शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

ज्ञान वाटणाऱ्या ५०० शाळा अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यातील विकासकामांची माहिती देताना ५०० शाळांना संरक्षक भिंत बांधण्यात आल्याची व आणखी बांधण्यात येणार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यातील विकासकामांची माहिती देताना ५०० शाळांना संरक्षक भिंत बांधण्यात आल्याची व आणखी बांधण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नाशिक येथे बैठकीत दिली. मात्र, जिल्ह्यातील सुमारे ५०० शाळांमध्ये अद्यापही वीजमीटर पोहोचलेले नाही, असे असताना संरक्षक भिंतीना प्राधान्य का? विद्यार्थी गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न काय?. शिक्षण विभागाचा प्राधान्यक्रम चुकतोय का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

जिल्ह्यातील सर्व शाळा संरक्षित होण्यावर सध्या जिल्हा परिषद शिक्षण विभाग तसेच जिल्हा प्रशासनाचा कल अधिक दिसत आहे. या संरक्षक भिंतीची कामे रोजगार हमी योजना व वित्त आयोगाच्या निधीतून पूर्ण करायची आहे. लॉकडाऊनच्या काळातही अनेक शाळांच्या संरक्षक भिंतीची कामे सुरू होती. मात्र, दुसरीकडे जिल्ह्यातील ५८६ शाळांना वीजमीटर नाही, ५ नोव्हेंबर २०११ रोजीची ही माहिती आहे. यानंतर काही शाळांना वीज मीटर बसविले असतील असे सांगण्यात येत आहे.

बिकट परिस्थिती

एकूण शाळा : १८२७

शाळांना वीज मीटर नाहीत: ५८६

मीटर असूनही वीजपुरवठा खंडित असलेल्या शाळा : ६४२

थकलेले एकूण वीजबिल : ६० लाख ४७ हजार ८८६ रुपये

आणि विकासकामे

५०० शाळांना संरक्षक भिंतीचे काम झाले

उर्वरीत १३ शाळांनाही संरक्षक भिंत बांधण्यात येईल

सभांमध्येही गाजतात केवळ भिंती

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभांमध्येही संरक्षक भिंतीचाच विषय गाजतो. या बैठकीतही हाच विषय गाजला होता. आमच्या गटातील शाळा का सोडल्या, आम्हाला कल्पना का दिली नाही, असा सदस्यांचा प्रश्न असतो. मात्र, शाळेत प्रयोगशाळा आहे का, विद्यार्थ्यांना स्वच्छ पाणी आहे का, शाळा डिजिटल आहे का, वीज आहे का? या मुद्यांवर चर्चा होताना दिसत नाही.

कोट

थकीत वीजबिले, विद्युत पुरवठ्याची माहिती शासनाकडे सादर केलेली आहे. अनेक शाळांवर सोलर यंत्रणा आपण बसविली आहे. ग्रामपंचायतीने वित्त आयोगातून शिक्षणावर खर्च करण्याचे नमूद आहे.

- भाऊसाहेब अकलाडे, शिक्षणाधिकारी