शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

ज्ञान वाटणाऱ्या ५०० शाळा अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यातील विकासकामांची माहिती देताना ५०० शाळांना संरक्षक भिंत बांधण्यात आल्याची व आणखी बांधण्यात येणार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यातील विकासकामांची माहिती देताना ५०० शाळांना संरक्षक भिंत बांधण्यात आल्याची व आणखी बांधण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नाशिक येथे बैठकीत दिली. मात्र, जिल्ह्यातील सुमारे ५०० शाळांमध्ये अद्यापही वीजमीटर पोहोचलेले नाही, असे असताना संरक्षक भिंतीना प्राधान्य का? विद्यार्थी गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न काय?. शिक्षण विभागाचा प्राधान्यक्रम चुकतोय का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

जिल्ह्यातील सर्व शाळा संरक्षित होण्यावर सध्या जिल्हा परिषद शिक्षण विभाग तसेच जिल्हा प्रशासनाचा कल अधिक दिसत आहे. या संरक्षक भिंतीची कामे रोजगार हमी योजना व वित्त आयोगाच्या निधीतून पूर्ण करायची आहे. लॉकडाऊनच्या काळातही अनेक शाळांच्या संरक्षक भिंतीची कामे सुरू होती. मात्र, दुसरीकडे जिल्ह्यातील ५८६ शाळांना वीजमीटर नाही, ५ नोव्हेंबर २०११ रोजीची ही माहिती आहे. यानंतर काही शाळांना वीज मीटर बसविले असतील असे सांगण्यात येत आहे.

बिकट परिस्थिती

एकूण शाळा : १८२७

शाळांना वीज मीटर नाहीत: ५८६

मीटर असूनही वीजपुरवठा खंडित असलेल्या शाळा : ६४२

थकलेले एकूण वीजबिल : ६० लाख ४७ हजार ८८६ रुपये

आणि विकासकामे

५०० शाळांना संरक्षक भिंतीचे काम झाले

उर्वरीत १३ शाळांनाही संरक्षक भिंत बांधण्यात येईल

सभांमध्येही गाजतात केवळ भिंती

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभांमध्येही संरक्षक भिंतीचाच विषय गाजतो. या बैठकीतही हाच विषय गाजला होता. आमच्या गटातील शाळा का सोडल्या, आम्हाला कल्पना का दिली नाही, असा सदस्यांचा प्रश्न असतो. मात्र, शाळेत प्रयोगशाळा आहे का, विद्यार्थ्यांना स्वच्छ पाणी आहे का, शाळा डिजिटल आहे का, वीज आहे का? या मुद्यांवर चर्चा होताना दिसत नाही.

कोट

थकीत वीजबिले, विद्युत पुरवठ्याची माहिती शासनाकडे सादर केलेली आहे. अनेक शाळांवर सोलर यंत्रणा आपण बसविली आहे. ग्रामपंचायतीने वित्त आयोगातून शिक्षणावर खर्च करण्याचे नमूद आहे.

- भाऊसाहेब अकलाडे, शिक्षणाधिकारी