शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

66 यात्रेकरूंची ‘स्वर्गारोहिणी’वर स्वारी

By admin | Updated: May 20, 2017 00:55 IST

जळगाव : हिमालयातील खडतर अध्यात्मिक यात्रेला प्रथमच मोठय़ा प्रमाणात जाणार भाविक

जळगाव :  हिमालय पर्वतरांग ही मानवासाठी या पृथ्वीतलावरील सर्वात अद्भुत व विलक्षण निर्मिती म्हटली जाते. या हिमालय पर्वतरांगेत असलेल्या अतिकठीण अशा ‘स्वर्गारोहिणी’वर (अर्थात स्वर्गावर स्वारी)  जळगावातून 66 यात्रेकरू स्वारी करणार आहेत.  स्वर्गारोहिणीवर एवढय़ा मोठय़ा प्रमाणात जाणारे हे पहिलेच पथक असेल.  जळगावच्या सिद्धी व्यंकटेश देवस्थानच्या वतीने या स्वर्गारोहिणी यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. कैलास मानसरोवर आणि बद्रीनाथ यात्रा ह्या सर्वात कठीण यात्रा समजल्या जातात. त्यापेक्षाही कितीतरी कठीण ही स्वर्गारोहिणी यात्रा मानली जाते.   जाण्या-येण्यासाठी अतिशय खडतर, सारखे चढाव आणि उताराचे मार्ग असलेल्या या स्वर्गारोहिणीवर फारच कमी भाविक जात असतात. कारण तिथले हवामान बदलत असते. एवढे असले तरी ही देवभूमी निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे.  रोमांचक आणि आध्यात्मिक अनुभूतीचे शिखरबिंदू असलेली ही यात्रा आहे. एकाच वेळी हिमकडे, हिमनदी, धबधबे, कुरणे, जंगल आणि पर्वत शिखरे पाहण्याचा आणि अनुभवण्याचा हा एक मार्ग आहे. 29 मे रोजी जळगावहून हे भाविक हरिद्वार एक्स्प्रेसने स्वर्गारोहिणीकडे प्रयाण करतील. यात जळगाव जिल्ह्यासह पुणे, कराड, सोलापूर, सातारा, अहमदनगर, बडोदा,  हैदराबाद, मुंबई, नागपूर, सुरत आणि औरंगाबाद येथील भाविक सहभागी होणार आहेत.     5 जून  रोजी निजर्ला एकादशी आहे. या दिवशी भाविक चक्रतीर्थ सरोवरात स्नानाचा आनंद घेतील.  आतार्पयत अनेक भाविक येथे गेले आहेत. पण एवढय़ा मोठय़ा प्रमाणात स्वर्गारोहिणीवर भाविक प्रथमच जात आहेत.या भाविकांसोबत 46 पिट्ट (कामगार) व सहा गाईडची व्यवस्था करण्यात आली आहे. 10 जणांना एक गाईड दिला जाणार आहे. प्रत्येकाला आठ किलो साहित्य सोबत नेता येईल. या यात्रेसाठी देवस्थानच्या वतीने राज्य सरकार, वनविभाग, प्रदूषण महामंडळ आणि भारतीय सैन्याचीही परवानगी घेण्यात आली. हे  यात्रेकरू 10 जून रोजी जळगावात परत येतील, अशी माहिती देण्यात आली. काय आहे स्वर्गारोहिणी..स्वर्गारोहिणीबाबत फारच कमी लोकांना माहिती आहे. रामायण काळात रावणाने स्वर्गाकडे जाणारा पूल तयार केला होता. त्यासाठी 14 पाय:यांची निर्मिती केली होती. यातील सात पाय:या अजूनही आहेत. यातील फक्त चार पाय:यांचे दर्शन होते. याशिवाय अवतार समाप्तीच्या वेळी पाचही पांडव याच मार्गाने स्वर्गाकडे गेले होते. पांडवांपैकी धर्मराज युधिष्ठिर हे स्वर्गारोहिणीर्पयत पोहचले होते, अशी आख्यायिका सांगितली जाते. बद्रीनाथ मंदिराच्या मागे 39 किलोमीटर अंतरावर पर्वतरांगांमध्ये स्वर्गारोहिणी हे तब्बल 20,512 फूट अर्थात 6252 मीटर उंचीवर आहे.  हे अंतर भाविकांना पायदळ आणि पायवाटेपेक्षा कमी जागेवर चालून पार करायचे आहे.