॅक पर्ल' रंगात होंडा अमेझ भारतात लॉन्च; नव्या लूकमध्ये दिसते आणखी धासू!
10
बीचवर फिरायला गेलेल्या तरुणीवर बॉयफ्रेंडसमोरच सामूहिक बलात्कार; पोलिसांनी आरोपी कसे शोधले?
11
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
12
आयटी इंजिनिअरने १० टक्के पगारवाढ मागितली, नोकरी गमावली; मग त्याला काढणाऱ्याचीही गेली...
13
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
14
'ओझेम्पिक टीथ' म्हणजे काय? वजन कमी करण्याच्या औषधाचा होतोय 'असा' दुष्परिणाम
15
Nupur Bora: नुपूर बोरा आहे तरी कोण? सहा वर्षात अनेक गैरव्यवहार, घरातही सापडलं मोठं घबाड!
16
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
17
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
18
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
19
बंगल्याचा हव्यास, गोविंद बरगेंचा छळ; पूजा गायकवाडचा तुरुंगातील मुक्काम वाढला
20
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स

जळगाव विभागातील ७ हजार शेतकऱ्यांचे तब्बल १५० कोटींचे चुकारे मिळणे बाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:17 IST

- १७ हजार ७७ शेतकऱ्यांचा कापूस खरेदी - विभागात ६ लाख ११ हजार ७८८ क्विंटल कापूस खरेदी - ९ ...

- १७ हजार ७७ शेतकऱ्यांचा कापूस खरेदी

- विभागात ६ लाख ११ हजार ७८८ क्विंटल कापूस खरेदी

- ९ हजार ८४० शेतकऱ्यांना देण्यात आली मालाची किंमत

- ९ हजार शेतकऱ्यांना २०० कोटी १७ लाख ५१ हजार १६७ रुपयांची अदायकी

- ७ हजार शेतकऱ्यांना मिळाली नाही चुकऱ्यांची रक्कम

- पणन महासंघाकडे अंदाजे १५० कोटी रुपये घेणे बाकी

राज्याची स्थिती

- राज्यात १ हजार ८०० कोटी रुपयांच्या कापसाची खरेदी

- १ हजार २१० कोटी रुपयांची केली अदायगी

- सुमारे २० हजार शेतकऱ्यांना ६२५ कोटींची अदायगी देणे बाकी

लोकमत न्यूज नेटवर्क

अजय पाटील

जळगाव - किमान आधारभूत दराने खरेदी करण्यात आलेल्या कापसाचे चुकारे शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत पणन महासंघाने दिलेले नाहीत. राज्यातील २० हजार शेतकऱ्यांना अद्याप ६२५ कोटी रुपयांचे चुकारे देणे बाकी असून, यामध्ये जळगाव विभागातील ७ हजार शेतकऱ्यांचे तब्बल १५० कोटी रुपयांचे चुकारे पणन महासंघाकडे बाकी आहेत. शेतकऱ्यांचे चुकारे अदा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाद्वारे बँक ऑफ महाराष्ट्र यांच्याकडून ६.३५ टक्के व्याजदराने १५०० कोटी रुपयांचे कर्ज घेतले असून, या कर्जास शासनाने हमी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह राज्यातील शेतकऱ्यांनाही लवकरच चुकाऱ्यांची रक्कम मिळणार असल्याची माहिती कापूस पणन महासंघाचे विभागीय अध्यक्ष संजय पवार यांनी ‘लोकमत’ ला दिली.

मंजूर होणाऱ्या शासन हमीवर कापूस पणन महासंघास द्यावे लागणारे हमी शुल्क देखील माफ करण्यात आले आहे. मंगळवारी मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. २०२०-२१ या हंगामाकरिता केंद्र शासनाने मध्यम धाग्याच्या कापसाला ५ हजार ५१५ प्रति क्विंटल तर लांब धाग्याच्या कापसाला ५ हजार ८२५ प्रति क्विंटल असा हमी दर निश्चित केला आहे. राज्यात झालेला समाधानकारक पाऊस, अनुकूल हवामान यामुळे या हंगामात ४०० लाख क्विंटल कापसाचे उत्पादन अपेक्षित आहे. त्यानुसार पणन व सीसीआयच्या माध्यमातून खरेदी सुरु आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात सरकीचे दर वाढल्याने खासगी बाजारात देखील आता कापसाला चांगला उठाव मिळाला आहे. त्यामुळे पणन व सीसीआयच्या केंद्रावर शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. शेतकऱ्यांचा कल आता खासगी बाजाराकडे वळला आहे.

निर्यात वाढल्याने बाजारात तेजी

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची मागणी वाढली आहे. मात्र, दुसरीकडे कापसाची आवक आता कमी झाली आहे. त्यामुळे गठाण, सरकीचे भाव वाढले आहेत. तसेच मागणी देखील जास्त असल्याने कापसाचे दर खासगी बाजारात ६ हजार रुपयांपर्यंत पोहचले आहेत. बांग्लादेश, चीन, व्हिएतनाम या देशांमध्ये भारताच्या कापसाची निर्यात देखील वाढली आहे. तर देशातंर्गत मिलांमध्येही कापसाला मागणी आहे. त्यामुळे कापसाची मागणी वाढली असून, आतापर्यंत सर्व गरजू शेतकऱ्यांनी आपला माल विक्री केला आहे. सधन शेतकऱ्यांनी अजूनही आपला माल विक्रीसाठी काढलेला नाही. मागणी असल्याने खासगी बाजारात कापसाचे दर वाढले असल्याची माहिती कापूस बाजारातील तज्ज्ञ हर्षल नारखेडे यांनी दिली.